शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
3
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
4
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
5
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
6
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
7
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
8
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
9
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
10
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
11
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
12
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
13
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
14
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
15
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
16
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
17
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
18
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
19
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
20
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे

सहा वर्षांपासून जैतापूर तहानलेले !

By admin | Updated: February 20, 2015 00:48 IST

वर्धा नदीपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या जैतापूर गावाला पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागते, ही एक शोकांतिकाच आहे.

सास्ती : वर्धा नदीपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या जैतापूर गावाला पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागते, ही एक शोकांतिकाच आहे. गावात पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून नळ योजना सुरू करण्यात आली. परंतु तब्बल सहा वर्ष लोटूनही येथील नागरिकांची तहान भागविण्यास ही नळयोजनना कुचकामी ठरली आहे. येथील जलकुंभ शोभेची वास्तू ठरले आहे.राजुरा-कोरपना तालुक्याच्या सीमेवर असलेल्या वर्धा नदीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या जैतापूर या गावाला उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी भटकावे लागते. यावर उपाययोजना म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत निमणी प्रादेशिक नळ योजनेअंतर्गत सन २००९ मध्ये २५ हजार लिटर क्षमता असलेल्या पाण्याच्या टाकीची निर्मिती करण्यात आली. वर्धा नदीवरून पाणी घेऊन कवठाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रातून परिसरातील गावांना पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यानुसार जैतापूर येथील जलकुंभाला पाईप लाईन जोडून पाणी पुरवठा केला. मात्र आज या नळयोजनेला पाच ते सहा वर्षे होऊनही हे जलकुंभ अजूनही तहाणलेलेच आहे.जैतापूर हे गाव नांदगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असल्याने या गावाकडे दुर्लक्ष होत आहे. जैतापूर येथे दोन ग्रामपंचायत सदस्य आहेत. परंतु गावाच्या विकासाकडे नेहमी ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. पाण्यासारख्या ज्वलंत समस्येकडे ग्रामपंचायतीकडून अनामत रक्कम भरली नाही म्हणून उन्हाळ्यातसुद्धा पाणी पुरवठा बंद ठेवतात. जिथे शासन प्रत्येक ठिकाणी कोणतेही कारण समोर न करता पाण्याचा पुरवठा करण्यासाठी व पाणी टंचाईला समोर जाण्यासाठी उपाय योजना करीत आहे. तिथे जैतापूरसारख्या गावच्या जनतेला नळाच्या पाण्यातून अलिप्त रहावे लागत आहे. येथील जनतेला उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी वनवन भटकावे लागते. यामुळे शासनाने केलेला लाखो रुपयांचा निधी पाण्यात गेला असल्याचे दिसून येत आहे.जैतापूर हे गाव राजुरा-कोरपना तालुक्याच्या सीमेवर असल्यामुळे येथे विजेचा पुरठाही कमी दाबाचा होतो. त्यामुळे काही लोकांच्या घरी बोअरवेल असून त्यावरील पंप उन्हाळ्याच्या दिवसात चालत नाही. हीसुद्धा समस्या येथील नागरिकांना भेडसावीत आहे. (वार्ताहर)