शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

सहा वर्षांपासून जैतापूर तहानलेले !

By admin | Updated: February 20, 2015 00:48 IST

वर्धा नदीपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या जैतापूर गावाला पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागते, ही एक शोकांतिकाच आहे.

सास्ती : वर्धा नदीपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या जैतापूर गावाला पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागते, ही एक शोकांतिकाच आहे. गावात पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून नळ योजना सुरू करण्यात आली. परंतु तब्बल सहा वर्ष लोटूनही येथील नागरिकांची तहान भागविण्यास ही नळयोजनना कुचकामी ठरली आहे. येथील जलकुंभ शोभेची वास्तू ठरले आहे.राजुरा-कोरपना तालुक्याच्या सीमेवर असलेल्या वर्धा नदीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या जैतापूर या गावाला उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी भटकावे लागते. यावर उपाययोजना म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत निमणी प्रादेशिक नळ योजनेअंतर्गत सन २००९ मध्ये २५ हजार लिटर क्षमता असलेल्या पाण्याच्या टाकीची निर्मिती करण्यात आली. वर्धा नदीवरून पाणी घेऊन कवठाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रातून परिसरातील गावांना पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यानुसार जैतापूर येथील जलकुंभाला पाईप लाईन जोडून पाणी पुरवठा केला. मात्र आज या नळयोजनेला पाच ते सहा वर्षे होऊनही हे जलकुंभ अजूनही तहाणलेलेच आहे.जैतापूर हे गाव नांदगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असल्याने या गावाकडे दुर्लक्ष होत आहे. जैतापूर येथे दोन ग्रामपंचायत सदस्य आहेत. परंतु गावाच्या विकासाकडे नेहमी ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. पाण्यासारख्या ज्वलंत समस्येकडे ग्रामपंचायतीकडून अनामत रक्कम भरली नाही म्हणून उन्हाळ्यातसुद्धा पाणी पुरवठा बंद ठेवतात. जिथे शासन प्रत्येक ठिकाणी कोणतेही कारण समोर न करता पाण्याचा पुरवठा करण्यासाठी व पाणी टंचाईला समोर जाण्यासाठी उपाय योजना करीत आहे. तिथे जैतापूरसारख्या गावच्या जनतेला नळाच्या पाण्यातून अलिप्त रहावे लागत आहे. येथील जनतेला उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी वनवन भटकावे लागते. यामुळे शासनाने केलेला लाखो रुपयांचा निधी पाण्यात गेला असल्याचे दिसून येत आहे.जैतापूर हे गाव राजुरा-कोरपना तालुक्याच्या सीमेवर असल्यामुळे येथे विजेचा पुरठाही कमी दाबाचा होतो. त्यामुळे काही लोकांच्या घरी बोअरवेल असून त्यावरील पंप उन्हाळ्याच्या दिवसात चालत नाही. हीसुद्धा समस्या येथील नागरिकांना भेडसावीत आहे. (वार्ताहर)