शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

सहा वर्षांपासून जैतापूर तहानलेले !

By admin | Updated: February 20, 2015 00:48 IST

वर्धा नदीपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या जैतापूर गावाला पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागते, ही एक शोकांतिकाच आहे.

सास्ती : वर्धा नदीपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या जैतापूर गावाला पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागते, ही एक शोकांतिकाच आहे. गावात पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून नळ योजना सुरू करण्यात आली. परंतु तब्बल सहा वर्ष लोटूनही येथील नागरिकांची तहान भागविण्यास ही नळयोजनना कुचकामी ठरली आहे. येथील जलकुंभ शोभेची वास्तू ठरले आहे.राजुरा-कोरपना तालुक्याच्या सीमेवर असलेल्या वर्धा नदीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या जैतापूर या गावाला उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी भटकावे लागते. यावर उपाययोजना म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत निमणी प्रादेशिक नळ योजनेअंतर्गत सन २००९ मध्ये २५ हजार लिटर क्षमता असलेल्या पाण्याच्या टाकीची निर्मिती करण्यात आली. वर्धा नदीवरून पाणी घेऊन कवठाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रातून परिसरातील गावांना पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यानुसार जैतापूर येथील जलकुंभाला पाईप लाईन जोडून पाणी पुरवठा केला. मात्र आज या नळयोजनेला पाच ते सहा वर्षे होऊनही हे जलकुंभ अजूनही तहाणलेलेच आहे.जैतापूर हे गाव नांदगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असल्याने या गावाकडे दुर्लक्ष होत आहे. जैतापूर येथे दोन ग्रामपंचायत सदस्य आहेत. परंतु गावाच्या विकासाकडे नेहमी ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. पाण्यासारख्या ज्वलंत समस्येकडे ग्रामपंचायतीकडून अनामत रक्कम भरली नाही म्हणून उन्हाळ्यातसुद्धा पाणी पुरवठा बंद ठेवतात. जिथे शासन प्रत्येक ठिकाणी कोणतेही कारण समोर न करता पाण्याचा पुरवठा करण्यासाठी व पाणी टंचाईला समोर जाण्यासाठी उपाय योजना करीत आहे. तिथे जैतापूरसारख्या गावच्या जनतेला नळाच्या पाण्यातून अलिप्त रहावे लागत आहे. येथील जनतेला उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी वनवन भटकावे लागते. यामुळे शासनाने केलेला लाखो रुपयांचा निधी पाण्यात गेला असल्याचे दिसून येत आहे.जैतापूर हे गाव राजुरा-कोरपना तालुक्याच्या सीमेवर असल्यामुळे येथे विजेचा पुरठाही कमी दाबाचा होतो. त्यामुळे काही लोकांच्या घरी बोअरवेल असून त्यावरील पंप उन्हाळ्याच्या दिवसात चालत नाही. हीसुद्धा समस्या येथील नागरिकांना भेडसावीत आहे. (वार्ताहर)