शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
4
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
5
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
6
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
7
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
8
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
9
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
10
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
11
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
13
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
14
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
15
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
16
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
17
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
18
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
19
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
20
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका

नदीच्या पाण्यावर जैतापूरवासीयांची भागते तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:50 IST

राजुरा, कोरपना तालुक्याच्या सीमेवर असलेल्या जैतापूर येथील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून नदीवरुन शेतात आणलेल्या पाण्यावर येथील जनतेला आपली तहान भागवावी लागत आहे.

ठळक मुद्देगावतलाव ठरला पांढरा हत्ती: बोअरवेल कोरड्या, पाण्यासाठी नागरिकांचे हाल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राजुरा, कोरपना तालुक्याच्या सीमेवर असलेल्या जैतापूर येथील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून नदीवरुन शेतात आणलेल्या पाण्यावर येथील जनतेला आपली तहान भागवावी लागत आहे. गावातील खासगी बोअरवेल कोरड्या पडल्या असून गावातील चार सरकारी हातपंपांना पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे व्यवस्थित पाणी येत नाही. त्यामुळे हातपंपातून पाणी काढण्यासाठी जैतापूरवासीयांना रात्रीपासून पाणी भरावे लागत आहे.पाच वर्षापूर्वी गावाशेजारील वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी गावातील भूजल साठ्यात वाढ व्हावी, या दृष्टीने जिल्हा परिषद लघु सिंचाई विभागाने लाखो रुपये खर्च करुन तलावाचे काम सुरु केले. परंतु या तलावाच्या कामात कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार घडल्याने येथील निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पहिल्याच वर्षी तलावाला मोठे भगदाड पडल्यामुळे तलावातील सर्वच पाणी वाहून गेले. तलावाच्या कामाला पाच वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी अजूनही काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे ज्या उद्देशाने लाखो रुपये खर्च करुन तलावाचे काम सुरु केले होते. त्या उद्देशालाच हरताळ फासल्याचे दिसून येत आहे. परिणामी जैतापूरवासीयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.गावात अनेकांनी खासगी बोअरवेल खोदल्या. परंतु पाण्याची पातळी खाली गेल्याने सर्वच बोअरवेलने तळ गाठला असून गावात असलेल्या चार सरकारी हातपंपाचेही पाणी संपल्याने महिलांना पाण्यासाठी रात्रभर जागरण करीत भटकंती करावी लागत आहे. गावात निमनी प्रादेशिक पाणी पुरवठ्याची नळ योजना आहे. मात्र या योजनेचे पाणी गावात पोहोचले नाही. सध्या गावापासून चार किलोमीटर अंतारावर असलेल्या वर्धा नदीवरुन काही शेतकऱ्यांनी शेतात पाईपलाईनद्वारे पाणी आणून त्या पाईप लाईनद्वारे गावातील पुरुषोत्तम गोनेवार हे एक दिवसाआड पाणी आणून जैतापुरवासीयांची तहान भागवित आहे. परंतु शासकीय व्यवस्थेने गावातील नागरिकांच्या पाण्याची व्यवस्था केली नाही, हे जैतापूरवासीयांचे दुदैव आहे.अंधारल्या रात्रीही पाण्यासाठी संघर्षजैतापूर गावातील पाण्याचे सर्वच स्त्रोत आटल्याने नागरिकांचा पाण्यासाठी संघर्ष सुरु झाला आहे. पाणी मिळविण्यासाठी येथील महिलांसह नागरिक अंधाºया रात्री उठून पाणी भरत आहे. जैतापूरवासीयांची पाण्यासाठी चाललेली धडपड शासकीय यंत्रणेचे धिंडवडे काढणारी आहे.

टॅग्स :Waterपाणी