शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नदीच्या पाण्यावर जैतापूरवासीयांची भागते तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:50 IST

राजुरा, कोरपना तालुक्याच्या सीमेवर असलेल्या जैतापूर येथील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून नदीवरुन शेतात आणलेल्या पाण्यावर येथील जनतेला आपली तहान भागवावी लागत आहे.

ठळक मुद्देगावतलाव ठरला पांढरा हत्ती: बोअरवेल कोरड्या, पाण्यासाठी नागरिकांचे हाल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राजुरा, कोरपना तालुक्याच्या सीमेवर असलेल्या जैतापूर येथील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून नदीवरुन शेतात आणलेल्या पाण्यावर येथील जनतेला आपली तहान भागवावी लागत आहे. गावातील खासगी बोअरवेल कोरड्या पडल्या असून गावातील चार सरकारी हातपंपांना पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे व्यवस्थित पाणी येत नाही. त्यामुळे हातपंपातून पाणी काढण्यासाठी जैतापूरवासीयांना रात्रीपासून पाणी भरावे लागत आहे.पाच वर्षापूर्वी गावाशेजारील वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी गावातील भूजल साठ्यात वाढ व्हावी, या दृष्टीने जिल्हा परिषद लघु सिंचाई विभागाने लाखो रुपये खर्च करुन तलावाचे काम सुरु केले. परंतु या तलावाच्या कामात कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार घडल्याने येथील निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पहिल्याच वर्षी तलावाला मोठे भगदाड पडल्यामुळे तलावातील सर्वच पाणी वाहून गेले. तलावाच्या कामाला पाच वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी अजूनही काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे ज्या उद्देशाने लाखो रुपये खर्च करुन तलावाचे काम सुरु केले होते. त्या उद्देशालाच हरताळ फासल्याचे दिसून येत आहे. परिणामी जैतापूरवासीयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.गावात अनेकांनी खासगी बोअरवेल खोदल्या. परंतु पाण्याची पातळी खाली गेल्याने सर्वच बोअरवेलने तळ गाठला असून गावात असलेल्या चार सरकारी हातपंपाचेही पाणी संपल्याने महिलांना पाण्यासाठी रात्रभर जागरण करीत भटकंती करावी लागत आहे. गावात निमनी प्रादेशिक पाणी पुरवठ्याची नळ योजना आहे. मात्र या योजनेचे पाणी गावात पोहोचले नाही. सध्या गावापासून चार किलोमीटर अंतारावर असलेल्या वर्धा नदीवरुन काही शेतकऱ्यांनी शेतात पाईपलाईनद्वारे पाणी आणून त्या पाईप लाईनद्वारे गावातील पुरुषोत्तम गोनेवार हे एक दिवसाआड पाणी आणून जैतापुरवासीयांची तहान भागवित आहे. परंतु शासकीय व्यवस्थेने गावातील नागरिकांच्या पाण्याची व्यवस्था केली नाही, हे जैतापूरवासीयांचे दुदैव आहे.अंधारल्या रात्रीही पाण्यासाठी संघर्षजैतापूर गावातील पाण्याचे सर्वच स्त्रोत आटल्याने नागरिकांचा पाण्यासाठी संघर्ष सुरु झाला आहे. पाणी मिळविण्यासाठी येथील महिलांसह नागरिक अंधाºया रात्री उठून पाणी भरत आहे. जैतापूरवासीयांची पाण्यासाठी चाललेली धडपड शासकीय यंत्रणेचे धिंडवडे काढणारी आहे.

टॅग्स :Waterपाणी