शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
5
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
6
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
7
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
8
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
9
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
10
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
11
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
12
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
13
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
14
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
15
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
16
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
17
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
18
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
19
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
20
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी

नदीच्या पाण्यावर जैतापूरवासीयांची भागते तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:50 IST

राजुरा, कोरपना तालुक्याच्या सीमेवर असलेल्या जैतापूर येथील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून नदीवरुन शेतात आणलेल्या पाण्यावर येथील जनतेला आपली तहान भागवावी लागत आहे.

ठळक मुद्देगावतलाव ठरला पांढरा हत्ती: बोअरवेल कोरड्या, पाण्यासाठी नागरिकांचे हाल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राजुरा, कोरपना तालुक्याच्या सीमेवर असलेल्या जैतापूर येथील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून नदीवरुन शेतात आणलेल्या पाण्यावर येथील जनतेला आपली तहान भागवावी लागत आहे. गावातील खासगी बोअरवेल कोरड्या पडल्या असून गावातील चार सरकारी हातपंपांना पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे व्यवस्थित पाणी येत नाही. त्यामुळे हातपंपातून पाणी काढण्यासाठी जैतापूरवासीयांना रात्रीपासून पाणी भरावे लागत आहे.पाच वर्षापूर्वी गावाशेजारील वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी गावातील भूजल साठ्यात वाढ व्हावी, या दृष्टीने जिल्हा परिषद लघु सिंचाई विभागाने लाखो रुपये खर्च करुन तलावाचे काम सुरु केले. परंतु या तलावाच्या कामात कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार घडल्याने येथील निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पहिल्याच वर्षी तलावाला मोठे भगदाड पडल्यामुळे तलावातील सर्वच पाणी वाहून गेले. तलावाच्या कामाला पाच वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी अजूनही काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे ज्या उद्देशाने लाखो रुपये खर्च करुन तलावाचे काम सुरु केले होते. त्या उद्देशालाच हरताळ फासल्याचे दिसून येत आहे. परिणामी जैतापूरवासीयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.गावात अनेकांनी खासगी बोअरवेल खोदल्या. परंतु पाण्याची पातळी खाली गेल्याने सर्वच बोअरवेलने तळ गाठला असून गावात असलेल्या चार सरकारी हातपंपाचेही पाणी संपल्याने महिलांना पाण्यासाठी रात्रभर जागरण करीत भटकंती करावी लागत आहे. गावात निमनी प्रादेशिक पाणी पुरवठ्याची नळ योजना आहे. मात्र या योजनेचे पाणी गावात पोहोचले नाही. सध्या गावापासून चार किलोमीटर अंतारावर असलेल्या वर्धा नदीवरुन काही शेतकऱ्यांनी शेतात पाईपलाईनद्वारे पाणी आणून त्या पाईप लाईनद्वारे गावातील पुरुषोत्तम गोनेवार हे एक दिवसाआड पाणी आणून जैतापुरवासीयांची तहान भागवित आहे. परंतु शासकीय व्यवस्थेने गावातील नागरिकांच्या पाण्याची व्यवस्था केली नाही, हे जैतापूरवासीयांचे दुदैव आहे.अंधारल्या रात्रीही पाण्यासाठी संघर्षजैतापूर गावातील पाण्याचे सर्वच स्त्रोत आटल्याने नागरिकांचा पाण्यासाठी संघर्ष सुरु झाला आहे. पाणी मिळविण्यासाठी येथील महिलांसह नागरिक अंधाºया रात्री उठून पाणी भरत आहे. जैतापूरवासीयांची पाण्यासाठी चाललेली धडपड शासकीय यंत्रणेचे धिंडवडे काढणारी आहे.

टॅग्स :Waterपाणी