शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

‘जय भवानी, जय शिवाजी’चा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 22:46 IST

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालय, सामाजिक संस्था, महानगरपालिका, नगरपालिका, शाळा-महाविद्यालय आणि वॉर्डावॉर्डात शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.

ठळक मुद्देरॅलीने दुमदुमले शहर : छत्रपतींना अभिवादन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालय, सामाजिक संस्था, महानगरपालिका, नगरपालिका, शाळा-महाविद्यालय आणि वॉर्डावॉर्डात शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. चंद्रपुरातील पटेल हॉयस्कूलजवळील शिवाजी चौकात अनेक संघटनांनी येऊन शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. यासोबत चंद्रपुरातील विविध संघटनांनी शोभायात्रा, रॅली काढली. त्यामुळे मंगळवारी दिवसभर चंद्रपुरातील रस्त्यावरून ‘जय भवानी, जय शिवाजी’ चा गजर ऐकू येत होता. दरम्यान, चंद्रपुरातील श्यामनगर येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत शिवजयंती उत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला उपमहापौर अनिल फुलझेले, नगरसेवक राजेश मून, नगरसेविका जयश्री जुमडे, राजेंद्र तिवारी, विनोद शेरकी, प्रा. रवी जोगी, अ‍ॅड. सारिका संदूरकर, शशीकांत मस्की, डॉ. मनोज कुपरने, सोमेश्वर राऊत, रामभाऊ ढगे, महेंद्र जुमडे, दिनकर सोमलकर, श्रीनिवास मेकल यांच्यासह अनेक मान्यवरांची याप्रसंगी उपस्थिती लाभली होती.आपल्या भाषणात ना. अहीर म्हणाले, शिवरायांनी असामान्य शौर्य व कर्तृत्वाच्या बळावर स्वराज्याची स्थापना केली व मुघल साम्राज्याला उद्ध्वस्त केले. मात्र यासाठी छत्रपतींच्या मावळ्यांनी स्वराज्य रक्षणार्थ जे शौर्य गाजवले, त्या इतिहासाचे स्मरण देशवासीयांना असल्याने या शौर्याचा इतिहास आमच्या शुरवीर सैन्यांच्याही हृदय सिंहासनावर कोरला गेला आहे. त्यामुळे राष्ट्राच्या संरक्षणासाठी आपले शीर तळहातावर घेऊन मुघलांची औलाद असलेल्या आतंकवाद्यांशी वर्षांनुवर्षे लढावे लागत आहे. यात अनेकांना वीरमरण आले असले तरी पुलवामा येथील भ्याड आत्मघाती हल्ल्यात ज्या ४२ जवानांनी शहीदत्व पत्करले, त्यांचे बलीदान व्यर्थ जावु न देण्याचा संकल्प सरकारने केला आहे. त्याची परिनिती देशवासीयांना लवकरच बघायला मिळेल, असा दृढविश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी अनेक मान्यवरांनी प्रसंगोचित मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितांनी शहीद जवानांना श्रध्दांजली वाहून शिवजयंती उत्सव साजरा केला. यावेळी शेकडो शिवभक्त उपस्थित होते.