शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नातेवाईकांचे अंतिम दर्शन घेणेही सामान्यांना कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2021 05:00 IST

कोरोना संकटानंतर सद्य:स्थितीत जनजीवन रुळावर आले आहे. शासनाने अनेक निर्बंधही हटविले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आपापल्या कामाला लागले आहेत. दरम्यान, ऐन दिवाळीच्या दिवसापासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. आज ना उद्या संप मिटेल या आशेवर असलेल्या नागरिकांची निराशा झाली. महिना उलटला तरीही संप काही सुटला नाही. त्यातच मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील पॅसेंजर अजूनही बंद आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संकटानंतर आता स्पेशल दर्जा काढून नियमित ट्रेन सुरू झाल्या आहेत. मात्र, जनरलचे तिकीटच मिळत नसल्याने अनेकांना अडचणीचे होत आहे. कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यदर्शनासाठी जाणेही सद्य:स्थितीत कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचा विचार करून जनरल तिकीट सुरू करावे, तसेच एसटी संपावरही तोडगा काढण्याची मागणी आता सर्वसामान्यांकडून केली जात आहे.कोरोना संकटानंतर सद्य:स्थितीत जनजीवन रुळावर आले आहे. शासनाने अनेक निर्बंधही हटविले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आपापल्या कामाला लागले आहेत. दरम्यान, ऐन दिवाळीच्या दिवसापासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. आज ना उद्या संप मिटेल या आशेवर असलेल्या नागरिकांची निराशा झाली. महिना उलटला तरीही संप काही सुटला नाही. त्यातच मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील पॅसेंजर अजूनही बंद आहे. विशेष ट्रेन आता सर्वसाधारण झाल्या आहेत. मात्र, जनरलचे तिकीटच मिळत नसल्याने सामान्यांचा प्रवासही कठीण झाला आहे. त्यातच अडचणीच्या वेळी किंवा कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू झाल्यास प्रवास कसा करायचा, हा प्रश्न सामान्यांना पडला आहे. 

हिंमत करणे पडणार महागातरेल्वेचे जनरल तिकीट देणे बंद आहे. असे असतानाच काही जण अत्यावश्यक ठिकाणी जायचे असल्यास मोठी हिंमत करून आरक्षण डब्यातून प्रवास करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्यांना दंड भरावा लागत असून मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे.

खासगी वाहन परवडेनाकुटुंबातील नातेवाइकांचा अचानक मृत्यू झाल्यास सामान्य नागरिकांना जाण्याचा मोठा प्रश्न पडतो. हक्काची एसटी बंद आहे. रेल्वेने जाण्यासाठी आधीच आरक्षण करावे लागते. खासगी वाहन करावे तर खिशात पैसा नाही, अशावेळी काय करावे, हा प्रश्न त्यांना पडत आहे.

सामान्यांची कुचंबणा का?केंद्र सरकारने अंत्योदय योजनेतील गरिबांना मोफत धान्य मिळावे यासाठी योजनेत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे गरिबांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारलाही भारतात गरीब नागरिक राहतात, हे ठाऊक आहे तर त्यांच्यासाठी असलेली पॅसेंजर, रेल्वेतील जनरल तिकीट बंद करून कुचंबणा का केली जाते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वेST Strikeएसटी संप