शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

नातेवाईकांचे अंतिम दर्शन घेणेही सामान्यांना कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2021 05:00 IST

कोरोना संकटानंतर सद्य:स्थितीत जनजीवन रुळावर आले आहे. शासनाने अनेक निर्बंधही हटविले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आपापल्या कामाला लागले आहेत. दरम्यान, ऐन दिवाळीच्या दिवसापासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. आज ना उद्या संप मिटेल या आशेवर असलेल्या नागरिकांची निराशा झाली. महिना उलटला तरीही संप काही सुटला नाही. त्यातच मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील पॅसेंजर अजूनही बंद आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संकटानंतर आता स्पेशल दर्जा काढून नियमित ट्रेन सुरू झाल्या आहेत. मात्र, जनरलचे तिकीटच मिळत नसल्याने अनेकांना अडचणीचे होत आहे. कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यदर्शनासाठी जाणेही सद्य:स्थितीत कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचा विचार करून जनरल तिकीट सुरू करावे, तसेच एसटी संपावरही तोडगा काढण्याची मागणी आता सर्वसामान्यांकडून केली जात आहे.कोरोना संकटानंतर सद्य:स्थितीत जनजीवन रुळावर आले आहे. शासनाने अनेक निर्बंधही हटविले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आपापल्या कामाला लागले आहेत. दरम्यान, ऐन दिवाळीच्या दिवसापासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. आज ना उद्या संप मिटेल या आशेवर असलेल्या नागरिकांची निराशा झाली. महिना उलटला तरीही संप काही सुटला नाही. त्यातच मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील पॅसेंजर अजूनही बंद आहे. विशेष ट्रेन आता सर्वसाधारण झाल्या आहेत. मात्र, जनरलचे तिकीटच मिळत नसल्याने सामान्यांचा प्रवासही कठीण झाला आहे. त्यातच अडचणीच्या वेळी किंवा कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू झाल्यास प्रवास कसा करायचा, हा प्रश्न सामान्यांना पडला आहे. 

हिंमत करणे पडणार महागातरेल्वेचे जनरल तिकीट देणे बंद आहे. असे असतानाच काही जण अत्यावश्यक ठिकाणी जायचे असल्यास मोठी हिंमत करून आरक्षण डब्यातून प्रवास करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्यांना दंड भरावा लागत असून मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे.

खासगी वाहन परवडेनाकुटुंबातील नातेवाइकांचा अचानक मृत्यू झाल्यास सामान्य नागरिकांना जाण्याचा मोठा प्रश्न पडतो. हक्काची एसटी बंद आहे. रेल्वेने जाण्यासाठी आधीच आरक्षण करावे लागते. खासगी वाहन करावे तर खिशात पैसा नाही, अशावेळी काय करावे, हा प्रश्न त्यांना पडत आहे.

सामान्यांची कुचंबणा का?केंद्र सरकारने अंत्योदय योजनेतील गरिबांना मोफत धान्य मिळावे यासाठी योजनेत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे गरिबांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारलाही भारतात गरीब नागरिक राहतात, हे ठाऊक आहे तर त्यांच्यासाठी असलेली पॅसेंजर, रेल्वेतील जनरल तिकीट बंद करून कुचंबणा का केली जाते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वेST Strikeएसटी संप