शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
4
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
5
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
6
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
7
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
8
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
9
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
10
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
11
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
12
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
13
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
14
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
15
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
16
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
17
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
18
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
19
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
20
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
Daily Top 2Weekly Top 5

मूलमधील सिंचन क्षमतेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 22:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : महाराष्ट्र शासनाने सिंचन क्षमता वाढावी, यासाठी सन २०१७-१८ या वर्षात जलयुक्त शिवार अभियानाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. त्यामुळे मूल तालुक्यातील विविध विभागाअंतर्गत २७८ सिंचनाची कामे पूर्ण झाल्यामुळे ८०२ टी. सी. एम. सिंचन क्षमता वाढली आहे. परिणामी रब्बीचे क्षेत्र वाढण्यास विशेष मदत मिळणार आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार ...

ठळक मुद्दे२७८ कामे पूर्ण : शेतकऱ्यांना मिळाले वरदान

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : महाराष्ट्र शासनाने सिंचन क्षमता वाढावी, यासाठी सन २०१७-१८ या वर्षात जलयुक्त शिवार अभियानाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. त्यामुळे मूल तालुक्यातील विविध विभागाअंतर्गत २७८ सिंचनाची कामे पूर्ण झाल्यामुळे ८०२ टी. सी. एम. सिंचन क्षमता वाढली आहे. परिणामी रब्बीचे क्षेत्र वाढण्यास विशेष मदत मिळणार आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.ग्रामीण भागातील शेतकरी हा पुर्णत: शेती उद्योगावर अवलंबून आहे. त्यामुळे शेती उद्योगाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने सन २०१७-२०१८ वर्षात जलयुक्त शिवार या अभियानाला विशेष महत्व देत विविध विभागाअंतर्गत कामे मंजूर केली. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाअंतर्गत जलयुक्त शिवार अभियानाद्वारे २२८ तर म. ग्रा. रो. ह. योजनेअंतर्गत ५४ अशी २८२ कामे प्रस्तावित केली. त्यापैकी २५१ कामे पूर्ण करण्यात आली आहे. पंचायत समिती मूल अंतर्गत १० कामे प्रस्तावित होती. त्यापैकी संपूर्ण कामे पूर्णत्वास आली आहेत. पाटबंधारे विभागाअंतर्गत ७ कामे प्रस्तावित होती त्यातील ६ कामे पूर्णत्वास आली. जिल्हा परिषद सिंचाई विभाग अंतर्गत सर्वच ५ कामे पूर्ण करण्यात आली. वनविभागातील १७ कामांपैकी केवळ सहा कामे पूर्ण करण्यात आली.अशी एकूण ३२१ कामे प्रस्तावित करण्यात आली. मात्र काही विभागाच्या दुर्लक्षीतपणामुळे काम पुर्णत्वास नेता आले नाही. कृषी विभाग, वनविभाग काही प्रमाणात कामे पूर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे कामाची पूर्तता ६८.६०४ टक्के पूर्ण झाल्याचे अहवालात नमूद आहे.सन २०१६-१७ या वर्षात महाराष्ट्र शासनाने मागेल त्याला शेततळे, ही योजना अंमलात आणली. या योजनेमुळे बऱ्याच शेतकऱ्यांना सिंचनाची क्षमता वाढविण्यास मदत झाल्याचे दिसून येते. मागील वर्षी २०३ शेततळे मूल तालुक्यात तयार करण्यात आले. या शेततळ्यामुळे मागील वर्षी १३५ टी. सी. एम. पाणी साठा निर्माण होऊन सिंचन क्षमता वाढण्यास मदत झाली. महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत सिंचन क्षमता वाढविण्यासाठी विविध योजनेमार्फत सिंचनाची कामे करण्यास प्रोत्साहन देण्यात आले. यात मूल तालुक्यात कोसंबी, चक कन्हाळगाव, उथळपेढ, करवन, मारोडा, सोमनाथ, डोंगरगाव, कोरंबी, चक घोसरी, चक बेंबाळ, बोरघाट, नांदगाव, या १२ गावात प्रामुख्याने कामे करण्यात आली. कृषी विभाग, पंचायत समिती, पाटबंधारे विभाग, जि. प. सिंचाई विभाग, वनविभाग आदी यंत्रणेकडून ३२१ प्रस्तावित कामांऐवजी २७८ कामे पूर्ण केल्याने ८०२ टी. सी. एम.क्षमता वाढली. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियान शेतकºयांसाठी वरदान ठरले आहे. जनजागृतीसाठी तालुका कृषी अधिकारी प्रशांत राहाणे यांनी प्रयत्न केले.