शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

नियोजनाअभावी पाणी पुरवठ्यात अनियमितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 23:51 IST

शहराला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होईल एवढ्या क्षमतेची योजना आहे. परंतु, ग्रामपंचायतच्या नियोजनाअभावी दोन दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात आहे. तर दुसरीकडे ग्रा.पं ने करात वाढ केली. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केल्या जात आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते शामराव बोबडे यांनी केला.

ठळक मुद्देग्रामपंचायतचे दुर्लक्ष : पाण्याअभावी शहरवासी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : शहराला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होईल एवढ्या क्षमतेची योजना आहे. परंतु, ग्रामपंचायतच्या नियोजनाअभावी दोन दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात आहे. तर दुसरीकडे ग्रा.पं ने करात वाढ केली. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केल्या जात आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते शामराव बोबडे यांनी केला.घुग्घुस येथे तीन पाणी पुरवठायोजना कार्यरत आहेत. त्याबरोबरच सौर उर्जेवर चालणारी योजनाही सुरू आहे. परंतु, या पाणी पुरवठा योजना मागील १५ वर्षांपासुन दरडोई ७० लिटर पाणी देऊ शकल्या नाही. सामान्य व खासगी पाणी करात तीनदा वाढ करण्यात आली. सामान्य करापासुन ग्रामपंचायतला ४० लाख ७५ हजार १०० रूपये तर खासगी नळधारकांकडून ४० लाख ३६० हजार ४५० रूपये मिळत आहेत. त्यामुळे पाणी पुरवठा ज्या प्रमाणे केला जातो त्याच प्रमाणात कर देण्याची मागणी नागरिकांनी अनेकदा केली. मात्र याकडे ग्रा. पं. ने दुर्लक्ष केल्याचा आरोप शामराव बोबडे यांनी केला. ग्रा. पं. चे सहा वार्ड आहेत.त्यापैकी वार्ड क्र. ४ व ५ वार्ड वेकोलि वणी कोळसा खाण कामगार वसाहतीचा समावेश आहे. वसाहतीकरिता वेकोलिची पाणी पुरवठा योजना स्वतंत्र व्यवस्था आहे घुग्घुस वार्ड क्र. १, २ , ३, ६ मध्ये पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी ग्राम पंचायत प्रशासनाची आहे. वर्धा नदीवरील विहिरीतून (टाकी) पाण्याचा उपसा करणारे ३ पंप आहेत. दोन ते पाणी जलशुध्दीकरण सयंत्रापर्यंत पाणी दोन स्वतंत्र पाइपलाईन टाकण्यात आले. घुग्घुस शहराच्या लोकसंख्येनुसार सदर पाणी पुरवठा योजना १८ लाख ९५ हजार ४० लिटर प्गरज पूर्ण करू शकते. मात्र, १५ वर्षांत ग्रा.पं.ला शक्य झाले नाही, असा आरोप बोबडे यांनी केला आहे.लाखोंचा खर्च सुरूचजीवन प्राधिकरण विभागाने घुग्घुस शहराची लोकसंख्या व पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन मागील २० वर्षांत ५ लाख लिटर क्षमतेवरून १२ लाख लिटर केला. शिवाय जलशुद्धीकरण योजनाही कार्यान्वित केली आहे. या प्रकल्पासाठी साहित्य खरेदी व दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च होतो. पण, पुरेसा आणि नियमित पाणी पुरवठा होत नाही.शहरातील नागरिकांना दररोज पाणी मिळावे, यासाठी जीवन प्राधिकरणकडून दररोज अभ्यास व निरीक्षण सुरू आहे. येत्या १० दिवसांत दररोज पाणी मिळणार आहे. त्यामुळे शहरातील सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.-संतोष नुने, प्रभारी सरपंच घुग्घुस

टॅग्स :Waterपाणी