शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

नियोजनाअभावी पाणी पुरवठ्यात अनियमितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 23:51 IST

शहराला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होईल एवढ्या क्षमतेची योजना आहे. परंतु, ग्रामपंचायतच्या नियोजनाअभावी दोन दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात आहे. तर दुसरीकडे ग्रा.पं ने करात वाढ केली. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केल्या जात आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते शामराव बोबडे यांनी केला.

ठळक मुद्देग्रामपंचायतचे दुर्लक्ष : पाण्याअभावी शहरवासी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : शहराला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होईल एवढ्या क्षमतेची योजना आहे. परंतु, ग्रामपंचायतच्या नियोजनाअभावी दोन दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात आहे. तर दुसरीकडे ग्रा.पं ने करात वाढ केली. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केल्या जात आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते शामराव बोबडे यांनी केला.घुग्घुस येथे तीन पाणी पुरवठायोजना कार्यरत आहेत. त्याबरोबरच सौर उर्जेवर चालणारी योजनाही सुरू आहे. परंतु, या पाणी पुरवठा योजना मागील १५ वर्षांपासुन दरडोई ७० लिटर पाणी देऊ शकल्या नाही. सामान्य व खासगी पाणी करात तीनदा वाढ करण्यात आली. सामान्य करापासुन ग्रामपंचायतला ४० लाख ७५ हजार १०० रूपये तर खासगी नळधारकांकडून ४० लाख ३६० हजार ४५० रूपये मिळत आहेत. त्यामुळे पाणी पुरवठा ज्या प्रमाणे केला जातो त्याच प्रमाणात कर देण्याची मागणी नागरिकांनी अनेकदा केली. मात्र याकडे ग्रा. पं. ने दुर्लक्ष केल्याचा आरोप शामराव बोबडे यांनी केला. ग्रा. पं. चे सहा वार्ड आहेत.त्यापैकी वार्ड क्र. ४ व ५ वार्ड वेकोलि वणी कोळसा खाण कामगार वसाहतीचा समावेश आहे. वसाहतीकरिता वेकोलिची पाणी पुरवठा योजना स्वतंत्र व्यवस्था आहे घुग्घुस वार्ड क्र. १, २ , ३, ६ मध्ये पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी ग्राम पंचायत प्रशासनाची आहे. वर्धा नदीवरील विहिरीतून (टाकी) पाण्याचा उपसा करणारे ३ पंप आहेत. दोन ते पाणी जलशुध्दीकरण सयंत्रापर्यंत पाणी दोन स्वतंत्र पाइपलाईन टाकण्यात आले. घुग्घुस शहराच्या लोकसंख्येनुसार सदर पाणी पुरवठा योजना १८ लाख ९५ हजार ४० लिटर प्गरज पूर्ण करू शकते. मात्र, १५ वर्षांत ग्रा.पं.ला शक्य झाले नाही, असा आरोप बोबडे यांनी केला आहे.लाखोंचा खर्च सुरूचजीवन प्राधिकरण विभागाने घुग्घुस शहराची लोकसंख्या व पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन मागील २० वर्षांत ५ लाख लिटर क्षमतेवरून १२ लाख लिटर केला. शिवाय जलशुद्धीकरण योजनाही कार्यान्वित केली आहे. या प्रकल्पासाठी साहित्य खरेदी व दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च होतो. पण, पुरेसा आणि नियमित पाणी पुरवठा होत नाही.शहरातील नागरिकांना दररोज पाणी मिळावे, यासाठी जीवन प्राधिकरणकडून दररोज अभ्यास व निरीक्षण सुरू आहे. येत्या १० दिवसांत दररोज पाणी मिळणार आहे. त्यामुळे शहरातील सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.-संतोष नुने, प्रभारी सरपंच घुग्घुस

टॅग्स :Waterपाणी