शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

अधीक्षकांच्या धाकाने वाहनांचे अतिक्रमण हटले

By admin | Updated: March 15, 2015 01:03 IST

गडचांदूर पोलीस ठाण्याची पोलीस अधिक्षकांनी ११ मार्च रोजी तपासणी केली. ते येणार असल्याची माहिती मिळताच अख्खे पोलीस ठाणे कामाला लागले.

गडचांदूर: गडचांदूर पोलीस ठाण्याची पोलीस अधिक्षकांनी ११ मार्च रोजी तपासणी केली. ते येणार असल्याची माहिती मिळताच अख्खे पोलीस ठाणे कामाला लागले. कधी खुले न दिसणारे रस्ते पूर्णपणे खुले दिसले. रस्त्यावरील वाहनांचे अतिक्रमण मोकळे झाले. मात्र साहेब गेल्यानंतर परिस्थिती जैसे थे झाली. यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांंनी येथे नियमित भेट द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.माणिकगड कंपनीकडे जाणाऱ्या या रस्त्यावर नेहमी रस्त्याच्या दुतर्फा ट्रक उभे राहतात. रस्त्यावर अतिक्रमण व वाहनांचा धूर आणि रस्त्यावरची धुळ यामुळे दुचाकी चालक हैराण झाले आहे. मात्र पोलीस अधिक्षकांच्या दौऱ्यामुळे या रस्त्यावर वाहन हटविण्यात आले.नागरिकांच्या डोळ्यात धुळीचे कण जाऊ नये म्हणून विशिष्ट प्रसंगी माणिकगड कंपनी टँकरच्या माध्यमातून पाणी टाकतात. या दौऱ्यामुळे कंपनीनेही रस्त्यावर पाणी टाकले. मात्र ते गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र रस्त्यावर पाणी शिंपडण्याचे सौजन्य दाखविले नाही.पोलिसांकडून नेहमी गडचांदूरवासीयांची उपेक्षा होत आहे. जे काम पोलीस अधिक्षक येणार म्हणून झाले तेच काम दररोज केले तर नागरिकांनाही सुरक्षित वाटेल. वर्दळीच्या वेळी याठिकाणी वाहतूक पोलीस देणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)