शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश

By admin | Updated: June 4, 2017 00:26 IST

जिल्हयातील दुर्गम भागात मंजूर झालेल्या योजना वेगवेगळया यंत्रणांच्या समन्वयाअभावी रखडलेल्या आहेत.

हंसराज अहीर : एसडीओंवर प्रलंबित पाणीपुरवठा योजनांची जबाबदारीचंद्रपूर : जिल्हयातील दुर्गम भागात मंजूर झालेल्या योजना वेगवेगळया यंत्रणांच्या समन्वयाअभावी रखडलेल्या आहेत. या योजना सुरळीत सुरु होण्यासाठी नेमक्या कारणांचे विश्लेषण करुन त्यावर उपाय सुचविणारे अहवाल महिनाभरात जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करा, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांनी शुक्रवारीे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील बचत साफल्य भवन येथे आयोजित राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना व शहरी पाणी पुरवठा संदर्भात बैठक आयोजित करण्यात आले होती. यावेळी ना. अहीर बोलत होते.या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, आमदार नाना शामकुळे, आ. अ‍ॅड.संजय धोटे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापडकर, मनपा आयुक्त संजय काकडे, वरोराचे नगराध्यक्ष एहतेशाम अली, उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, मनपा उपमहापौर अनिल फुलझले, जिल्हा परिषद सभापती अर्चना जिवतोडे, ब्रीजभूषण पाझारे, गोदावरी केंद्रे, संतोष तंगरपल्लीवार, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, जिल्हा समन्वय समितीचे सदस्य खुशाल बोंडे आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये उपविभाग निहाय आढावा घेण्यात आला. अनेक ठिकाणी परस्पर यंत्रणेचा समन्वयाचा अभाव योजना आकार घेताना अडथळा झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे आगामी काळात त्या अडचणी दूर करण्याचे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी दिले. राजुरा, जिवती आदी ग्रामीण भागामध्ये काही योजना अनेक महिन्यांपासून रखडल्याने नागरिकांचे हाल होत असल्याचे लोकप्रतिनिधींनी बैठकीमध्ये लक्षात आणून दिले. जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी रखडलेल्या योजनांनिहाय तपासणी केली असता अधिक चांगला परस्पर समन्वय सर्व यंत्रणामध्ये ठेवण्याची गरज असल्याचे दिसून आले. जिल्हयात सद्या ७ कोटी ६४ लाख रुपयांच्या ६४ योजना रखडल्या आहेत. त्यामध्ये चंद्रपूर-२, पोंभुर्णा-३, भद्रावती-३, चिमूर-१७, वरोरा-२, राजुरा-१३, कोरपना-४, जिवती-१०, सिंदेवाही-२, मूल-२, सावली-४, नागभीड-२ आदी योजनांचा समावेश आहे. याशिवाय राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत तीन वर्षांपासून ३७ योजना रखडलेल्या आहेत. त्या सर्व योजनांची कारणमिमांसा करण्यात आली. उपविभागीय अधिकाऱ्यांनी या रखडलेल्या योजना पूर्ण शक्तीनिशी सुरु होण्यासाठी योग्य अहवाल देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. याच बैठकीत ग्रामीण पाणी पुरवठा योजनेतील संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडयाचा आढावा घेण्यात आला. ६५३ गावांमध्ये ९ कोटी ८६ लाख रुपयांच्या ८६२ उपाययोजना सुचविण्यात आल्या असून कामे सुरु असल्याचे जिल्हयातील अधिकऱ्यांनी स्पष्ट केले.