शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Dongrale: चिमुकलीवर अत्याचार, लोकांच्या संतापाचा कडेलोट; थेट न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांचा लाठीचार्ज
2
"तेव्हा कुणी आलं नाही, आता स्टंटबाजी करायला आले, पण मी मारहाण...", भाजपच्या माजी नगरसेवकांने सांगितलं काय घडलं?
3
कर्नाटक सरकारमध्ये बदल होणार! डीके शिवकुमार यांच्या समर्थकांच्या हालचाली वाढल्या, काही आमदार दिल्लीत तळ ठोकून
4
उपमुख्यमंत्रिपदाची मागणी का केली नाही? चिराग म्हणाले- मी लालची नाही; मिळाले त्यात समाधानी
5
'नवीन भाडे करार २०२५' : अ‍ॅडव्हान्स म्हणून घेता येईल फक्त २ महिन्यांचे भाडे; घरमालक वाढवू शकणार नाही मनमानी पद्धतीनं भाडं
6
लुटेरी दुल्हन! वय २४ वर्षे अन् केली १५ लग्न; ५२ लाखांचा गंडा, नवऱ्याला सोडून जाते पळून अन्...
7
अरे बापरे सेम टू सेम! हुबेहुब आलिया भटसारखी दिसते ही मराठी अभिनेत्री, फोटो पाहून चक्रावून जाल
8
३ वर्षांचे प्रेमसंबंध आणि लग्न करायला नकार! रागाच्या भरात प्रियकर झाला मारेकरी; दोन वेळा गोळ्या झाडल्या पण... 
9
दिल्ली स्फोट प्रकरणी मोठा खुलासा! 'घरघंटी'च्या मदतीने बनवले होते बॉम्ब; साहित्य जप्त केले
10
IND vs SA 2nd Test: 'आमचं ठरलंय!' गिलच्या जागी कोण? कॅप्टन पंतनं उत्तर दिलं, पण...
11
ट्रम्प ज्युनियर यांचा भारतात शाही मुक्काम! एका रात्रीच्या भाड्यात येईल SUV कार; ताजमहलचा दिसतो व्ह्यू
12
Gold Price Today: ₹३००० नं स्वस्त झालं सोनं, चांदी ₹८००० नं आपटली; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट रेट
13
Railway: रेल्वेगाड्यांत 'या' रुग्णांना मिळते 'इतकी' सवलत!
14
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण; अमित ठाकरे म्हणाले, “अखेर सरकारला जाग आली...!”
15
स्मृती-पलाश होणार विवाहबद्ध; PM मोदींचे दोघांसाठी खास पत्र, म्हणाले- "तुमची पार्टनरशिप..."
16
Mumbai: एक्स्प्रेस वेवरील पुलांच्या डागडुजीसाठी १३६ कोटींचा खर्च, एकनाथ शिंदेंच्या सूचनेनंतर महापालिका सरसावली
17
Cryptocurrency Crash: क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! २४ तासांत १७ लाख कोटींची फोडणी; Bitcoin ७% पेक्षा अधिक घसरलं
18
ST महामंडळाचा आर्थिक शिस्तीवर भर; नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर, पारदर्शकतेसाठी विशेष नोंदवही
19
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
20
"पुरस्कार घेण्यास परदेशात गेलीस तर…’’, नोबेल विजेत्या महिलेला सरकारने दिली धमकी  
Daily Top 2Weekly Top 5

कापूस, सोयाबीनवर रोगांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 00:18 IST

मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण तसेच अधूनमधून येणाऱ्या पावसामुळे कापूस, सोयाबीन आदी पिकांवर विविध रोगांचा प्रादूर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वी कृषी विभागाने कोरपना तालुक्यातील शेतशिवारात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळीही त्यांना प्रादूर्भाव होत असल्याचे आढळले.

ठळक मुद्देसूर्यनारायणाचे दर्शन नाहीच : जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण तसेच अधूनमधून येणाऱ्या पावसामुळे कापूस, सोयाबीन आदी पिकांवर विविध रोगांचा प्रादूर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वी कृषी विभागाने कोरपना तालुक्यातील शेतशिवारात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळीही त्यांना प्रादूर्भाव होत असल्याचे आढळले.मागीलवर्षी लष्करी अळीने पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते. ही अळी साधारणत: ८० पिकांवर उपजिविका करु शकते. मादी एका जीवनकाळात हजार ते दीड हजार अंडी घालू शकते व ही कीड एका रात्रीतून १०० किलोमीटरचा प्रवास करु शकते.पहिल्या व दुसºया अवस्थेतील लष्करी अळ्या पाने खुरबडून खातात. त्यामुळे पानावर पांढरे लांबट चट्टे दिसून येतात. अळी तिसऱ्या अवस्थेत पाने खाण्यास सुरुवात करते व पानाला छिद्र करते. सहाव्या अवस्थेत अळी अधिरपणे पाने खावून मोठ्या प्रमाणात विष्ठा टाकते. १० टक्केपेक्षा जास्त नुकसान आढळून अल्यास थायोमेथोक्झाम १२.६ अधिक लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन ९.५ टक्के तीन मिली किंवा पिनोटेरम ११.७ टक्के एसपी ४ मिली किंवा क्लोरॅट्रॅलीप्रोल १८.५ एस.सी. चार मिली प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास या रोगांचा प्रादूर्भाव काहीसा कमी करता येणार आहे.उत्पादनात घट होण्याची शक्यतामागील काही दिवसांपासून दररोज येणाऱ्या सरींमुळे कीटकनाशकावरील फवारणी व्यर्थ ठरत आहे. तणनाशकाच्या फवारणीअभावी पिकात तण वाढून पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. तण काढण्यासाठी मजुरांची कमी, मजुरीचे वाढते दर या सर्व अडचणींनी उत्पादन कमी होणार, ही चिंता शेतकºयाला आहे. मागील काही दिवसांपासून सूर्याचे दर्शन झाले नाही. आणखी किती दिवस हेच वातावरण राहणार, हे अनिश्चित आहे. दररोज ढगाळ वातावरण व रिमझिम पाऊस कोसळत आहे. सूर्यप्रकाशाअभावी सोयाबिनवर चक्रभुंगा अळी,कापसावर चुरडा तर तुरीवर पाने गुंडाळणारी अळी तर भाजीपाल्यावर पाने कुरतडणाऱ्या अळ्यांचा मोठा प्रभाव दिसत आहे. परिणामी, सोयाबिनची चाळण होत आहे. चुरड्यामुळे कापसाच्या झाडांची वाढ थांबली आहे. तर सततच्या रिपरिपमुळे सखल भागातील तुरीची झाडे करपत आहेत. शेंडे गुंडाळणाºया अळीमुळे तुरीचे पीक संकटात आले आहे. रोगाच्या प्रभावाबरोबर पोषक वातावरण असल्याने पिकात तणाची वाढ होत आहे. ढगाळ वातावरण व दररोज येणाºया पावसाच्या सरी फवारणीसाठी अडचणीच्या ठरत आहेत. मजुरांची मोठी चणचण असून मजूर मिळणे कठीण झाले आहे. मिळाले तरी मजुरीचे दर व मजूर आणण्यासाठी करावा लागणारा वाहन खर्च, अतिरिक्त सहन करावा लागत आहे. आधी उशिरा पेरणी, दरम्यान पावसाची दीर्घ विश्रांती आणि आता पावसाची सतत रिपरिप यामुळे पिकांची अपेक्षित वाढ झाली नाही. त्यामुळे शेतीचा खर्च वाढणार असला तरी उत्पादन घटणार, यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी