शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

शेकडो हेक्टरमधील कपाशीवर ‘चुरडा’चा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:24 IST

कपाशीवर आलेल्या चुरडा रोगाने राजुरा तालुक्यातलील शेकडो हेक्टर कापसाच्या शेतीला मोठा धोका निर्माण झाल्याने यावर्षी कापसाचे उत्पादन होणार की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना आताच सतावत आहे. महागडे कीटकनाशक औषध फवारणी करूनही पिकांवर आलेला रोगांचा प्रादुर्भाव कमी झाला नाही.

ठळक मुद्देशेतकरी आर्थिक संकटात : राजुरा तालुक्यात कापसाचे उत्पादन घटणार

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : कपाशीवर आलेल्या चुरडा रोगाने राजुरा तालुक्यातलील शेकडो हेक्टर कापसाच्या शेतीला मोठा धोका निर्माण झाल्याने यावर्षी कापसाचे उत्पादन होणार की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना आताच सतावत आहे. महागडे कीटकनाशक औषध फवारणी करूनही पिकांवर आलेला रोगांचा प्रादुर्भाव कमी झाला नाही. त्यामुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, जिवती, वरोरा तालुक्यातील कापसाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. कापूस शेतकऱ्यांचे एकमेव नगदी पिक आहे. परंतू मागील वर्षी बोंडअळीने कापूस आल्यानंतर यावर्षीही कपासीला मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा डंख बसण्याची शक्यता अधिक आहे. यावर्षी कापसाच्या शेतीला मोठा फटका बसण्याची चिन्हे दिसत असून कपासीला विविध रोगाने ग्रासल्याने कपासीच्या झाडांची वाढ पूर्णत: खुंटली आहे. कापसाला यावर्षी पाहिजेत त्या प्रमाणात पोषक वातावरण नसल्याने कापसावर यावर्षी संक्रात येण्याची दाट शक्यता आहे. अतोनात खर्च करूनही उत्पादन झाले नाही तर निराश झालेल्या शेतकऱ्यांनी करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षीही कपाशवर बोंडअळी येण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.राजुरा तालुक्यातील गोवरी, सास्ती, रामपूर, माथरा, पोवनी, साखरी, चार्ली, निर्ली, धिडशी, कढोली, मानोली, बाबपूर, वरोडा, चंदनवाही, चिंचाली, मुठरा, गोयेगाव, अंतरगाव, खामोना, अहेरी, पाचगवा, पांढरपौणी, जिल्ह्यातील बहुतांश भागात कपासीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने यावर्षी कापसाच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे उदासीनतेचे भाव बरेचकाही सांगून जाणारे आहे. पिकांवर केलेला खर्चही निघणार कि नाही याची चिंता आता शेतकऱ्यांना चांगलीच सतावत आहे.कापूस माघारणारकापसाच्या पिकांवर यावर्षी मोठ्या प्रमाणात विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पांढऱ्या सोन्याला उत्पादनात मोठी घट होणार असून त्यांच्या मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. पांढऱ्या सोन्याची यावर्षी होणारी घसरण चिंतेचा विषय असून पांढऱ्या सोन्याची माघार यावर्षी शेतकऱ्यांना अस्वस्थ करणारी आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती