शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो हेक्टरमधील कपाशीवर ‘चुरडा’चा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:24 IST

कपाशीवर आलेल्या चुरडा रोगाने राजुरा तालुक्यातलील शेकडो हेक्टर कापसाच्या शेतीला मोठा धोका निर्माण झाल्याने यावर्षी कापसाचे उत्पादन होणार की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना आताच सतावत आहे. महागडे कीटकनाशक औषध फवारणी करूनही पिकांवर आलेला रोगांचा प्रादुर्भाव कमी झाला नाही.

ठळक मुद्देशेतकरी आर्थिक संकटात : राजुरा तालुक्यात कापसाचे उत्पादन घटणार

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : कपाशीवर आलेल्या चुरडा रोगाने राजुरा तालुक्यातलील शेकडो हेक्टर कापसाच्या शेतीला मोठा धोका निर्माण झाल्याने यावर्षी कापसाचे उत्पादन होणार की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना आताच सतावत आहे. महागडे कीटकनाशक औषध फवारणी करूनही पिकांवर आलेला रोगांचा प्रादुर्भाव कमी झाला नाही. त्यामुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, जिवती, वरोरा तालुक्यातील कापसाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. कापूस शेतकऱ्यांचे एकमेव नगदी पिक आहे. परंतू मागील वर्षी बोंडअळीने कापूस आल्यानंतर यावर्षीही कपासीला मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा डंख बसण्याची शक्यता अधिक आहे. यावर्षी कापसाच्या शेतीला मोठा फटका बसण्याची चिन्हे दिसत असून कपासीला विविध रोगाने ग्रासल्याने कपासीच्या झाडांची वाढ पूर्णत: खुंटली आहे. कापसाला यावर्षी पाहिजेत त्या प्रमाणात पोषक वातावरण नसल्याने कापसावर यावर्षी संक्रात येण्याची दाट शक्यता आहे. अतोनात खर्च करूनही उत्पादन झाले नाही तर निराश झालेल्या शेतकऱ्यांनी करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षीही कपाशवर बोंडअळी येण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.राजुरा तालुक्यातील गोवरी, सास्ती, रामपूर, माथरा, पोवनी, साखरी, चार्ली, निर्ली, धिडशी, कढोली, मानोली, बाबपूर, वरोडा, चंदनवाही, चिंचाली, मुठरा, गोयेगाव, अंतरगाव, खामोना, अहेरी, पाचगवा, पांढरपौणी, जिल्ह्यातील बहुतांश भागात कपासीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने यावर्षी कापसाच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे उदासीनतेचे भाव बरेचकाही सांगून जाणारे आहे. पिकांवर केलेला खर्चही निघणार कि नाही याची चिंता आता शेतकऱ्यांना चांगलीच सतावत आहे.कापूस माघारणारकापसाच्या पिकांवर यावर्षी मोठ्या प्रमाणात विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पांढऱ्या सोन्याला उत्पादनात मोठी घट होणार असून त्यांच्या मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. पांढऱ्या सोन्याची यावर्षी होणारी घसरण चिंतेचा विषय असून पांढऱ्या सोन्याची माघार यावर्षी शेतकऱ्यांना अस्वस्थ करणारी आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती