शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

दारूविक्रीचे वाढले टार्गेट; भरणार 21 कोटींचा गल्ला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2022 05:00 IST

१ एप्रिल २०१५ रोजी जिल्ह्यात दारूबंदी लागू झाली. राज्यातील सत्ता बदलानंतर २७ मे २०२१ रोजी मंत्रिमंडळाने दारूबंदी हटविली. प्रत्यक्षात ७ जून २०२१ पासून दारूविक्री सुरू झाली. जिल्ह्याला एप्रिल २०२२ पर्यंत १५ कोटींचा महसूल मिळाला आहे. डॉ. कुणाल खेमनार समितीने मार्च २०२० मध्ये अहवाल कॅबिनेटपुढे सादर केला. समितीपुढे ४३ हजार ६२७ निवेदन दारूबंदी उठवण्यासाठी तर २५ हजार ८२७  हे दारूबंदी कायम ठेवण्याच्या मागणीसाठी आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य मंत्रिमंडळाने २७ मे २०२१ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्यावर शिक्कामोर्तब केले. या घटनेला बुधवारी एक वर्षे पूर्ण होत आहे. दारू विक्रीतून आतापर्यंत जिल्हा प्रशासनाला १५ कोटींचा महसूल मिळाला. दरम्यान,  दारू विक्रीचा वेग लक्षात घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाला २० कोटी ७५ लाखांचा टार्गेट देण्यात आला आहे.चंद्रपूर जिल्ह्यात अनेक वर्षांपासून दारूबंदीसाठी संघर्ष सुरू होता. स्थानिक पातळीवर अनेक संघटना हे काम करीत होत्या; पण चंद्रपुरात ५ जून २०१० ला दारूबंदीचा खरा लढा सुरू झाला. चंद्रपूरच्या ज्युबिली हायस्कूल श्रमिक एल्गार संघटनेने दारूबंदीची मागणी करणाऱ्या संघटनांना संघटित केले. ४ डिसेंबर ते १० डिसेंबर २०२० रोजी दारूबंदीच्या मागणीसाठी चिमूर ते नागपूर पदयात्रा (विधानसभेवर) काढण्यात आली. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत आवाज उठविला. त्यामुळे फेब्रुवारी २०११ मध्ये तत्कालीन पालकमंत्री संजय देवतळे यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने एक समिती तयार केली.समितीने  फेब्रुवारी २०१२ मध्ये मुख्यमंत्र्यांना अहवाल सुपुर्द केला होता. त्यानंतर १ एप्रिल २०१५ रोजी जिल्ह्यात दारूबंदी लागू झाली. राज्यातील सत्ता बदलानंतर २७ मे २०२१ रोजी मंत्रिमंडळाने दारूबंदी हटविली. प्रत्यक्षात ७ जून २०२१ पासून दारूविक्री सुरू झाली. जिल्ह्याला एप्रिल २०२२ पर्यंत १५ कोटींचा महसूल मिळाला आहे.

२ लाख ८२ हजार सूचना आल्याडॉ. कुणाल खेमनार समितीने मार्च २०२० मध्ये अहवाल कॅबिनेटपुढे सादर केला. समितीपुढे ४३ हजार ६२७ निवेदन दारूबंदी उठवण्यासाठी तर २५ हजार ८२७  हे दारूबंदी कायम ठेवण्याच्या मागणीसाठी आली होती.

१३ सदस्यांची झा समितीमंत्रालयात पुन्हा उच्चस्तरीय बैठक झाली, या बैठकीत आणखी एक समिती स्थापून आढावा घेण्याचे निश्चित झाले. दारूबंदीबाबत अभ्यास करून निष्कर्ष काढण्यासाठी १२ जानेवारी २०२१ रोजी १३ सदस्यांची झा समिती गठित झाली. या समितीने ११ मार्चला सरकारला अहवाल दिला. 

दारूबंदी हटविण्यासाठी नेमके काय-काय घडले ?३ फेब्रुवारी २०२० पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना समिती गठित करण्याचे निर्देश दिले.  दारूबंदीचे फायदे व तोटे याचा अभ्यास करण्यासाठी डॉ. खेमनार यांच्या अध्यक्षेखाली समीक्षा समितीने १० फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२० पर्यंत लिखित स्वरूपात अभिप्राय मागविले होते. 

२७ मे २०२१ रोजी मंत्रिमंडळाने हटविली दारूबंदीझा समितीच्या शिफारशीनंतर राज्य मंत्रिमंडळाने २७ मे २०२१ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. ७ जून २०२१ पासून जिल्ह्यातील दारू दुकाने सुरू झाली. आता दुकानाची संख्या वाढली.

 

टॅग्स :liquor banदारूबंदी