शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
3
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
4
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
5
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
6
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
7
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
8
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
9
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
10
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
11
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
12
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
13
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
14
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
15
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
16
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
17
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
18
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
19
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
20
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 

ग्रामीण भागातील दुकानाच्या वेळा वाढवाव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:19 IST

पर्यटन केंद्रावर बंदोबस्त ठेवावा चंद्रपूर : जिल्ह्यात अनेक ठिकाणी तलाव, धबधबे आदी पर्यंटन केंद्रे आहेत. पावसाळ्यात तलाव व धबधबे ...

पर्यटन केंद्रावर बंदोबस्त ठेवावा

चंद्रपूर : जिल्ह्यात अनेक ठिकाणी तलाव, धबधबे आदी पर्यंटन केंद्रे आहेत. पावसाळ्यात तलाव व धबधबे ओसंडून वाहत असल्याने येथे अनेक जण फिरण्यासाठी जात असतात. परंतु, अति उत्साहीपणामध्ये अनेकांनी जीव गमावला आहे. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

पाणी संचय करण्याची गरज

चंद्रपूर : दरवर्षी जिल्ह्याला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. मात्र तरीसुद्धा रेन वाॅटर हार्वेस्टिंगबाबत जनजागृती करण्यात येत नाही. त्यामुळे मनपाने याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. सर्वांनी रेन वाॅटर हार्वेस्टिंगचा उपक्रम आपल्या घरी केल्यास मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीत मुरेल आणि पाणी पातळी वाढण्यास मदत होईल.

मोबाइल दुरुस्तीसाठी गर्दी

चंद्रपूर : जिल्ह्यात एमआय स्टोअरचे केवळ एकच दुकान आहे. येथे जिल्हाभरातील ग्राहक आपला मोबाइल दुरुस्तीसाठी घेऊन येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते. विशेष म्हणजे याच स्टोअरमध्ये नोकिया, लेनेव्हो आदी मोबाइलचेही स्टोअर असल्याने त्या कंपनीचे ग्राहकसुद्धा गर्दी करीत असतात. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एक एमआय स्टोअर देण्यात यावे, अशी मागणी मोबाइल ग्राहकांकडून होत आहे.

एनसीसीच्या विद्यार्थ्यांस अडचण

चंद्रपूर : ज्या विद्यार्थ्यांना पोलीस किंवा आर्मी भरतीमध्ये जाण्याची इच्छा असते अशी मुले एनसीसीमध्ये सहभागी होत असतात. काही जण आठवीपासूनच तर काही जण अकरावीपासून एनसीसीची निवड करत असतात. मात्र कोरोनामुळे शाळा महाविद्यालये बंद असून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे बहुतेक शाळा, महाविद्यालयांत एनसीसीची परेड होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचण जात आहे.

शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे

चंद्रपूर : शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे, यासाठी कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येते. परंतु, ग्रामीण भागात कृषी विभागातील अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर न जाताच शेतकऱ्यांना सल्ला देत असतात. परंतु, ग्रामीण भागातील शेतकरी कृषी विभागात जाऊन साधी माहितीही घेत नाही. त्यामुळे कृषी विभागाने प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांनी मार्गदर्शन करावे, तेव्हाच शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यास मदत होईल.

एक खिडकी योजना राबवावी

चंद्रपूर : प्रत्यक्ष शाळा सुरू झाली नसली तरी ऑनलाइन शाळा सुरू झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध कागदपत्रांची गरज भासत आहे. शासनाने मागील काही वर्षांपूर्वी एक खिडकी योजना राबवून शिक्षणासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे देण्याची मोहीम राबवली होती. आता कोरोनाचा काळ असल्याने विद्यार्थ्यांची धावपळ टाळण्यासाठी एक खिडकी मोहीम राबवावी, अशी मागणी पालकवर्गाकडून होत आहे.