शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
2
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
3
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
4
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
5
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
6
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
7
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव
8
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
9
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
10
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
11
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
12
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
13
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
14
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
15
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
16
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
17
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
18
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
19
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या

नव्या यादीत ब्रह्मपुरी, नागभीडचाही समावेश करा

By admin | Updated: February 22, 2015 01:03 IST

जिल्ह्यातील नऊ तालुक्यांना पुन्हा नक्षलग्रस्ताच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी शासनस्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत.

ब्रह्मपुरी : जिल्ह्यातील नऊ तालुक्यांना पुन्हा नक्षलग्रस्ताच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी शासनस्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. ब्रह्मपुरी व नागभीड तालुक्यात नक्षल्यांची पत्रके आढळून आली. नक्षल्यांवर कारवाईदेखील झाली. तरीही हे तालुके नक्षलग्रस्त घोषित केले जात नसल्याने या तालुक्यांवर शासनस्तरावर दुर्लक्ष होत आहे. नव्या यादीत या दोन्ही तालुक्याचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांची आहे.राज्यातील नक्षलग्रस्त भाग घोषित करण्यासाठी दरवर्षी जानेवारी महिन्यात आढावा घेतला जातो. या आढाव्यानंतर आवश्यकतेनुसार नक्षलग्रस्त भाग वगळायचा की ठेवायचा हे ठरविले जाते. सन २०१२ मध्ये वडसा रोडवरील आमले बी.एड कॉलेजवळ नक्षली पत्रके रस्त्याने फेकली होती. तसेच नागभीड तालुक्यात तळोधी (बा.) येथे बसस्थानकावरुन पुनवटकर नावाच्या नक्षलवाद्यास पकडले होते. या दोन्ही घटना तालुक्यासाठी मोठ्या असूनही ही दोन्ही तालुके नक्षलग्रस्त घोषित का केली जात नाही, असा प्रश्न नागरिकांसह कर्मचारी करीत आहेत. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये नक्षली कारवाया अजूनपर्यंत आढळून आल्या नाही. तरी ते तालुके नक्षलग्रस्त म्हणून घोषित झाले होते व पुन्हा हालचाली त्याच तालुक्यांच्या बाबतीत होताना दिसत आहे. त्यामुळे ब्रह्मपुरी व नागभीड तालुक्यांवर हा अन्याय होत असल्याचे बोलले जात आहे. ब्रह्मपुरी तालुका हा आरमोरीला लागून असल्याने नक्षल कारवाया होत असतात. नव्याने तयार होणाऱ्या नक्षलग्रस्तांच्या यादीमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ब्रह्मपुरी व नागभीड तालुक्यांचा समावेश करावा व यापूर्वी या तालुक्यांवर झालेला अन्याय दूर करावा, अशी मागणी दोन्ही तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)