शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गापूरच्या ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राचे उद्घाटन

By admin | Updated: October 14, 2015 01:24 IST

राज्याला वीज देण्याचे राष्ट्रीय कार्य चंद्रपूरकरांनी केलेले आहे. चंद्रपूरच्या विकासासाठी संपूर्णरित्या विकासाच्या दृष्टीने प्राधान्य देण्यात येणार असून ....

चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास : डिसेंबर २०१६ अखेरपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला वीज जोडणी मिळणारचंद्रपूर : राज्याला वीज देण्याचे राष्ट्रीय कार्य चंद्रपूरकरांनी केलेले आहे. चंद्रपूरच्या विकासासाठी संपूर्णरित्या विकासाच्या दृष्टीने प्राधान्य देण्यात येणार असून जिल्ह्याचा कायापालट करण्याची ग्वाही नवीन व नवीकरणीय व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. तसेच डिसेंबर २०१६ अखेरपर्यंत एकही शेतकरी वीज जोडणीपासून वंचित राहणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.पुनर्रचित गतिमान विद्युत विकास आणि सुधारणा कार्यक्रमांतर्गत दुगार्पूर येथील ३३ के. व्ही. विद्युत उपकेंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्थ व नियोजन मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार होते. प्रमुख अतिथी म्हणून खासदार अशोक नेते, महापौर राखी कंचर्लावार, आमदार नाना शामकुळे, आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, महावितरणचे कार्यकारी संचालक संजय ताकसांडे, नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता प्रसाद रेश्मे, चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अंकुश नाळे , पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता उमेश शहारे आदी उपस्थित होते.उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, चंद्रपूरकरांनी राज्याला वीज देऊन राष्ट्रीय कार्यात मोलाचा वाटा उचललेला आहे. या जिल्ह्यात ३५ वर्षांहून अधिक काळाचे जुने खांब, प्रकल्प यामुळे वीज निर्मितीवरही परिणाम होतो आहे. त्यामुळे आपल्याला सौर उर्जेचाही वापर करण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे. तसेच चंद्रपूर आणि बल्लारशाह या ठिकाणी भूमिगत वाहिन्यांनी शहराला वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणने नियोजन करावे. शेतकऱ्यांना जून २०१६ पर्यंत संपूर्ण कृषी पंपाची वीज जोडणी द्यावी, त्याचबरोबर यापुढील काळात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी स्वत: शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहचवून त्यांना वीज सेवेचा लाभ देऊन ते वीज जोडणीपासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असेही ते म्हणाले.अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूरच्या जनतेची मागणी विचारात घेऊन चंद्रपूरच्या विकासासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करून या जिल्ह्यासह गडचिरोली जिल्ह्याला न्याय देण्याचे कार्य उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. त्यांचे नियोजन अतिशय बारकाईचे असते. आमचे शासन राज्याच्या प्रगतीसह चंद्रपूरच्या विकासासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत चंद्रपूर शहराचा कायापलट करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी आमदार नाना श्यामकुळे यांनीही कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधीतून अधिकाधिक प्रमाणे जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य देण्यात यावे, असे मत व्यक्त केले. प्रारंभी मान्यवरांचा सत्कार महावितरणतर्फे करण्यात आला. यावेळी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार अशोक नेते, महापौर राखी कंचर्लावार, आमदार नाना श्यामकुळे, आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर यांच्या उपस्थितीत दुगार्पूर येथील ३३ के. व्ही. विद्युत उपकेंद्राचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता अर्चना घोडेस्वार यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)