शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

विकासाबाबत पुढाऱ्यांची अनास्था

By admin | Updated: February 16, 2015 01:15 IST

कोरपना शहराला कधी तालुक्याचा दर्जा मिळेल असे वाटले नाही. मात्र तो मिळाला. त्यामुळे शहराचा विकास होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त झाली.

मनोज गोरे कोरपनाकोरपना शहराला कधी तालुक्याचा दर्जा मिळेल असे वाटले नाही. मात्र तो मिळाला. त्यामुळे शहराचा विकास होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त झाली. मात्र राजकीय पुढाऱ्यांच्या अनास्थेमुळे अद्यापही हे तालुकास्तराचे शहर अद्यापही अविकसित आहे. पूर्वी राजुरा तालुक्यात जिवती आणि कोरपना तालुक्याचा समावेश होता. मात्र त्यानंतर कोरपना तालुक्याची निर्मिती झाली. चंद्रपूर, यवतमाळ व आदिलाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या कोरपना शहराला गेल्या काही वर्षात महत्त्व प्राप्त झाले आहे. या तालुक्याची आदिवासी नक्षलग्रस्त तालुका म्हणून ओळख असून तालुक्यातील समस्या मात्र अद्यापही सुटू शकल्या नाहीत. शासनाने आता तालुका स्थळाना नगर पालिकेचा दर्जा देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. तशी घोषणाही झाली. त्यामुळे कोरपना शहराचे झपाट्याने नागरीकरण होत आहे. मात्र शहरासह तालुक्यातील समस्या सोडवण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांनी कधीच प्रयत्न केला नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. येथील भारत संचार निगमच्या कार्यालयातील भोंगळ कारभाराने नागरिक त्रस्त झाले आहेत. इंटरनेटच्या अधिक वापराने आता लॅण्डलाईनधारकांची संख्या वाढली आहे. अशात या कार्यालयाकडून नियमित मासिक बिलाचे वितरण करण्यात येत नसल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. दोन महिन्यानंतर एकदाच बिलाचे वितरण करण्यात येते. परिणामी ग्राहकांचे आर्थिक नियोजन तर बिघडत आहे. सोबतच सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.शासनाकडून लाखो रुपयांचे तलावाच्या सौंदर्यीकरणाकरिता येत असतात. मात्र आजघडीला कोरपना येथील तलावाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या सौंदर्यीकरणाकडे लक्ष देण्याची गरज आहे. या तलावाच्या परिसरात संपूर्ण अस्वच्छता पसरली आहे. तलावाचे सौदर्यींकरण झाल्यास येथील नागरिकांना विसावा घेण्यासाठी महत्त्वाचे ठिकाण ठरणार आहे. शहरात वाढती लोकसंख्या लक्षात घेता कोट्यवधी रुपयांची पाण्याची टाकी शोभेची वास्तू ठरली आहे. कोरपना चौक कसे गजबजलेले असतात. बसस्थानक नसल्याने मिळेल त्या जागेवर उभे राहून प्रवासी बसची प्रतीक्षा करतात. मात्र येथे बसस्थानक व्हावे, यासाठी कुणीही पुढाकार घेताना दिसत नाही.