शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

आदिवासी मुलींच्या वसतिगृहात पाण्याविना ठणठणाट, तक्रारीनंतरही प्राचार्य, गृहपालचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 15:52 IST

विद्यार्थिनींची भटकंती

चंद्रपूर : येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (मुलींची) आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील पाणीपुरवठा मागील १५ दिवसांपासून बंद असल्याने निवासी मुली तसेच आयटीआयमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या मुलींना भरउन्हात पाण्याकरिता भटकावे लागत आहे.

नेहमी कागदावरच खरेदी प्रक्रिया राबविणारी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पिण्याच्या पाण्याच्य समस्येमुळे चर्चेत आहे. संस्थेच्या प्राचार्यांकडे मौखिक व लेखी तक्रार करूनही दुर्लक्ष केल्यामुळे प्रशिक्षणार्थी मुलींमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. मुलींच्या वसतिगृहाची जबाबदारी ही त्याच आयटीआयमध्ये कार्यरत भांडारपाल यांच्या पत्नीकडे आहे. वसतिगृह गृहपाल बाहेरगावी गेल्याने मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी फक्त पुरुष सुरक्षारक्षकावर आहे. वसतिगृहात ५० विद्यार्थिनी राहतात.

आयटीआयमध्ये २५० प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेतात; पण, मागील १५ दिवसांपासून पिण्याचे पाणी नाही. त्यामुळे प्रशिक्षणार्थींना बोअरवेलद्वारे येणारे दूषित व क्षारयुक्त पाणी प्यावे लागत आहे. यातून त्यांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत आहे. प्रशिक्षणार्थीकडून पाठपुरावा करूनही प्राचार्यांनी पाण्याची समस्या न सोडवल्यामुळे हाल होत असल्याने वसतिगृहातील काही विद्यार्थिनी स्वगावी गेल्याचे समजते.

५० मुलींना एकच कुलर तर अधीक्षकाकडे दोन

सर्वाधिक उष्ण शहरात चंद्रपूरचा समावेश आहे. सूर्य आग ओकत असल्याने घरोघरी, कार्यालये येथे एसी, कुलर लावल्या जाात आहे. मात्र, या आदिवासी मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या ५० प्रशिक्षणार्थीकरिता एकच कुलर आहे. दुसरीकडे या संस्थेच्या वसाहतीत राहणाऱ्या भांडारपाल व वसतिगृह अधीक्षकाच्या घरीसंस्थेमार्फत दोन कुलर का? असा प्रश्न विचारला जात आहे.

टॅग्स :Socialसामाजिकchandrapur-acचंद्रपूर