शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मृत्यूनंतरही ते पाहणार जग; सहा जणांचे नेत्रदान, १२ जणांच्या आयुष्यात येणार उजेड

By परिमल डोहणे | Updated: January 29, 2024 17:42 IST

यातून जवळपास १२ जणांच्या आयुष्यात उजेड येणार आहे.

चंद्रपूर : ‘असेल दृष्टी, तर दिसेल सृष्टी’ या पंक्तीप्रमाणे दृष्टी असणाऱ्यालाच हे सुंदर जग बघता येते. मात्र, ज्यांना डोळे नाहीत, अशा व्यक्तींना आपण दृष्टी देऊन त्यांच्या जीवनात प्रकाश आणण्याच्या दृष्टीने मागील वर्षभरात चंद्रपुरात तब्बल सहा जणांनी नेत्रदान केले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील चमूने पाच जणांच्या घरी सहा तासांच्या आत जाऊन, तर एकाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच नातेवाइकांच्या संमतीने डोळे काढले आहेत. यातून जवळपास १२ जणांच्या आयुष्यात उजेड येणार आहे.

एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन व्यक्तींच्या जीवनात प्रकाश निर्माण होतो. त्यामुळे नेत्रदानासाठी नागरिकांनी पुढे यावे, याबाबत आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. मरणोत्तर नेत्रदान करण्याचा संकल्प करणारे बरेच असतात. मात्र, प्रत्यक्षात नेत्रदानासाठी नातेवाइकांची संमती फारशी मिळत नसल्याचे चित्र दिसून येते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सन २०२३ मध्ये सहा जणांचे डोळे व बुबुळ काढण्यात आले आहेत. हे डोळे दृष्टिहीनांवर प्रत्यारोपित करण्यात येणार आहेत. त्यामुळे १२ जणांच्या आयुष्यात उजेड येणार आहे.कोट

आमच्या विभागातर्फे नेत्रदानाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. एखाद्या व्यक्तीने नेत्रदानासाठी इच्छापत्र लिहून दिले असल्यास, त्याच्या मृत्यूनंतर त्याचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणींनी त्याच्या इच्छेचा आदर ठेवून नेत्रदानाकरिता सहमती दर्शविल्यास सहा तासांच्या आत त्याचे डोळे काढण्यात येतात. सन २०२३ मध्ये सहा जणांचे डोळे काढण्यात आले आहेत. त्यातून १२ जणांना नवी दृष्टी मिळणार आहे. -मिलिंद कांबळे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर

नेत्रदान कोणी करू नये

नेत्रदान हे जरी चांगले असले तरी सगळ्याच व्यक्ती नेत्रदान करू शकत नाहीत. अचानक मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे डोळे दान होऊ शकत नाहीत, तसेच रेबीज, सिफिल्स, सांसर्गिक कावीळ, सेप्टिसेमिया आणि एड्स, अशा रोगाने बाधित असणाऱ्यांना डोळे दान करता येत नाहीत.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर