शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘अस्मिता’ योजनेची अंमलबजावणी कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 23:22 IST

महिला व विद्यार्थिनींना माफक दरात ‘सॅनिटरी नॅपकिन्स’ मिळावे, यासाठी शासनाने ८ मार्चपासून अस्मिता योजनेची सुरुवात केली. मात्र जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी थंडबस्त्यात दिसून येत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : महिला व विद्यार्थिनींमध्ये नाराजी

परिमल डोहणे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महिला व विद्यार्थिनींना माफक दरात ‘सॅनिटरी नॅपकिन्स’ मिळावे, यासाठी शासनाने ८ मार्चपासून अस्मिता योजनेची सुरुवात केली. मात्र जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी थंडबस्त्यात दिसून येत आहे.राज्यातील ग्रामीण भागातील महिला व किशोरवयीन मुली तसेच जिल्हा परिषद शाळांमधील ११ ते १९ या वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये सॅनिटरी नॅपकिन व वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीव जागृती करण्यासाठी तसेच महिला व मुलींना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याकरिता राज्यात ‘अस्मिता’ योजना प्रभावीपणे राबविण्याचा दावा सरकारने केला होता. या अभियानाअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना २४० मिमी आकाराची सॅनिटरी नॅपकिन २४ रुपये तसेच २८० मिमी आकाराची सॅनिटरी नॅपकिन २९ रुपयाला देण्याचे जाहीर करण्यात आले. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद शाळांमधील ११ ते १९ वयोगटांमधील किशोरवयीन मुलींसाठी अनुदान तत्वावर केवळ आठ नॅपकिन्सचे पॅकेट पाच रूपयाला दिले जाणार होते. पुरवठा करण्याची जबाबदारी बचतगटांना दिल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. यातून बचतगटांना रोजगार मिळणार होता. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यात ही योजना थंडबस्त्यात दिसून येत आहे.विद्यार्थिनी अस्मिता कॉर्डपासून अनभिज्ञजिल्हा परिषद शाळांमधील ११ ते १९ या वयोगटातील किशोरवयीन मुलींसाठी ही योजना अनुदान तत्त्वावर राबविण्यात येणार होती. यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद शाळांमधील मुलींना ‘अस्मिता कार्ड’ मिळणार होते. कॉर्डद्वारे मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीसह शाळेमधील सर्व ११ ते १९ वयोगटातील मुलींची यादी ग्रामपंचायतीमधील ‘आपले सरकार’ केंद्रावर जमा केल्यानंतर केंद्रप्रमुख पात्र लाभार्थ्यांची शाळेमधून जावून निवड करणार होते. नोंदणी झालेल्या सर्व मुलींना येस बँकतर्फे ‘अस्मिता कार्ड’ देण्यात येणार होते. मात्र अद्याप अस्मिता कॉर्ड तयार करण्यात आले नाही. तर काही विद्यार्थिनी या कॉर्डबाबत पूर्णत: अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे.ग्रामीण भागात अनेक गैरसमजमासिक पाळीबाबत आजही ग्रामीण भागात अनेक गैरसमज आहेत. महिलांना मासिक पाळी आल्यानंतर घराच्या बाहेर ठेवल्या जाते. पॅड महाग असल्यामुळे अनेक महिला पॅडऐवजी कापडाचा वापर करतात. त्यामुळे त्यांना त्वचेचे रोग होण्याची शक्यता आहे. ही योजना ग्रामीण भागातील महिला व मुलींना लाभदायक असली तरी अंमलबजावणी थंडबस्त्यात आहे. विविध संघटनांनी महिलांमधील गैरसमज दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा.योजनेचे महत्त्व लक्षात घेऊन जागृती केली जात आहे. मात्र मार्च ते एप्रिलदरम्यान शाळेला सुट्ट्या होत्या. त्यामुळे काही अडचणी आल्यात. ११ ते १९ वयोगटातील १३ हजार विद्यार्थिनी जि. प. शाळेत शिक्षण घेत आहे. आपले सरकार सेवा केंद्रात ९ हजार विद्यार्थिनींनी नोंदणी केली. यातील २१०० मुलींचे कार्ड आले. गटशिक्षणाधिकाºयांमार्फत हे कार्ड विद्यार्थिनींना लवकरच वाटप करू.- दीपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)