शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 06:00 IST

देशातील चेन्नई या शहराची लोकसंख्या दहा मिलियन एवढी आहे. दरवर्षी याठिकाणी पाऊस होतो. परंतु त्याचे नियोजन नसल्यामुळे ते पाणी वाहून जाते. यासोबतच भारताची आर्थिक राजधानी मुंबई या शहरालासुद्धा पाणीटंचाईने ग्रासले आहे. आयटी क्षेत्रातील अग्रगण्य हैदराबाद आणि बेंगलोर ही शहरेसुद्धा आज पाणीटंचाईने संकटात सापडलेली आहेत.

ठळक मुद्देबाळू धानोरकर : लोकसभेचे वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भारतात मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान होते. तरीसुद्धा देशातील मोठी शहरे आज तहानलेलीच आहे. त्यामुळे शासन रखडलेले सिंचन प्रकल्प केव्हा पूर्ण करणार, असा प्रश्न चंद्रपूर-आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांनी लोकसभेचे प्रश्नोत्तराच्या तासात मांडला.देशातील चेन्नई या शहराची लोकसंख्या दहा मिलियन एवढी आहे. दरवर्षी याठिकाणी पाऊस होतो. परंतु त्याचे नियोजन नसल्यामुळे ते पाणी वाहून जाते. यासोबतच भारताची आर्थिक राजधानी मुंबई या शहरालासुद्धा पाणीटंचाईने ग्रासले आहे.आयटी क्षेत्रातील अग्रगण्य हैदराबाद आणि बेंगलोर ही शहरेसुद्धा आज पाणीटंचाईने संकटात सापडलेली आहेत. कृषिप्रधान भारताची अर्थव्यवस्था मान्सूनच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे या पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. आज या मोठया शहारांसह ग्रामीण भाग सिंचनाच्या अभावामुळे पाण्याच्या समस्येला तोंड देत आहे.शेतकऱ्यांच्या पिकांवर त्याचा विपरित परिणाम झाला असून शेतकऱ्यांच्या आत्महत्यासुद्धा वाढल्या असल्याचे खासदार बाळू धानोरकर म्हणाले.चंद्रपूर जिल्ह्यात लोअर पैनगंगा, गोसेखुर्द यासारखे मोठे जलसिंचन प्रकल्प आहेत.मात्र राज्यातील सरकारच्या नियोजनशून्यते मुळे हे प्रकल्प अपूर्ण आहेत. ते केव्हा पूर्ण होणार याची माहिती शासनाने सभागृहाला द्यावी, असे खासदार बाळू धानोरकर म्हणाले. याशिवाय समुद्राचे पाणी शुद्ध करून त्याचा वापर शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्यासाठी करण्याची काही योजना शासनाची आहे काय, याबद्दलही खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विचारले. शासनाने नद्यांवर बंधारे बांधण्याची योजना असल्यास जलसिंचनाची समस्या सुटू शकेल आणि दुष्काळावर मात करता येईल, असे ते म्हणाले. याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यातील विविध प्रश्नांकडे ख्नासदार बाळू धानोरकर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.