शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
4
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
5
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
6
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
7
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
10
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
11
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
12
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
13
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
14
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
19
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
20
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!

जनावरांच्या औषधांची अवैधरित्या विक्री

By admin | Updated: July 31, 2015 01:25 IST

तालुक्यातील मौजा भंगाराम तळोधी येथे आंध्रप्रदेश राज्यातून जनावरांची औषधे खरेदी करुन ती तालुक्यात अनाधिकृतपणे विक्री केल्या जात आहे.

प्रशासनाकडे तक्रार : मात्र कारवाईत दिरंगाई, पत्रपरिषदेत आरोपगोंडपिपरी : तालुक्यातील मौजा भंगाराम तळोधी येथे आंध्रप्रदेश राज्यातून जनावरांची औषधे खरेदी करुन ती तालुक्यात अनाधिकृतपणे विक्री केल्या जात आहे. विशेष म्हणजे, याबाबतची तक्रार चंद्रपूर येथील अन्न, औषध प्रशासन विभागाकडे केली असता तब्बल सात दिवसांनी तक्रारीची दखल घेण्यात येऊन थातूर-मातूर कारवाई करण्यात आली. त्यामुळे हा प्रकार सुरूच असून औषधांची अवैध विक्री करणाऱ्यास अभय दिला जात असल्याचा आरोप भंगाराम तळोधी मारोती येग्गेवार यांनी पत्रपरिषदेतून केला आहे. तालुक्यातील मौजा भंगाराम तळोधी येथील मारोती अम्मावार नामक इसम गेल्या दोन ते तीन वर्षापासून आंध्रप्रदेश राज्यासह नजीकच्या गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी व अन्य तालुक्याच्या पशुधन अधिकाऱ्यांकडून कमी दरात जनावरांचा औषधीसाठा आणून गावात अधिक भावाने विक्री करीत आहे. अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याने याबाबत एका नागरिकाने २२ जुलै रोजी चंद्रपूर येथील अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार केली. मात्र संबंधित विभागाने सदर तक्रारीची उशिरा दखल घेतली. २७ जुलै रोजी विभागाचे निरीक्षक ग. क्र. नांदेकर यांनी भंगाराम तळोधी येथे भेट देऊन अनाधिकृतपणे औषधे विक्री करण्याचा आरोप असलेल्या मारोती अम्मावार यांच्या घरी धाड टाकली. काही औषधींची चाचपणी केली. मात्र सदर कारवाई करताना तक्रारीनंतर आठवडाभराहून अधिक कालावधी लोटल्याने औषध विक्री करणाऱ्याने जवळच्या साठयाची विल्हेवाट लावली. नंतर फक्त शेळी मेंढी पालनचा आपला व्यवसाय असल्याचे सांगून अशी अवैध विक्री करीत नसल्याचे सांगितले. तत्पूर्वी याच इसमाकडून मागील एक ते दोन वर्षापूर्वी भं. तळोधी येथीलच काही शेळ्या मेंढ्या पालनकर्त्या व्यवसायीकांनी औषधी खरेदी करुन जनावरांना दिल्याने शेकडो शेळ्यांना मृत्यूमुखी पडावे लागल्याची माहितीदेखील पत्रपरिषदेत देण्यात आली. अन्न, औषध विभागाच्या निरीक्षक जी. के. नांदेकर यांनी हेतुपूरस्सरपणे संबंधितांवर कारवाई टाळण्यासाठी दिरंगाई करुन उलट तक्रारकर्ता व एका मेडीकल स्टोअर्सच्या मालकाला नाहक धारेवर धरत अवैध औषध विक्रेत्याला अभय दिल्याचा आरोप तंमुस अध्यक्ष संजय रामगोनवार यांनी केला आहे. तक्रार प्राप्तीनंतर संबंधित ठिकाणी भेट देऊन थातूर-मातूर पंचनामा करीत अवैध औषध विक्रेत्याची पाठराखण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेत केली. (तालुका प्रतिनिधी)