शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

जनावरांच्या औषधांची अवैधरित्या विक्री

By admin | Updated: July 31, 2015 01:25 IST

तालुक्यातील मौजा भंगाराम तळोधी येथे आंध्रप्रदेश राज्यातून जनावरांची औषधे खरेदी करुन ती तालुक्यात अनाधिकृतपणे विक्री केल्या जात आहे.

प्रशासनाकडे तक्रार : मात्र कारवाईत दिरंगाई, पत्रपरिषदेत आरोपगोंडपिपरी : तालुक्यातील मौजा भंगाराम तळोधी येथे आंध्रप्रदेश राज्यातून जनावरांची औषधे खरेदी करुन ती तालुक्यात अनाधिकृतपणे विक्री केल्या जात आहे. विशेष म्हणजे, याबाबतची तक्रार चंद्रपूर येथील अन्न, औषध प्रशासन विभागाकडे केली असता तब्बल सात दिवसांनी तक्रारीची दखल घेण्यात येऊन थातूर-मातूर कारवाई करण्यात आली. त्यामुळे हा प्रकार सुरूच असून औषधांची अवैध विक्री करणाऱ्यास अभय दिला जात असल्याचा आरोप भंगाराम तळोधी मारोती येग्गेवार यांनी पत्रपरिषदेतून केला आहे. तालुक्यातील मौजा भंगाराम तळोधी येथील मारोती अम्मावार नामक इसम गेल्या दोन ते तीन वर्षापासून आंध्रप्रदेश राज्यासह नजीकच्या गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी व अन्य तालुक्याच्या पशुधन अधिकाऱ्यांकडून कमी दरात जनावरांचा औषधीसाठा आणून गावात अधिक भावाने विक्री करीत आहे. अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याने याबाबत एका नागरिकाने २२ जुलै रोजी चंद्रपूर येथील अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार केली. मात्र संबंधित विभागाने सदर तक्रारीची उशिरा दखल घेतली. २७ जुलै रोजी विभागाचे निरीक्षक ग. क्र. नांदेकर यांनी भंगाराम तळोधी येथे भेट देऊन अनाधिकृतपणे औषधे विक्री करण्याचा आरोप असलेल्या मारोती अम्मावार यांच्या घरी धाड टाकली. काही औषधींची चाचपणी केली. मात्र सदर कारवाई करताना तक्रारीनंतर आठवडाभराहून अधिक कालावधी लोटल्याने औषध विक्री करणाऱ्याने जवळच्या साठयाची विल्हेवाट लावली. नंतर फक्त शेळी मेंढी पालनचा आपला व्यवसाय असल्याचे सांगून अशी अवैध विक्री करीत नसल्याचे सांगितले. तत्पूर्वी याच इसमाकडून मागील एक ते दोन वर्षापूर्वी भं. तळोधी येथीलच काही शेळ्या मेंढ्या पालनकर्त्या व्यवसायीकांनी औषधी खरेदी करुन जनावरांना दिल्याने शेकडो शेळ्यांना मृत्यूमुखी पडावे लागल्याची माहितीदेखील पत्रपरिषदेत देण्यात आली. अन्न, औषध विभागाच्या निरीक्षक जी. के. नांदेकर यांनी हेतुपूरस्सरपणे संबंधितांवर कारवाई टाळण्यासाठी दिरंगाई करुन उलट तक्रारकर्ता व एका मेडीकल स्टोअर्सच्या मालकाला नाहक धारेवर धरत अवैध औषध विक्रेत्याला अभय दिल्याचा आरोप तंमुस अध्यक्ष संजय रामगोनवार यांनी केला आहे. तक्रार प्राप्तीनंतर संबंधित ठिकाणी भेट देऊन थातूर-मातूर पंचनामा करीत अवैध औषध विक्रेत्याची पाठराखण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेत केली. (तालुका प्रतिनिधी)