शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

चंदनखेड्यातील फळवाटिकेकडे दुर्लक्ष

By admin | Updated: June 25, 2015 01:24 IST

शासनाच्या विविध योजना अंतर्गत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम जोरात हाती घेण्यात येत आहे.

चंदनखेडा: शासनाच्या विविध योजना अंतर्गत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम जोरात हाती घेण्यात येत आहे. परंतु यापूर्वी रोपवन केलेल्या लिंबाच्या फळवाटिकाकडे ग्रामपंचयतीचे पूर्णत: दुर्लक्ष असून ही फळवाटिका लोकासाठी शौचालयाकरिता मोकळे रान ठरली आहे.अनेक वर्षापूर्वी सामाजिक वनीकरण अंतर्गत जि.प. शाळा परिसरात असलेल्या जमिनीवर ग्रामपंचायतीमार्फत लिंबाच्या झाडाचे रोपण करुन फळवाटिका तयार करण्यात आली व काही वर्षातच या झाडापासून ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळावे, यासाठी वार्षिक लिलाव करुन त्यापासून येणारे उत्पन्न ग्रामपंचायतीमध्ये जमा करण्यात येत होते. परंतु वृक्षारोपणासंदर्भात शासनाच्या विविध नवीन योजना व भरपूर निधी येत गेल्याने या फळवाटिकेकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत गेले. सदर झाडांना कुठलेही कुंपन व नियंत्रण नसल्याने ही फळवाटिका शौचालयास बाहेर जात असलेल्या व्यक्तीसाठी जणू संरक्षित जागाच झाल्याचे दिसून येत आहे.एकीकडे पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना असो की रोजगार हमी योजना असो, कुठल्या ना कुठल्या योजनेच्या माध्यमातून लाखो रुपयांचे वृक्षारोपण तथा जतन कार्यक्रम कृषी विभाग, ग्रामपंचायत तसेच वनविभागाच्या देखरेखीखाली सुरु आहे. झाडाच्या संगोपनात तनकचरा सफाई, संरक्षण कठडे तसेच उन्हाळ्यात दूरवरुन पाणी आणून पाण्याची व्यवस्था मजुराद्वारा केली जाते. असे असताना काही व्यक्तीकडून शेतशिवारात धुरे पेटविण्यासाठी वनवा लावला जातो. परंतु निष्काळजीपणामुळे आगीवर नियंत्रण करु न शकल्याने शेतालगत रोपन केलेल्या वृक्षाना या आगीत भस्म व्हावे लागत आहे. यात लाखो रुपये पाण्यात जात आहे. दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या फळवाटिकेकडे दुर्लक्ष केले जाते. हा विरोधाभास कधी संपणार, यात कधी बदल होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)