शहरं
Join us  
Trending Stories
1
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
2
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
3
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
4
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
5
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

चंदनखेड्यातील फळवाटिकेकडे दुर्लक्ष

By admin | Updated: June 25, 2015 01:24 IST

शासनाच्या विविध योजना अंतर्गत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम जोरात हाती घेण्यात येत आहे.

चंदनखेडा: शासनाच्या विविध योजना अंतर्गत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम जोरात हाती घेण्यात येत आहे. परंतु यापूर्वी रोपवन केलेल्या लिंबाच्या फळवाटिकाकडे ग्रामपंचयतीचे पूर्णत: दुर्लक्ष असून ही फळवाटिका लोकासाठी शौचालयाकरिता मोकळे रान ठरली आहे.अनेक वर्षापूर्वी सामाजिक वनीकरण अंतर्गत जि.प. शाळा परिसरात असलेल्या जमिनीवर ग्रामपंचायतीमार्फत लिंबाच्या झाडाचे रोपण करुन फळवाटिका तयार करण्यात आली व काही वर्षातच या झाडापासून ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळावे, यासाठी वार्षिक लिलाव करुन त्यापासून येणारे उत्पन्न ग्रामपंचायतीमध्ये जमा करण्यात येत होते. परंतु वृक्षारोपणासंदर्भात शासनाच्या विविध नवीन योजना व भरपूर निधी येत गेल्याने या फळवाटिकेकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत गेले. सदर झाडांना कुठलेही कुंपन व नियंत्रण नसल्याने ही फळवाटिका शौचालयास बाहेर जात असलेल्या व्यक्तीसाठी जणू संरक्षित जागाच झाल्याचे दिसून येत आहे.एकीकडे पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना असो की रोजगार हमी योजना असो, कुठल्या ना कुठल्या योजनेच्या माध्यमातून लाखो रुपयांचे वृक्षारोपण तथा जतन कार्यक्रम कृषी विभाग, ग्रामपंचायत तसेच वनविभागाच्या देखरेखीखाली सुरु आहे. झाडाच्या संगोपनात तनकचरा सफाई, संरक्षण कठडे तसेच उन्हाळ्यात दूरवरुन पाणी आणून पाण्याची व्यवस्था मजुराद्वारा केली जाते. असे असताना काही व्यक्तीकडून शेतशिवारात धुरे पेटविण्यासाठी वनवा लावला जातो. परंतु निष्काळजीपणामुळे आगीवर नियंत्रण करु न शकल्याने शेतालगत रोपन केलेल्या वृक्षाना या आगीत भस्म व्हावे लागत आहे. यात लाखो रुपये पाण्यात जात आहे. दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या फळवाटिकेकडे दुर्लक्ष केले जाते. हा विरोधाभास कधी संपणार, यात कधी बदल होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)