शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

चंदनखेड्यातील फळवाटिकेकडे दुर्लक्ष

By admin | Updated: June 25, 2015 01:24 IST

शासनाच्या विविध योजना अंतर्गत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम जोरात हाती घेण्यात येत आहे.

चंदनखेडा: शासनाच्या विविध योजना अंतर्गत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम जोरात हाती घेण्यात येत आहे. परंतु यापूर्वी रोपवन केलेल्या लिंबाच्या फळवाटिकाकडे ग्रामपंचयतीचे पूर्णत: दुर्लक्ष असून ही फळवाटिका लोकासाठी शौचालयाकरिता मोकळे रान ठरली आहे.अनेक वर्षापूर्वी सामाजिक वनीकरण अंतर्गत जि.प. शाळा परिसरात असलेल्या जमिनीवर ग्रामपंचायतीमार्फत लिंबाच्या झाडाचे रोपण करुन फळवाटिका तयार करण्यात आली व काही वर्षातच या झाडापासून ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळावे, यासाठी वार्षिक लिलाव करुन त्यापासून येणारे उत्पन्न ग्रामपंचायतीमध्ये जमा करण्यात येत होते. परंतु वृक्षारोपणासंदर्भात शासनाच्या विविध नवीन योजना व भरपूर निधी येत गेल्याने या फळवाटिकेकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत गेले. सदर झाडांना कुठलेही कुंपन व नियंत्रण नसल्याने ही फळवाटिका शौचालयास बाहेर जात असलेल्या व्यक्तीसाठी जणू संरक्षित जागाच झाल्याचे दिसून येत आहे.एकीकडे पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना असो की रोजगार हमी योजना असो, कुठल्या ना कुठल्या योजनेच्या माध्यमातून लाखो रुपयांचे वृक्षारोपण तथा जतन कार्यक्रम कृषी विभाग, ग्रामपंचायत तसेच वनविभागाच्या देखरेखीखाली सुरु आहे. झाडाच्या संगोपनात तनकचरा सफाई, संरक्षण कठडे तसेच उन्हाळ्यात दूरवरुन पाणी आणून पाण्याची व्यवस्था मजुराद्वारा केली जाते. असे असताना काही व्यक्तीकडून शेतशिवारात धुरे पेटविण्यासाठी वनवा लावला जातो. परंतु निष्काळजीपणामुळे आगीवर नियंत्रण करु न शकल्याने शेतालगत रोपन केलेल्या वृक्षाना या आगीत भस्म व्हावे लागत आहे. यात लाखो रुपये पाण्यात जात आहे. दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या फळवाटिकेकडे दुर्लक्ष केले जाते. हा विरोधाभास कधी संपणार, यात कधी बदल होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)