शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

'ह्या' अटी पूर्ण न केल्यास, हजारो शिधापत्रिकाधारक अपात्र ठरण्याचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 14:36 IST

Chandrapur : बारा वर्षांनंतरही उत्पन्न मर्यादेचा फेरविचार नाही

आशिष देरकरलोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : राज्य शासनाच्या ४ एप्रिल २०२५ रोजीच्या निर्णयानुसार सध्या राज्यभर अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवली जात आहे. राज्यातील लाखो लाभार्थ्यांची पुन्हा एकदा पडताळणी सुरू आहे. मात्र २०१३ पासून उत्पन्न मर्यादा न बदलल्यामुळे तलाठ्यांकडून मर्यादित उत्पन्न दाखला मिळत नाही. त्यामुळे अनेक गरजूंवर अपात्रतेचे संकट निर्माण झाले आहे.

नवीन मोहिमेसाठी शासनाने १७जुलै २०१३ आणि १७ डिसेंबर २०१३ च्या शासन निर्णयातील उत्पन्न मर्यादाच लागू ठेवली आहे. त्यानुसार निराधार आणि अंत्योदय लाभार्थ्यांसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा २१ हजार रुपये आहे, तर प्राधान्य कुटुंबासाठी ती ४४ हजार रुपये आहे. जी शहरी भागासाठी ५९ हजार आहे. दरम्यानच्या १२ वर्षात देशात महागाई व नागरिकांच्या दरडोई उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र शासनाने त्या तुलनेत उत्पन्न मर्यादा वाढविलेली नाही.

ग्रामीण भागात शेतकरी, शेतमजूर, कामगार, लहान व्यावसायिक व इतर व्यवसाय करणाऱ्या नागरिकांचे उत्पन्न वाढलेले असल्याने अनेक तलाठी ४४ हजार रुपयांपर्यंत कमी उत्पन्नाचे दाखले देण्यास नकार देत आहेत.

परिणामी लाभार्थ्यांना वारंवार तहसील कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. काही लाभार्थ्यांना ४५ ते ६० हजार रुपयांचे उत्पन्न दाखले मिळाल्याने स्वस्त धान्य दुकानदार ते मान्य करत नाहीत आणि अशावेळी पुन्हा नवीन दाखला काढावा लागत आहे. एका दाखल्यासाठी सुमारे २०० रुपये खर्च येतो. जो गरीब लाभार्थ्यांवर आर्थिक बोजा निर्माण करणारा ठरतो. अपात्रतेच्या या मोहिमेमुळे गरजूंवर अन्याय होऊ नये यासाठी शासनाने तत्काळ लक्ष घालून योग्य ती सुधारणा करणे अत्यावश्यक आहे.

'लाडकी बहीण' साठी विसंगतीसर्वसामान्यांसाठी उत्पन्न मर्यादा २१ ते ४४ हजार ठेवली असताना 'लाडकी बहीण' योजनेसाठी मात्र अडीच लाख रुपये उत्पन्न मर्यादा ठेवण्यात आली आहे. या विसंगतीमुळे लोकांमध्ये रोष आहे. गत बारा वर्षांत एवढे काहीच बदलले नाही का, असा प्रश्न लाभार्थी करीत आहेत.

"तलाठी आणि तहसील कार्यालयांच्या कामकाजातील समन्वय अभाव, अपूर्ण माहिती आणि वेळोवेळी बदलणाऱ्या निर्देशांमुळे संभ्रम आहे. शासनाने त्वरित उत्पन्न मर्यादेचा फेरविचार करावा."- गरिबांचे नुकसान होत आहे. अशपाक शेख, लाभार्थी

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर