शहरं
Join us  
Trending Stories
1
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
2
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
3
संकष्ट चतुर्थी 2025 : असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
4
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
5
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
6
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
7
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
8
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
9
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
10
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
11
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
12
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
13
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
14
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
15
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
16
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
17
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
18
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
19
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
20
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

पराभूत उमेदवारांना आक्षेप घ्यायचा असल्यास दीड महिना सुरक्षित राहणार 'इव्हीएम'मधील डेटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 13:23 IST

एका उमेदवाराने नोंदविला आक्षेप : आक्षेप नोंदविण्याची मुदत संपली

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : सहाही विधानसभा मतदारसंघांतील एखाद्या पराभूत उमेदवाराने जर ईव्हीएम व मतदानाबद्दल काही आक्षेप नोंदविला तर ईव्हीएममधील डेटा पुढील दीड महिने (४५ दिवस) पोलिस बंदोबस्तात सुरक्षित राहणार आहे. त्यानंतर पराभूत उमेदवाराने आक्षेप घेतल्यास सबळ पुरावा असलेला ईव्हीएम डेटा उपलब्ध होणार नाही. शुक्रवारी (दि. २९) शेवटच्या दिवशी जिल्ह्यातून केवळ एकाच उमेदवाराने चिपसंदर्भात आक्षेप नोंदविल्याची माहिती आहे.

राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रहापुरी, चिमूर व वरोरा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाले. या निकालानंतर काही उमेदवारांकडून ईव्हीएमबाबत आक्षेप घेतले जाऊ शकतात. त्यामुळे निवडणूक आयोगाने आक्षेप नोंद‌विण्यासाठी एक प्रक्रिया ठरवून दिली आहे. त्या प्रक्रियेनुसार उमेदवारांना आक्षेप दाखल करता येते. 

निवडणूक आयोगाच्या निकषानुसार पराभूत झालेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारास एकूण मतदान केंद्रांपैकी पाच टक्के केंद्रांच्या ईव्हीएम मशीनच्या पडताळणीची मागणी करता येते. केंद्रांवरील मतदान यंत्रांवर केवळ मतदानाचे प्रात्यक्षिक घेऊन पडलेली मते आणि व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठया पडताळून पाहता येणार आहेत. प्रत्येक यंत्रासाठी ४० हजार रुपये आणि त्यावर १८ टक्के जीएसटी असे एकूण ४७ हजार २०० रुपये इतके शुल्क आकारण्यात आल्याची माहिती आहे. उमेदवारांना आक्षेप नोंदविण्यासाठी २९ नोव्हेंबर २०२४ ही डेडलाइन देण्यात आली होती. शेवटच्या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील एका उमेदवाराने आक्षेप नोंदविल्याची माहिती आहे. 

सुरक्षित ठेवण्याची संभाव्य कारणे चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात एकूण १८ लाख ५० हजार १०२ मतदारांपैकी १३ लाख १९ हजार ७३६ म्हणजे ७१.३३ टक्के मतदारांनी मतदान केले. एकूण ९४ पैकी राष्ट्रीय व मान्यताप्राप्त पक्षांसह ४८ उमेदवार अपक्ष होते. सर्व अपक्ष उमेदवारांसह ८० जणांचे डिपॉझिट रक्कम जप्त झाले. ईव्हीएमबाबतच्या संभाव्य आक्षेपांकरिता प्रशासनाकडून सर्व ईव्हीएम मशीन्स, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट सुरक्षित ठेवले आहेत. ४५ दिवस या मतदान यंत्रांना सुरक्षित ठेवण्यात येईल. या कालावधीत न्यायालयाने फेरतपासणी, चौकशी व मोजणीचे आदेश दिले तर प्रशासनाला या आदेशाचे पालन करता येणार आहे.

अशी असेल प्रडताळणी प्रक्रिया उमेदवाराने अनामत शुल्काचा भरणा केल्यानंतर त्यांचा अर्ज राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला जाईल. आयोगाकडून २२ डिसेंबरपूर्वी याबाबत पडताळणीची तारीख निश्चित करून दिली जाईल. त्यानुसार निश्चित तारखेला संबंधित उमेदवारांना बोलावून ही पडताळणी करून दाखविली जाईल.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024chandrapur-acचंद्रपूरEVM Machineईव्हीएम मशीनVotingमतदान