शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
4
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
5
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
6
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
7
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
8
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
9
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
10
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
12
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
13
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
14
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
15
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
16
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
17
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
18
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
19
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
20
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले

कोणी मेले तरी, आता नसतात डोळे ओले!

By admin | Updated: January 5, 2015 23:00 IST

राष्ट्रसंत साहित्य विचार परिषद केंद्रीय समिती आणि श्रीगुरुदेव सेवा मंडळ ऊर्जानगर शाखेच्या वतीने आयोजित १३ वे राज्यस्तरीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनातील कविसंमेलन

राष्ट्रसंत साहित्य संमेलन : रंगलेल्या कविसंमेलनात श्रोते दंगरत्नाकर चटप - (कर्मयोगी तुकारामदादा गीताचार्य साहित्य नगरीतून)राष्ट्रसंत साहित्य विचार परिषद केंद्रीय समिती आणि श्रीगुरुदेव सेवा मंडळ ऊर्जानगर शाखेच्या वतीने आयोजित १३ वे राज्यस्तरीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनातील कविसंमेलन विदर्भ राज्यातून आलेल्या कवींच्या कवितांनी चांगलेच बहरले.पुणे येथील प्रसिद्ध कवी वादळकार, प्रा. राजेंद्र सानवणे यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. सुरेश उपगन्लावार, प्राचार्य अनिल मुसळे, ग्रामगिताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या कविसंमेलनात कवींंनी गावगाड्यातील वास्तव विषय व भीषण वर्तमान काव्यातून मांडले. विसापूरचे सुनिल बुटले यांनी जागतिकीकरणात गावाचं गावपण हरवत चालल्याची खंत ‘असे कसे माझे गाव’ कवितेतून मांडली. क्षणभर रसिकालाही विचारप्रवृत्त करायला लावणाऱ्या या कवितेत ते म्हणाले..असे कसे माझे गाव पुरे बदलून गेले,कोणी मेले तरी आता नसतात डोळे ओले.रायगड येथील कवी श्रीकांत धोटे, महाराष्ट्रातील संत महात्म्यांची विशेषत: राष्ट्रसंताची मानवतावादी ओळख आपल्या कवितेतून मांडतांना म्हणाले, मानवतेचा ज्यांनी गुंफीला धागाअसे थोर झाले तुकडोजी बाबा.भंडाऱ्यांचे डोमा महाराज कापगते यांनी स्वच्छ भारत कवितेतून ग्रामस्वच्छता अभियानाचा संदेश दिला. तर रवी धारणे, कळमेश्वरचे कळसाईत गुरुजी, पद्मापूरचे खुशाल साव यांनी गावगाड्यातील वास्तव रेखाटणाऱ्या कविता सादर केल्या. नापिकीने शेती तोट्यात जात असल्याने व वेळेवर पाऊस येत नसल्याने शेतकऱ्यांचा पोरगा शेतकरी व्हायला तयार होत नाही. म्हणून राजुऱ्याचे कवी किशोर कवठे यांनी शेतकऱ्यांची व्याथ मांडतांना म्हणाले..अशी कशी रिती झाली,ढगातली शाई,वावराला रंगविण्यासरी आल्या नाही.कवी दिवाकर देशमुख यांनी राजकीय डावपेचात शेतकऱ्याविषयी सत्ता हाये स्वर्ग, शेती हाये नरक’ या भावना मांडल्या. गोंदियाच्या प्रा. ज्योती कावळे यांनी सावित्रीच्या लेकी, कवितेतून स्त्री जीवनाची ससेहोलपत मांडली. धमेंद्र कन्नाके यांनी सपन कवितेतून गरिबांची अवस्था रेखाटली. ‘व्यथा भटक्या विमुक्ताच्या’ कवितेत सतिश लोंढे यांनी भटक्याचे जीवन वर्णन केले. मार्डा येथील संगीता धोटे यांनी ‘हुंडा’ कवितेतून जनप्रबोधन केले. तर चंदू झुरमुरे यांनी प्रेमाचे नाते जपण्याचे आवाहन केले. मधूकर चापले यांनी ‘समर्पन’ कवितेत नरेंद्र दाभोळकरांच्या हत्योविषयी कोणीच का बोलत नाही? हा सवाल उपस्थित केला. भंडाऱ्याचे दिवाकर मोरस्कर यांनी झाडीबोलीतील कविता सादर करुन उपस्थितांची दाद मिळवली. तर संजय वैद्य यांनी ‘ध्येय’ कवितेतून प्रत्येकांनी आशावादी जगण्याची संकल्पना मांडली.नव्या पिढीकडून अपेक्षा बाळगताना आपल्या मुलाकडूनच वडिलांना अपेक्षा ठेवता येत नाही. या आशयाची वऱ्हाडी कवी किशोर मुगल आपल्या कवितेत म्हणाले..तिन- तिन लेकरं असूनयेक नाही कामाचं,म्हातारपण जगत आहेनाव घेत रामाचं.कविसंमेलनात ज्ञानानंद झोडे, रोशनकुमार पिलेवान, उमाकांत नारनवरे, निलेश टेकाम, प्रा. धनश्री मुसने यांनीही आपल्या रचना सादर केल्या. कविसंमेलनाचे बहारदार संचालन कवी रत्नाकर चटप व अविनाश पोईनकर यांनी केले.