शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

कोणी मेले तरी, आता नसतात डोळे ओले!

By admin | Updated: January 5, 2015 23:00 IST

राष्ट्रसंत साहित्य विचार परिषद केंद्रीय समिती आणि श्रीगुरुदेव सेवा मंडळ ऊर्जानगर शाखेच्या वतीने आयोजित १३ वे राज्यस्तरीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनातील कविसंमेलन

राष्ट्रसंत साहित्य संमेलन : रंगलेल्या कविसंमेलनात श्रोते दंगरत्नाकर चटप - (कर्मयोगी तुकारामदादा गीताचार्य साहित्य नगरीतून)राष्ट्रसंत साहित्य विचार परिषद केंद्रीय समिती आणि श्रीगुरुदेव सेवा मंडळ ऊर्जानगर शाखेच्या वतीने आयोजित १३ वे राज्यस्तरीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनातील कविसंमेलन विदर्भ राज्यातून आलेल्या कवींच्या कवितांनी चांगलेच बहरले.पुणे येथील प्रसिद्ध कवी वादळकार, प्रा. राजेंद्र सानवणे यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. सुरेश उपगन्लावार, प्राचार्य अनिल मुसळे, ग्रामगिताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या कविसंमेलनात कवींंनी गावगाड्यातील वास्तव विषय व भीषण वर्तमान काव्यातून मांडले. विसापूरचे सुनिल बुटले यांनी जागतिकीकरणात गावाचं गावपण हरवत चालल्याची खंत ‘असे कसे माझे गाव’ कवितेतून मांडली. क्षणभर रसिकालाही विचारप्रवृत्त करायला लावणाऱ्या या कवितेत ते म्हणाले..असे कसे माझे गाव पुरे बदलून गेले,कोणी मेले तरी आता नसतात डोळे ओले.रायगड येथील कवी श्रीकांत धोटे, महाराष्ट्रातील संत महात्म्यांची विशेषत: राष्ट्रसंताची मानवतावादी ओळख आपल्या कवितेतून मांडतांना म्हणाले, मानवतेचा ज्यांनी गुंफीला धागाअसे थोर झाले तुकडोजी बाबा.भंडाऱ्यांचे डोमा महाराज कापगते यांनी स्वच्छ भारत कवितेतून ग्रामस्वच्छता अभियानाचा संदेश दिला. तर रवी धारणे, कळमेश्वरचे कळसाईत गुरुजी, पद्मापूरचे खुशाल साव यांनी गावगाड्यातील वास्तव रेखाटणाऱ्या कविता सादर केल्या. नापिकीने शेती तोट्यात जात असल्याने व वेळेवर पाऊस येत नसल्याने शेतकऱ्यांचा पोरगा शेतकरी व्हायला तयार होत नाही. म्हणून राजुऱ्याचे कवी किशोर कवठे यांनी शेतकऱ्यांची व्याथ मांडतांना म्हणाले..अशी कशी रिती झाली,ढगातली शाई,वावराला रंगविण्यासरी आल्या नाही.कवी दिवाकर देशमुख यांनी राजकीय डावपेचात शेतकऱ्याविषयी सत्ता हाये स्वर्ग, शेती हाये नरक’ या भावना मांडल्या. गोंदियाच्या प्रा. ज्योती कावळे यांनी सावित्रीच्या लेकी, कवितेतून स्त्री जीवनाची ससेहोलपत मांडली. धमेंद्र कन्नाके यांनी सपन कवितेतून गरिबांची अवस्था रेखाटली. ‘व्यथा भटक्या विमुक्ताच्या’ कवितेत सतिश लोंढे यांनी भटक्याचे जीवन वर्णन केले. मार्डा येथील संगीता धोटे यांनी ‘हुंडा’ कवितेतून जनप्रबोधन केले. तर चंदू झुरमुरे यांनी प्रेमाचे नाते जपण्याचे आवाहन केले. मधूकर चापले यांनी ‘समर्पन’ कवितेत नरेंद्र दाभोळकरांच्या हत्योविषयी कोणीच का बोलत नाही? हा सवाल उपस्थित केला. भंडाऱ्याचे दिवाकर मोरस्कर यांनी झाडीबोलीतील कविता सादर करुन उपस्थितांची दाद मिळवली. तर संजय वैद्य यांनी ‘ध्येय’ कवितेतून प्रत्येकांनी आशावादी जगण्याची संकल्पना मांडली.नव्या पिढीकडून अपेक्षा बाळगताना आपल्या मुलाकडूनच वडिलांना अपेक्षा ठेवता येत नाही. या आशयाची वऱ्हाडी कवी किशोर मुगल आपल्या कवितेत म्हणाले..तिन- तिन लेकरं असूनयेक नाही कामाचं,म्हातारपण जगत आहेनाव घेत रामाचं.कविसंमेलनात ज्ञानानंद झोडे, रोशनकुमार पिलेवान, उमाकांत नारनवरे, निलेश टेकाम, प्रा. धनश्री मुसने यांनीही आपल्या रचना सादर केल्या. कविसंमेलनाचे बहारदार संचालन कवी रत्नाकर चटप व अविनाश पोईनकर यांनी केले.