शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर न झाल्यास आंदोलन

By admin | Updated: November 23, 2015 01:05 IST

ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रांतर्गत सावली, सिंदेवाही व ब्रह्मपुरी तालुक्यातील सुमारे ८० गावामध्ये असलेल्या हजारो एकर शेताची प्रत्यक्ष पाहणी केली ...

विजय वडेट्टीवार : सावली, सिंदेवाही तालुक्यातील शेतीची प्रत्यक्ष पाहणीचंद्रपूर : ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रांतर्गत सावली, सिंदेवाही व ब्रह्मपुरी तालुक्यातील सुमारे ८० गावामध्ये असलेल्या हजारो एकर शेताची प्रत्यक्ष पाहणी केली असता पाण्याअभावी हजारो एकर क्षेत्रातील संपूर्ण धान पिके नष्ट झाली असून तूर पिकासह अनेक पिके उद्ध्वस्त झाली आहे. महसूल, कृषी, ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करुन दुष्काळाबाबतचा अहवाल शासनाकडे पाठवावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेस पक्षाचे उपगट नेता तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झालेला असून शेतकऱ्यांसह त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी येणार असल्याचे चित्र दिसत आहे. असे असले, तरी प्रशासनातील एकही अधिकारी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर गेलाच नसल्यामुळे पिकांची पैसेवारी कागदोपत्री तयार करण्यात आली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे किती गावे दुष्काळग्रस्त जाहीर होईल आणि किती गावांना दुष्काळग्रस्त यादीचा फायदा मिळेल यात शंका निर्माण झाली आहे. ९० टक्के पीक नष्ट झाले असतानासुद्धा याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे.आ. वडेट्टीवार यांनी गेल्या चार दिवसांपासून ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली तालुक्यातील शेकडो गावातील शेतीची पाहणी केली. तसेच २० नोव्हेंबर रोजी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत सावली व सिंदेवाही तालुक्यातील सावली, अंतरगाव, निफंद्रा, डोंगरगाव, चिखली, मुडझा, बोरमाळा, गेवरा बुज. गेवरा खुर्द, कसरगाव, पाथरी, पालेबारसा, मेहाबुज, चिकमारा, गुंजेवाही, सिंदेवाही यासह ७० ते ८० गावातील अंदाजे १५ हजार एकर शेतीची पाहणी केली. त्याच्यासोबत यावेळेस तालुका काँग्रेसचे अध्यक्ष राजेश सिद्धम, जिल्हा परिषद सदस्य दिनेश चिटनुरवार, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती युवराज शेरकी पंचायत समितीचे सदस्य, सरपंच, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळेस एका शेतकरी महिलेने आपल्या शेतातील पीक पाण्याअभावी नष्ट होऊन तणीस झाले असल्याचे सांगून प्रत्यक्ष शेतातील धान पिकाची झालेली तणीस हातात घेऊन दाखविलीे. पाण्याअभावी शेतामध्ये दुबार व तिबार पेरणी करावी लागली. परंतु नंतर पाऊसच आलेला नसल्यामुळे शेतातील उभे पीक नष्ट झाल्यामुळे हजारो एकर शेती पडीत आहे. काही ठिकाणी अखेर लागणारे पाणी न मिळाल्यामुळे हातचे येणारे थोडेबहुत पीक नष्ट झाले. काही शेतीमध्ये धानाचे पीक नसल्यामुळे जनावरे व बकऱ्या शेतात चरताना दिसले. शेतातील पिकाच्या उत्पन्नावरच आमच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह असल्यामुळे आता पीकच नसल्याने आमच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी येणार आहे. मुलांचे शिक्षण कसे करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाळीव जनावरांना पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे नदीवर सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन वेळात पाण्यासाठी न्यावे लागत आहे. जनावरांना चारा आणि पिण्याचे पाणी याबाबत गंभीर परिस्थिती निर्माण होणार असल्याचे या परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या आपबितीत सांगितले. तसेच पिकाची पाहणी करण्यासाठी कोणतेच अधिकारी व कर्मचारी शेतावर आले नसल्याचेही शेतकऱ्यांनी आ. वडेट्टीवार यांच्याशी बोलताना सांगितले. शेतीमध्ये धानाचे पीक नसल्यामुळे जनावरे व बकऱ्या शेतात चरताना दिसले. या परिसरातील प्रत्यक्ष पाहणी केली असता ९० ते ९५ टक्के धान, सोयाबिन, तूर यासह अनेक पिके नष्ट झालेली दिसून आलेली आहे. गावात रोजगाराचे साधन नसल्यामुळे रोजगारासाठी हजारो शेतकऱ्यांचे कुटुंब बाहेरगावी स्थलांतरित होत असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे तातडीने महसूल, कृषी, ग्रामविकास विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतावर जावून पाहणी करावी आणि दुष्काळाबाबतचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात यावा. तसेच ब्रह्मपुरी, सावली, सिंदेवाही या तालुक्यातील सर्व गावासह चंद्रपूर जिल्हाच दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी आ. विजय वडेट्टीवार यांनी शासनाकडे केली आहे. तसेच नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीतसुद्धा वडेट्टीवार यांनी ही मागणी लावून धरली होती, हे येथे उल्लेखनीय. (शहर प्रतिनिधी)