शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

वर्धा-पैनगंगेच्या पुराने चंद्रपुरातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 17:32 IST

इरईचे पाणी शहरात शिरण्याचा धोकाः नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा, चंद्रपुरात धो धो बरसला, पाच तालुक्यांना मोठा तडाखा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यवतमाळ आणि तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीने इसापूर व सातनाला धरणांचे दरवाजे उघडताच वर्धा आणि पैनगंगा नद्यांना मोठा पूर आला. या पुराने शेकडो हेक्टर पाण्याखाली आली. कोरपना, जिवती, राजुरा, चंद्रपूर व बल्लारपूर तालुक्यांतील पिकांना मोठा तडाखा बसला. १५ पेक्षा अधिक मार्ग बंद झाले आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील तोहगावाला पुराच्या पाण्याने वेढले घातला. वर्धा नदीच्या बैंक वॉटरने इरई नदीचे पाणी शहरात शिरण्याचा धोका निर्माण झाला. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

चंद्रपुरात सकाळी लख्ख उन्ह निघाले होते. दुपारी २ वाजतानंतर वातावरण अचानक बदलले. आकाश गच्च भरून येताच काही क्षणातच धो धो बरसला. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावसापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना जागा मिळेल तिथे आडोसा घ्यावा लागला.

डोंगरगाव-भेंडाळा प्रकल्प क्षेत्रातही नुकसानविरूर स्टेशन : मागील चार दिवसांपासून या परिसरात सततधार सुरू असल्याने नाल्यांना पूर आला. त्यातच वर्धा आणि पैनगंगा नदीने शेकडो हेक्टर क्षेत्रातील कापूस, तूर, सोयाबीन, धान, मिरची, भाजीपाल्याची पाण्याखाली आली आहे. डोंगरगाव व भेंडाळा हे दोनही सिंचन प्रकल्प १०० टक्के भरले. त्यामुळे काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र-तेलंगाना सीमेलगत राजुरा तालुक्यातील विरूर, धानोरा, कविटपेठ, सिंधी, नलफडी, मूर्ती, विहीरगाव, सातरी, चणाखा, कोहपरा, पंचाळा, चुनाळा, बामनवाळा, विचोली, अंतरगाव, अन्नूर, अमृतगुडा, खांबाळा, सिर्शी अशा एकूण १२ गावांतील शेती पाण्याखाली आहे. डोंगरगाव-भेंडाळा सिंचन प्रकल्प क्षेत्रातील केळझर, नवेगाव, भेंडाळा, बेरडी, चिचबोळी, सोनुर्ली, सोंडी, चिंचाळा, डोंगरगाव, पिंपळगाव, कोष्टाळा, लक्कडकोट, घोट्टा, सुब्बई, बापूनगर, थोमापूर, मुंडीगेट शिवारातील पिकांनाही मोठा फटका बसला आहे.

राजुरा पुलावर पोलिसांचा पहाराबल्लारपूर: पुराचे पाणी वाढू लागल्याने सावधगिरी म्हणून पोलिसांनी राजुरा-बल्लारपूर मार्गावरील वर्धा पुलाजवळ बंदोबस्त लावण्यात आला. त्यामुळे काही वाहनधारकांनी सास्ती या पर्यायी मार्गाचा वापर करीत आहेत. या मार्गावर वाहनांची मोठी रांग दिसून आली. पुराचे पाणी शेतांमध्ये शिरल्याने कापूस, सोयाचीन, तूर, धानाचे मोठे नुकसान होऊ शकते. राजकुमार शर्मा यांनी ५० हजार रुपये खर्च करून बानाचे रोवणे केले होते. सर्व पीक सध्या पाण्याखाली आहे.

तीन किमी पायी प्रवास करून आणला मृतदेहमुडीगेट दक्षिण मध्य रेल्वे लाइनवर अज्ञात इसमाचा मृतदेह पडून असल्याची माहिती विरुर रेल्वे स्टेशन मास्टरने सहायक पोलिस निरीक्षक संतोष वाकडे यांना दिली. तेव्हा मुसळधार पाऊस सुरू होता. पोलिस पथकाने बॅटरीच्या उजेडात तीन किमी अंतर पायदळ कापत रात्री ९:३० वाजता घटनास्थळ गाठले. इसमाचा मृतदेह दोराने बांधून ठाण्यात आणला.

"पुराच्या नुकसानीची तीव्रता मोठी आहे. कोरपना, जिवती, राजुरा या तिन्ही तालुक्यांत पाऊस सुरूच असल्याने आणखी मोठा पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर ओसरताच पिकांचे तत्काळ सर्वेक्षण करून हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी."- अॅड. वामनराव चटप, माजी आमदार राजुरा 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरfloodपूर