शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

संततधार पावसामुळे शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 00:51 IST

गडचांदूर परिसरातील लखमापूर येथे घर कोसळले. सिंदेवाही तालुक्यातील २० गावांचा संपर्क तुटला आहे. हिंगणघाट मार्गावरील चिचघट नाला, चिमूर-पिपर्डा रस्त्यावरील पालसगाव व नवरगाव मार्गावरील पेंढारी गावाजवळ तलाव फुटल्याने परिसरातील अनेकांच्या शेतात पुराचे पाणी शिरले आहे.

ठळक मुद्देशेतीचे नुकसान : सिंदेवाही तालुक्यातील २० गावांचा संपर्क तुटला

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात सलग संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नाल्यांना पूर आला. शेकडो हेक्टर कापूस, सोयाबीन व भातशेती पुराच्या पाण्याखाली आली. गडचांदूर परिसरातील लखमापूर येथे घर कोसळले. सिंदेवाही तालुक्यातील २० गावांचा संपर्क तुटला आहे. हिंगणघाट मार्गावरील चिचघट नाला, चिमूर-पिपर्डा रस्त्यावरील पालसगाव व नवरगाव मार्गावरील पेंढारी गावाजवळ तलाव फुटल्याने परिसरातील अनेकांच्या शेतात पुराचे पाणी शिरले आहे.नवरगाव-नेरी मार्ग बंदसिंदेवाही : तालुक्यातील अनेक गावांतील शेतात पुराचे पाणी शिरल्याने भात शेतीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. वाया जाण्याच्या मार्गावर आहे. कळमगाव, मोहाडी, नलेश्वर, खानेरा, पेटगाव, कुकडहेटी, पांगडी विसापूर यासह १९ गावांचा संपर्क तुटला आहे. दुपारी ३.३० वाजेपर्यंत नवरगाव-नेरी मार्ग बंद होता. पुरामुळे नागपूर - चंद्रपूर मार्ग दुपारपर्यंत वाहतुक बंद होता.नेरी परिसरात २० घरांचे नुकसाननेरी : पावसामुळे नदी,नाले ओसंडून वाहत आहेत. मुसळधार पावसामुळे नेरी परिसरात अनेक घरांची पडझड झाली. पळसगावातील महारबोडीची पाळ फुटल्यामुळे गावातील २० घरांचे नुकसान झाले. या कुटुंबीयांना रात्री उशिरापर्यंत ग्रामपंचायत भवनात हलविण्याची तयारी प्रशासनाने केली. नुकसानग्रस्त नागरिकांमध्ये महादेव गावतुरे, शत्रुघ्न गुळधे, वसंत बनसोड, जगदीश बनसोड, मारोती चौधरी, नामदेव गावतुरे, हरिचंद गुलढे, विश्वनाथ सोनूले व खुटाळा येथील रामदास डहारे, उसेगाव येथील वनराज डांगे आदींचा समावेश आहे.चिमूर-हिंगघाट, पिपर्डा- सिंदेवाही बससेवा बंदचिमूर : मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने चिमूर तालुक्यातील सखल भागातील परिसर व निमार्णाधीन मार्गावर पुराचे पाणी शिरले. चिमूर ते हिंगणघाट, पिपर्डा- सिंदेवाही- नवरगाव- सिंदेवाही बससेवा बंद आज दिवसभर बंद ठेवण्यात आली. सर्वत्र पाणी साचल्याने नागरिकांना त्यातूनच वाट काढावी लागली. चिमूर हिंगणघाट मार्गावरील चिचघट नाला, चिमूर- पिपर्डा रस्त्यावरील पालसगाव नाला व नवरगाव मार्गावरील पेंढारी गावाजवळ तलाव फुटल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. शहरात सायंकाळपर्यंत संततधार सुरू होता. त्यामुळे गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजन पडले. गणेशोत्सवाचे विविध कार्यक्रम रद्द करावे लागले.लखमापुरात घर कोसळलेगडचांदूर : पावसामुळे लखमापूर येथील सुभाष बापूराव मालेकर यांचे कवेलूचे दोन मजली बुधवारी सकाळच्या सुमारास कोसळले. या घटनेत मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गावातील पाणी टाकीजवळ सुभाष मालेकर यांचे दोन कवेलूचे घर आहे. सतत तीन दिवसांपासून पाऊस असल्याने घर अचानक कोसळले. ही माहिती मिळताच तलाठी जाधव यांनी सकाळी नऊ वाजता पंचनामा केला. या घटनेत सुमारे १ लाखाचे लाख नुकसान झाले. शासनाने तात्काळ भरपाई देण्याची मागणी सुभाष मालेकर यांनी केली आहे. 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर