शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
3
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
4
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
5
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
6
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
7
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
8
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
9
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
10
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
11
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
12
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
13
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
14
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
15
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
16
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
17
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
18
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
19
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
20
नवी मुंबई विमानतळ, भुयारी मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

संततधार पावसामुळे शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 00:51 IST

गडचांदूर परिसरातील लखमापूर येथे घर कोसळले. सिंदेवाही तालुक्यातील २० गावांचा संपर्क तुटला आहे. हिंगणघाट मार्गावरील चिचघट नाला, चिमूर-पिपर्डा रस्त्यावरील पालसगाव व नवरगाव मार्गावरील पेंढारी गावाजवळ तलाव फुटल्याने परिसरातील अनेकांच्या शेतात पुराचे पाणी शिरले आहे.

ठळक मुद्देशेतीचे नुकसान : सिंदेवाही तालुक्यातील २० गावांचा संपर्क तुटला

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात सलग संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नाल्यांना पूर आला. शेकडो हेक्टर कापूस, सोयाबीन व भातशेती पुराच्या पाण्याखाली आली. गडचांदूर परिसरातील लखमापूर येथे घर कोसळले. सिंदेवाही तालुक्यातील २० गावांचा संपर्क तुटला आहे. हिंगणघाट मार्गावरील चिचघट नाला, चिमूर-पिपर्डा रस्त्यावरील पालसगाव व नवरगाव मार्गावरील पेंढारी गावाजवळ तलाव फुटल्याने परिसरातील अनेकांच्या शेतात पुराचे पाणी शिरले आहे.नवरगाव-नेरी मार्ग बंदसिंदेवाही : तालुक्यातील अनेक गावांतील शेतात पुराचे पाणी शिरल्याने भात शेतीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. वाया जाण्याच्या मार्गावर आहे. कळमगाव, मोहाडी, नलेश्वर, खानेरा, पेटगाव, कुकडहेटी, पांगडी विसापूर यासह १९ गावांचा संपर्क तुटला आहे. दुपारी ३.३० वाजेपर्यंत नवरगाव-नेरी मार्ग बंद होता. पुरामुळे नागपूर - चंद्रपूर मार्ग दुपारपर्यंत वाहतुक बंद होता.नेरी परिसरात २० घरांचे नुकसाननेरी : पावसामुळे नदी,नाले ओसंडून वाहत आहेत. मुसळधार पावसामुळे नेरी परिसरात अनेक घरांची पडझड झाली. पळसगावातील महारबोडीची पाळ फुटल्यामुळे गावातील २० घरांचे नुकसान झाले. या कुटुंबीयांना रात्री उशिरापर्यंत ग्रामपंचायत भवनात हलविण्याची तयारी प्रशासनाने केली. नुकसानग्रस्त नागरिकांमध्ये महादेव गावतुरे, शत्रुघ्न गुळधे, वसंत बनसोड, जगदीश बनसोड, मारोती चौधरी, नामदेव गावतुरे, हरिचंद गुलढे, विश्वनाथ सोनूले व खुटाळा येथील रामदास डहारे, उसेगाव येथील वनराज डांगे आदींचा समावेश आहे.चिमूर-हिंगघाट, पिपर्डा- सिंदेवाही बससेवा बंदचिमूर : मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने चिमूर तालुक्यातील सखल भागातील परिसर व निमार्णाधीन मार्गावर पुराचे पाणी शिरले. चिमूर ते हिंगणघाट, पिपर्डा- सिंदेवाही- नवरगाव- सिंदेवाही बससेवा बंद आज दिवसभर बंद ठेवण्यात आली. सर्वत्र पाणी साचल्याने नागरिकांना त्यातूनच वाट काढावी लागली. चिमूर हिंगणघाट मार्गावरील चिचघट नाला, चिमूर- पिपर्डा रस्त्यावरील पालसगाव नाला व नवरगाव मार्गावरील पेंढारी गावाजवळ तलाव फुटल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. शहरात सायंकाळपर्यंत संततधार सुरू होता. त्यामुळे गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजन पडले. गणेशोत्सवाचे विविध कार्यक्रम रद्द करावे लागले.लखमापुरात घर कोसळलेगडचांदूर : पावसामुळे लखमापूर येथील सुभाष बापूराव मालेकर यांचे कवेलूचे दोन मजली बुधवारी सकाळच्या सुमारास कोसळले. या घटनेत मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गावातील पाणी टाकीजवळ सुभाष मालेकर यांचे दोन कवेलूचे घर आहे. सतत तीन दिवसांपासून पाऊस असल्याने घर अचानक कोसळले. ही माहिती मिळताच तलाठी जाधव यांनी सकाळी नऊ वाजता पंचनामा केला. या घटनेत सुमारे १ लाखाचे लाख नुकसान झाले. शासनाने तात्काळ भरपाई देण्याची मागणी सुभाष मालेकर यांनी केली आहे. 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर