शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
3
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
4
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
5
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
6
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
7
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
8
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
9
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
10
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
11
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
12
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
13
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
14
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
15
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
16
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
17
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
18
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
19
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
20
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका

शेकडो हेक्टर शेती भूईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 23:16 IST

गुरुवार,शुक्रवार आणि रविवारी पडलेल्या पावसाने जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पूर आला. या पुरामुळे जिल्ह्यातील शेकडो हेक्टर शेती अक्षरश: भूईसपाट झाली. शेतात मोठ्या मेहनतीने उभे केलेले पीक क्षणार्थात पुराने वाहून गेले.

ठळक मुद्देशेतकरी पुन्हा संकटात : शेतातील पिके वाहून गेली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गुरुवार,शुक्रवार आणि रविवारी पडलेल्या पावसाने जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पूर आला. या पुरामुळे जिल्ह्यातील शेकडो हेक्टर शेती अक्षरश: भूईसपाट झाली. शेतात मोठ्या मेहनतीने उभे केलेले पीक क्षणार्थात पुराने वाहून गेले. शेतीचे आता वाळवंट झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा बिकट प्रश्न उभा ठाकला आहे. शेतकऱ्यांचे हिरवे शिवार पूर्णत: मातीमोल झाल्याने शेतकऱ्यांना तातडीने पुन्हा नुकसान भरपाई देण्याची गरज निर्माण झाली आहे.यावर्षीचा सर्वाधिक पाऊस या दोन दिवसात पडला. जिल्ह्यातील बल्लारपूर, वरोरा, चिमूर, चंद्रपूर, सिंदेवाही या पाच तालुक्यात अतिवृष्टी झाली. इतर तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. या संततधार पावसाने अचानक नदी, नाल्याला पूर आला. या पूरामुळे नदी, नाल्याच्या काठावरील शेतपिकांना चांगलाच फटका बसला. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले तर राजुरा तालुक्यातील गोवरी, सास्ती, पोवनी, चिंचोली, भोयेगाव, अंतरगाव, मुठरा, चंदनवाही, कळमना, नाईकनगर, पांढरपौनी, हरदोना, कढोली (बु.) साखरी, वरोडा, पार्ली, निर्ली मानोली, बाळापूर, नदी पड्यातील पुरामुळे अक्षरश: खरडून गेली. यासोबत सिंदेवाही, मूल, नागभीड या धानपट्टयातील धानपºहे पाण्याखाली येऊन भूईसपाट झाले. गडचांदूरजवळच्या कारवा येथील सात एक शेती तर पूर्णता वाहून गेली.शेतकºयांनी नुकतीच कपाशी, सोयाबिन लागवड करुन खत देऊन पिकांची जोपासना केली होती. कसेबसे पीक वाढून डवरीणवर आले असताना पुरामुळे क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले.भोवरी येथील शेतकरी भाऊराव रणदिवे, अनिल रणदिवे, अमित रणदिवे यांचे शेत पुरामुळे अक्षरश: खरडून नेले तर नाल्याकाठावरील बंडू जुनघरी यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात मातीचा गाळ साचल्याने पिक दिसेनासे झाले आहे. हे फक्त याच शेतकºयांचे नुकसान नाही तर जिल्ह्यातील नदी,नाल्याच्या काठावर असणाºया शेकडो हेक्टर शेतीला पुराचा जबरदस्त तडाखा बसल्याने पिकेच पूर्णत: भूईसपाट झाली आहे. शेतकºयांनी पै पै गोळा करुन पिकांची लागवड केली होती. मात्र निसर्गाचा प्रकोप आल्याने शेकडो हेक्टर शेतीचे होत्याचे नव्हते झाले. यामुळे शेतकऱ्यांवर डोक्यावर हात ठेऊन अश्रू गाळण्याची दुदैवी वेळ आली आहे.शेतीचे साहित्य, खते वाहून गेलीशुक्रवारी रात्रीच्या सुमारास नदी, नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याने शेतकºयांनी शेतात ठेवलेली शेती उपयोगी सर्वच साहित्य पुरात वाहून गेले. काही शेतकºयांनी पिकांना खत देण्यासाठी शेतात नेऊन ठेवले होते. पण अचानक आलेल्या पुरामुळे महागडे खत, कुटार, कडबा सर्वच वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांवर फार मोठे संकट ओढविले आहे.आश्वासन नको, तात्काळ मदत द्याशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांजवळ एक पैसाही शिल्लक नाही. शासनाने नुकसानीचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले असून सर्व्हेक्षण सुरू आहे. मात्र शासनाने पूरग्रस्त शेतकºयांना तातडीने मदत दिली नाहीतर शेतकºयांना आपल्या शेतात पैशाअभावी काहीच पेरता येणार नाही. बि-बियाणे घेण्यासाठी शेतकºयांना शासकीय मदतीची नितांत गरज आहे. त्यासाठी आश्वासन नको तात्काळ मदत द्या, असा सूर शेतकरी वर्गात उमटत आहे.शेतकऱ्यांच्या नशिबी कायम संघर्षचपाऊस येऊनही बुडवेल आणि जाऊनही बुडवेल, अशी ग्रामीण भागात म्हण प्रचलित आहे. असाच काहीसा संघर्षमय प्रवास शेतकऱ्यांच्या बाबतीत घडला आहे. संततधार पावसाने क्षणार्थात शेकडो हेक्टर शेती उद्ध्वस्त केली. त्यामुळे शेतकरी आर्थिक़ संकटात सापडला आहे.पुरामुळे राजुरा तालुक्यातील शेकडो हेक्टर शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकºयांना मदत मिळवून देण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.- सुनील उरकुडे, जि.प. सदस्य.