शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
2
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
3
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
4
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
5
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
6
दहशतवाद्यांचे 'ऑल आउट'?; काश्मीरच्या वाढत्या दहशतवादाविषयी केंद्र सरकारची आज महत्त्वपूर्ण बैठक
7
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
8
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
9
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
10
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
11
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
12
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
13
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
14
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
15
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
16
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?
17
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
18
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
19
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
20
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?

शेकडो नागरिकांचा हिरावला रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 12:42 AM

प्लास्टिक पत्रावळी, वाट्या, ग्लासांवर शासनाने बंदी घातली असतानाही लग्न हंगामात सर्रास वापर करण्यात येत असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. प्लास्टिकच्या पत्राळी व वाट्यांमुळे ग्रामीण क्षेत्रात पळस, मोह व चाराच्या पानापासून पत्राळी, द्रोन तयार करणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांचा रोजगार हिरावला आहे.

ठळक मुद्देप्लास्टिकचा वापर वाढला : पत्रावळी, द्रोण बनविणारे हात झाले रिकामे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्लास्टिक पत्रावळी, वाट्या, ग्लासांवर शासनाने बंदी घातली असतानाही लग्न हंगामात सर्रास वापर करण्यात येत असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. प्लास्टिकच्या पत्राळी व वाट्यांमुळे ग्रामीण क्षेत्रात पळस, मोह व चाराच्या पानापासून पत्राळी, द्रोन तयार करणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांचा रोजगार हिरावला आहे.तातडीने प्रशासनाने प्लास्टिकच्या पत्रावळी, वाट्या व ग्लासांवर बंदी घालावी, अशी मागणी ग्रामीण भागातील पत्रावळी, द्रोण बनविणाºया नागरिकांनी केली आहे. प्लास्टिक पत्रावळी, वाट्या, ग्लासामुळे पर्यावरणाचे नुकसान होते तसेच प्लास्टिकच्या पत्रावळी, ग्लास, वाट्यांचा उपयोग करणाºया मानवाला होत असल्याचे दिसून येत आहे.प्लास्टिकच्या ग्लास, वाटीत थंड व गरम पदार्थ पिल्याने कॅन्सरसारखा गंभीर आजार होण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय संस्थेच्या संशोधनातून पुढे आली आहे. असे सर्व गंभीर आजार होत असताना संपूर्ण जिल्हाभरात प्लास्टिकच्या पत्रावळी, वाट्या, ग्लासांचा वापर केला जात आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने प्लास्टिक पत्रावळी, ग्लास, वाट्यांवर बंदी घालण्याचा ठराव घेण्याची गरज जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या आमसभेत प्लास्टिकच्या वाट्या, ग्लास, पत्रावळींवर गावबंदी घालण्याचा ठराव घेण्याची गरज आहे. ग्रामपंचायतींतर्गत येणाºया गावात जर कुणी लग्नमध्ये प्लास्टिकच्या पत्रावळी, ग्लास, वाट्याचा उपयोग करीत असेल तर अशा उपयोग करणाºया इसमास पाच ते दहा हजारांचा दंड ठोठावण्याचा ठराव घेण्याची गरज आहे.या ठरावातून ग्रामपंचायतीला फायदे होतील. प्लास्टिकच्या पत्रावळी, वाट्या, ग्लासापासून कचरा होणार नाही व गावात सर्वत्र स्वच्छता राहील, प्लास्टिकच्या पत्रावळी, वाट्या, ग्लास हे लवकर कुजत नसल्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे. मात्र या प्लास्टिक साहित्याच्या बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.नियम कागदावरचशासनाने राज्यात प्लास्टिक बंदी केली. पण, स्थानिक स्वराज्य संस्था अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील पारंपरिक कारागीर विविध प्रकारच्या पानांपासून पत्रावळी व द्रोण बनविणे बंद केले. याचा अनिष्ठ परिणाम रोजगारावर झाला.