शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

Chandrapur | वाघाच्या हल्ल्यात दोन गुराखी ठार; नागरिकांत दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2022 12:23 IST

मूल तालुक्यातील कवळपेठ येथील घटना

मूल (चंद्रपूर) : दबा धरून बसलेल्या वाघाने दाेन गुराख्यांचा जीव घेतला. ही घटना मूल तालुक्यातील कवळपेठ कक्ष क्रमांक ७५१ येथे बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. एकापाठोपाठ दाेघांवर हल्ला करून ठार केल्याची ही पहिलीच घटना असल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नानाजी सुकरू निकेसर (६०) व ढिवरू वासेकर (६१, दोघेही रा. चिचाळा, ता. मूल, जि. चंद्रपूर) अशी मृतांची नावे आहेत. चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील चिचाळा व कवळपेठ या वनपरिक्षेत्रात वाघाचा वावर मोठ्या प्रमाणावर असल्याने या परिसरात वनविभाग नेहमी लक्ष ठेवून असतो. बुधवारी सकाळी ११ वाजेदरम्यान नानाजी सुकरू निकेसर व ढिवरू वासेकर हे दोघे गुराखी जनावरे चारण्यासाठी कवळपेठ कक्ष क्रमांक ७५१ मध्ये गेले होते. गुरे चारत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने एकावर हल्ला केला. त्यावेळी दुसऱ्या गुराख्याने सोडविण्याचा प्रयत्न केला असता, त्याच्यावरही वाघाने हल्ला करून ठार केले.

या हल्ल्यात एकाच्या शरीराचा काही भाग खाल्ल्याचे दिसून आले. आजपर्यंत वाघाने एका व्यक्तीवर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे. मात्र, एकाच वेळी दोघांवर हल्ला करून ठार केल्याची घटना प्रथमच घडल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. या घटनेमुळे चिचाळा गावात वातावरण तणावपूर्ण झाल्याचे दिसून येत आहे. अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस प्रशासन विशेष लक्ष घालत आहे.

टॅग्स :TigerवाघFarmerशेतकरीDeathमृत्यूGadchiroliगडचिरोली