शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

ढगाळ वातावरणाने जिल्ह्यात हुडहुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 00:09 IST

गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकांसह रब्बी हंगामातील हरभरा, गहू, तूर, ज्वारी, मका, भाजीपाला पिके धोक्यात आली आहे. चंद्रपूरसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यात गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी पावसाने तुरळक हजेरी लावल्याने शेतातील पिके अकाली पावसामुळे उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देजिल्हाभर रिमझिम पाऊस : खरिपातील धान, रबी पिकांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा सध्या ढगांनी व्यापला की काय, असे वाटू लागले आहे. मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात सतत ढगाळ वातावरण राहत आहे. दरम्यान, गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील सर्वच भागात रिमझीम पावसाने हजेरी लावली. या पावसाचा व ढगाळ वातावरणाचा खरीपातील धान व रबी पिकांना जोरदार फटका बसला आहे. रबी पिकांवर रोगराईचे आक्रमण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकांसह रब्बी हंगामातील हरभरा, गहू, तूर, ज्वारी, मका, भाजीपाला पिके धोक्यात आली आहे. चंद्रपूरसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यात गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी पावसाने तुरळक हजेरी लावल्याने शेतातील पिके अकाली पावसामुळे उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाऊस येऊन नुकसान होईल, या दृष्टीने काही शेतकऱ्यांनी अंतिम टप्प्यातील धानाचे ढीग शेतात झाकून ठेवावे लागले. ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकांसह रब्बी हंगामातील हरभरा, गहू, तूर, ज्वारी पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर्षी वातावरणात मोठया प्रमाणात बदल झाल्याने उत्पादनात घट झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.रबी पिके फुलोऱ्यावर आले असताना अचानक राजुरा तालुक्यातील काही भागात पावसाला सुरुवात झाली होती. या वातावरणातील बदलामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांचा फुलोरा गळत असल्याने उत्पादन वाढीला फटका बसण्याची शक्यता आहे. निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नसल्याने शेतीला दिवसेंदिवस उतरती कळा आली आहे. पिकांची स्थिती चांगली असताना अचानक वातावरणात बदल झाल्याने कापसासह रबी हंगामातील सर्वच पिकांना मोठा फटका बसला आहे. यामुळे आधीच कर्जाच्या ओझ्याख्नाली असलेला शेतकरी धास्तावला आहे.नववर्षाच्या प्रारंभीच संकटयावर्षी शेतकऱ्यांनी उसनवारी व कर्ज काढून शेतात राबणे सुरू केले. खरीप पिकांची लागवड केली. मात्र निसर्ग शेतीला साथ देत नाही. शासन मदतीचा हात पुढे करीत नाही. शेतमालाला भाव नाही. त्यामुळे शेतीचे दिवस वाईट आले आहे. नवीन वर्ष सुरू होताच आता वातावरणात मोठया प्रमाणात बदल झाल्याने पिकांची उत्पादकता घटणार असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.चिमुरात दोन दिवसांपासून पावसाची हजेरीचिमूर परिसरात गेल्या तीन चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असून दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे शेतात असलेल्या कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. चिमूर, शंकरपूर, भिसी, मासळ, खडसंगी, आमडी, बोथली परिसरात बुधवारी रात्री मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने वेचणीला आलेल्या कापसाच्या वाती झाल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत. याशिवाय नागरिकांत थंडीने हुडहुडी भरली आहे. या वातावरणामुळे लहान मुलाच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होत असून रुग्णालयात बालगोपालांची उपचारासाठी गर्दी दिसत आहे.ग्रामीण भागात दिवसाच शेकोट्यागुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सूर्यानेही नागरिकांना दिवसभर दर्शन दिले नाही. अशातच जिल्हाभर रिमझिम पावसानेही हजेरी लावली. ग्रामीण भागात थंडीचा जोर मोठा होता. अंगात हुडहुडी भरत असल्यामुळे नागरिक जिथे-तिथे शेकोटया पेटवून थंडीपासून बचाव करताना दिसून येत होते.

टॅग्स :Rainपाऊस