शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणाने जिल्ह्यात हुडहुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 00:09 IST

गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकांसह रब्बी हंगामातील हरभरा, गहू, तूर, ज्वारी, मका, भाजीपाला पिके धोक्यात आली आहे. चंद्रपूरसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यात गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी पावसाने तुरळक हजेरी लावल्याने शेतातील पिके अकाली पावसामुळे उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देजिल्हाभर रिमझिम पाऊस : खरिपातील धान, रबी पिकांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा सध्या ढगांनी व्यापला की काय, असे वाटू लागले आहे. मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात सतत ढगाळ वातावरण राहत आहे. दरम्यान, गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील सर्वच भागात रिमझीम पावसाने हजेरी लावली. या पावसाचा व ढगाळ वातावरणाचा खरीपातील धान व रबी पिकांना जोरदार फटका बसला आहे. रबी पिकांवर रोगराईचे आक्रमण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकांसह रब्बी हंगामातील हरभरा, गहू, तूर, ज्वारी, मका, भाजीपाला पिके धोक्यात आली आहे. चंद्रपूरसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यात गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी पावसाने तुरळक हजेरी लावल्याने शेतातील पिके अकाली पावसामुळे उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाऊस येऊन नुकसान होईल, या दृष्टीने काही शेतकऱ्यांनी अंतिम टप्प्यातील धानाचे ढीग शेतात झाकून ठेवावे लागले. ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकांसह रब्बी हंगामातील हरभरा, गहू, तूर, ज्वारी पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर्षी वातावरणात मोठया प्रमाणात बदल झाल्याने उत्पादनात घट झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.रबी पिके फुलोऱ्यावर आले असताना अचानक राजुरा तालुक्यातील काही भागात पावसाला सुरुवात झाली होती. या वातावरणातील बदलामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांचा फुलोरा गळत असल्याने उत्पादन वाढीला फटका बसण्याची शक्यता आहे. निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नसल्याने शेतीला दिवसेंदिवस उतरती कळा आली आहे. पिकांची स्थिती चांगली असताना अचानक वातावरणात बदल झाल्याने कापसासह रबी हंगामातील सर्वच पिकांना मोठा फटका बसला आहे. यामुळे आधीच कर्जाच्या ओझ्याख्नाली असलेला शेतकरी धास्तावला आहे.नववर्षाच्या प्रारंभीच संकटयावर्षी शेतकऱ्यांनी उसनवारी व कर्ज काढून शेतात राबणे सुरू केले. खरीप पिकांची लागवड केली. मात्र निसर्ग शेतीला साथ देत नाही. शासन मदतीचा हात पुढे करीत नाही. शेतमालाला भाव नाही. त्यामुळे शेतीचे दिवस वाईट आले आहे. नवीन वर्ष सुरू होताच आता वातावरणात मोठया प्रमाणात बदल झाल्याने पिकांची उत्पादकता घटणार असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.चिमुरात दोन दिवसांपासून पावसाची हजेरीचिमूर परिसरात गेल्या तीन चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असून दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे शेतात असलेल्या कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. चिमूर, शंकरपूर, भिसी, मासळ, खडसंगी, आमडी, बोथली परिसरात बुधवारी रात्री मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने वेचणीला आलेल्या कापसाच्या वाती झाल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत. याशिवाय नागरिकांत थंडीने हुडहुडी भरली आहे. या वातावरणामुळे लहान मुलाच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होत असून रुग्णालयात बालगोपालांची उपचारासाठी गर्दी दिसत आहे.ग्रामीण भागात दिवसाच शेकोट्यागुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सूर्यानेही नागरिकांना दिवसभर दर्शन दिले नाही. अशातच जिल्हाभर रिमझिम पावसानेही हजेरी लावली. ग्रामीण भागात थंडीचा जोर मोठा होता. अंगात हुडहुडी भरत असल्यामुळे नागरिक जिथे-तिथे शेकोटया पेटवून थंडीपासून बचाव करताना दिसून येत होते.

टॅग्स :Rainपाऊस