शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
4
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
5
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
6
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
7
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
8
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
9
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
10
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
11
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
12
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
13
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
15
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
16
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
17
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
18
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
19
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
20
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणाने जिल्ह्यात हुडहुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 00:09 IST

गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकांसह रब्बी हंगामातील हरभरा, गहू, तूर, ज्वारी, मका, भाजीपाला पिके धोक्यात आली आहे. चंद्रपूरसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यात गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी पावसाने तुरळक हजेरी लावल्याने शेतातील पिके अकाली पावसामुळे उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देजिल्हाभर रिमझिम पाऊस : खरिपातील धान, रबी पिकांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा सध्या ढगांनी व्यापला की काय, असे वाटू लागले आहे. मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात सतत ढगाळ वातावरण राहत आहे. दरम्यान, गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील सर्वच भागात रिमझीम पावसाने हजेरी लावली. या पावसाचा व ढगाळ वातावरणाचा खरीपातील धान व रबी पिकांना जोरदार फटका बसला आहे. रबी पिकांवर रोगराईचे आक्रमण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकांसह रब्बी हंगामातील हरभरा, गहू, तूर, ज्वारी, मका, भाजीपाला पिके धोक्यात आली आहे. चंद्रपूरसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यात गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी पावसाने तुरळक हजेरी लावल्याने शेतातील पिके अकाली पावसामुळे उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाऊस येऊन नुकसान होईल, या दृष्टीने काही शेतकऱ्यांनी अंतिम टप्प्यातील धानाचे ढीग शेतात झाकून ठेवावे लागले. ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकांसह रब्बी हंगामातील हरभरा, गहू, तूर, ज्वारी पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर्षी वातावरणात मोठया प्रमाणात बदल झाल्याने उत्पादनात घट झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.रबी पिके फुलोऱ्यावर आले असताना अचानक राजुरा तालुक्यातील काही भागात पावसाला सुरुवात झाली होती. या वातावरणातील बदलामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांचा फुलोरा गळत असल्याने उत्पादन वाढीला फटका बसण्याची शक्यता आहे. निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नसल्याने शेतीला दिवसेंदिवस उतरती कळा आली आहे. पिकांची स्थिती चांगली असताना अचानक वातावरणात बदल झाल्याने कापसासह रबी हंगामातील सर्वच पिकांना मोठा फटका बसला आहे. यामुळे आधीच कर्जाच्या ओझ्याख्नाली असलेला शेतकरी धास्तावला आहे.नववर्षाच्या प्रारंभीच संकटयावर्षी शेतकऱ्यांनी उसनवारी व कर्ज काढून शेतात राबणे सुरू केले. खरीप पिकांची लागवड केली. मात्र निसर्ग शेतीला साथ देत नाही. शासन मदतीचा हात पुढे करीत नाही. शेतमालाला भाव नाही. त्यामुळे शेतीचे दिवस वाईट आले आहे. नवीन वर्ष सुरू होताच आता वातावरणात मोठया प्रमाणात बदल झाल्याने पिकांची उत्पादकता घटणार असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.चिमुरात दोन दिवसांपासून पावसाची हजेरीचिमूर परिसरात गेल्या तीन चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असून दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे शेतात असलेल्या कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. चिमूर, शंकरपूर, भिसी, मासळ, खडसंगी, आमडी, बोथली परिसरात बुधवारी रात्री मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने वेचणीला आलेल्या कापसाच्या वाती झाल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत. याशिवाय नागरिकांत थंडीने हुडहुडी भरली आहे. या वातावरणामुळे लहान मुलाच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होत असून रुग्णालयात बालगोपालांची उपचारासाठी गर्दी दिसत आहे.ग्रामीण भागात दिवसाच शेकोट्यागुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सूर्यानेही नागरिकांना दिवसभर दर्शन दिले नाही. अशातच जिल्हाभर रिमझिम पावसानेही हजेरी लावली. ग्रामीण भागात थंडीचा जोर मोठा होता. अंगात हुडहुडी भरत असल्यामुळे नागरिक जिथे-तिथे शेकोटया पेटवून थंडीपासून बचाव करताना दिसून येत होते.

टॅग्स :Rainपाऊस