शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

ढगाळ वातावरणाने जिल्ह्यात हुडहुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 00:09 IST

गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकांसह रब्बी हंगामातील हरभरा, गहू, तूर, ज्वारी, मका, भाजीपाला पिके धोक्यात आली आहे. चंद्रपूरसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यात गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी पावसाने तुरळक हजेरी लावल्याने शेतातील पिके अकाली पावसामुळे उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देजिल्हाभर रिमझिम पाऊस : खरिपातील धान, रबी पिकांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा सध्या ढगांनी व्यापला की काय, असे वाटू लागले आहे. मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात सतत ढगाळ वातावरण राहत आहे. दरम्यान, गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील सर्वच भागात रिमझीम पावसाने हजेरी लावली. या पावसाचा व ढगाळ वातावरणाचा खरीपातील धान व रबी पिकांना जोरदार फटका बसला आहे. रबी पिकांवर रोगराईचे आक्रमण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकांसह रब्बी हंगामातील हरभरा, गहू, तूर, ज्वारी, मका, भाजीपाला पिके धोक्यात आली आहे. चंद्रपूरसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यात गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी पावसाने तुरळक हजेरी लावल्याने शेतातील पिके अकाली पावसामुळे उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाऊस येऊन नुकसान होईल, या दृष्टीने काही शेतकऱ्यांनी अंतिम टप्प्यातील धानाचे ढीग शेतात झाकून ठेवावे लागले. ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकांसह रब्बी हंगामातील हरभरा, गहू, तूर, ज्वारी पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर्षी वातावरणात मोठया प्रमाणात बदल झाल्याने उत्पादनात घट झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.रबी पिके फुलोऱ्यावर आले असताना अचानक राजुरा तालुक्यातील काही भागात पावसाला सुरुवात झाली होती. या वातावरणातील बदलामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांचा फुलोरा गळत असल्याने उत्पादन वाढीला फटका बसण्याची शक्यता आहे. निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नसल्याने शेतीला दिवसेंदिवस उतरती कळा आली आहे. पिकांची स्थिती चांगली असताना अचानक वातावरणात बदल झाल्याने कापसासह रबी हंगामातील सर्वच पिकांना मोठा फटका बसला आहे. यामुळे आधीच कर्जाच्या ओझ्याख्नाली असलेला शेतकरी धास्तावला आहे.नववर्षाच्या प्रारंभीच संकटयावर्षी शेतकऱ्यांनी उसनवारी व कर्ज काढून शेतात राबणे सुरू केले. खरीप पिकांची लागवड केली. मात्र निसर्ग शेतीला साथ देत नाही. शासन मदतीचा हात पुढे करीत नाही. शेतमालाला भाव नाही. त्यामुळे शेतीचे दिवस वाईट आले आहे. नवीन वर्ष सुरू होताच आता वातावरणात मोठया प्रमाणात बदल झाल्याने पिकांची उत्पादकता घटणार असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.चिमुरात दोन दिवसांपासून पावसाची हजेरीचिमूर परिसरात गेल्या तीन चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असून दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे शेतात असलेल्या कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. चिमूर, शंकरपूर, भिसी, मासळ, खडसंगी, आमडी, बोथली परिसरात बुधवारी रात्री मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने वेचणीला आलेल्या कापसाच्या वाती झाल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत. याशिवाय नागरिकांत थंडीने हुडहुडी भरली आहे. या वातावरणामुळे लहान मुलाच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होत असून रुग्णालयात बालगोपालांची उपचारासाठी गर्दी दिसत आहे.ग्रामीण भागात दिवसाच शेकोट्यागुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सूर्यानेही नागरिकांना दिवसभर दर्शन दिले नाही. अशातच जिल्हाभर रिमझिम पावसानेही हजेरी लावली. ग्रामीण भागात थंडीचा जोर मोठा होता. अंगात हुडहुडी भरत असल्यामुळे नागरिक जिथे-तिथे शेकोटया पेटवून थंडीपासून बचाव करताना दिसून येत होते.

टॅग्स :Rainपाऊस