शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

परवानगीशिवाय वाघाला पकडले कसे? वाघाला पकडण्यासाठी अटींचे पालन झाले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 12:38 IST

Chandrapur : प्रधान मुख्य वनसंरक्षकांना कल्पनाही नाही

राजेश भोजेकर लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यात हल्लेखोर वाघांना विनापरवानगीनेच पकडण्याचा नवा पायंडा पाडताना वन विभागाचे अधिकारी दिसत आहेत. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या परवानगीविनाच वाघांना पकडल्याची धक्कादायक माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली.

दि. १७ डिसेंबर २०२४ रोजी पोंभुर्णा उपवनक्षेत्रात एका वाघिणीला वन विभागाने परस्पर बेशुद्ध करून जेरबंद केले. 'लोकमत'ने लक्ष वेधल्यानंतर परवानगीचे सोपस्कार पार पाडल्याची माहिती आहे. १० जानेवारीला नागभीड वनपरिक्षेत्रात एका वाघाने एकाला हल्ला करून ठार केले. दि. १२ जानेवारीला म्हणजे दोन दिवसातच त्या वाघाला जेरबंद करण्यात आले. वाघाला पकडल्यानंतर परवानगीचे प्रयत्न केल्याची माहिती सूत्राने दिली. १४ जानेवारीला बल्लारपूर वनक्षेत्रात एका वनमजुराला वाघाने ठार केले. यानंतर वाघ तिथेच बसून असताना वन विभागाने त्या वाघाला बेशुद्धीचे इंजेक्शन मारून जेरबंद केले. या वाघाला इतक्या तातडीने पकडण्यासाठी परवानगी दिली होती काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

मग, 'येडा अण्णा'ला का जीव गमवावा लागला? 

  • २०१८ मध्ये चिमूर तालुक्यातील जंगलात 'येडा अण्णा' नावाने ओळखला जाणारा वाघ एकाच जागेवर जखमांनी विव्हळत होता.
  • त्याच्यावर उपचार करण्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या परवानगीची वाट पाहावी लागली. परवानगी येताच येडा अण्णाने उपचारांच्या प्रतीक्षेत जीव गमावला. 
  • वन विभागाचे धोरण नेमके काय? असा प्रश्न या घटनांनी निर्माण झाला आहे.

वाघाला पकडण्यासाठी अटींचे पालन झाले का? वाघाच्या पूर्व इतिहासाचा तपशील तपासणी सूची मनुष्यहानी, जखमी प्रपत्र पशुहानी, जखमी प्रपत्र कॅमेरा ट्रॅपमधील वाघाचे फोटो गावकऱ्यांचे निवेदन जीआरटी टीम व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या गस्तीचे फोटो मानव-वन्यजीव संघर्ष काळातील उपाययोजना

टॅग्स :Tigerवाघchandrapur-acचंद्रपूर