शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

सारखे नाव-आडनावाचे किती राव !

By admin | Updated: November 1, 2016 00:56 IST

सारखे नाव आणि सोबतीला त्यांचे सारखे आडनाव असणे, ही तशी नवीन गोष्ट नाही.

बामणी दुधोली येथील प्रकार : निवडणुकीत उद्भवला होता पेचवसंत खेडेकर बल्लारपूरसारखे नाव आणि सोबतीला त्यांचे सारखे आडनाव असणे, ही तशी नवीन गोष्ट नाही. मात्र, अवघे साडेचार हजार लोकसंख्या असलेल्या लहान गावात अशांची संख्या दोन ते पाच पर्यंत असली की त्याला नवलच म्हणावे लागेल. आणि हा नवलाचा प्रकार बल्लारपूर शहराला लागून असलेल्या बामणी (दुधोली) या गावात बघायला मिळतो आहे. ‘साळवे’ असे हे आडनाव! साळवे या आडनावाने व त्यांचे प्रथम नावही सारखे असणारे किती जण तरी गावात आहेत. बामणी येथे साळवे नावांची सुमारे ५० कुटूंब असतील. त्यामुळे, साळवे आडनाव असणाऱ्यांची संख्या निश्चितच दोनशेच्या आसपास असणार! काही साळवे कुटूंबांनी योगायोगाने आपल्या कुटूंबातील मुलांची नावे सारखीच ठेवली आहेत. याच कारणामुळे प्रथम नाव व आडनाव सारखे असे घडत गेले आहे, अशी बरीचशी नाव या गावात आहेत. फरक फक्त त्यांच्या वडिलांची नावे वेगवेगळी आहेत, एवढेच! उदाहरण द्यायचे झाल्यास या गावात रविंद्र साळवे नावाचे चार जण आहेत. सुरेश व दिनकर साळवे नावाचे प्रत्येकी चार, एकनाथ, वामन, विठोबा, शंकर, नामदेव व गणपती नावाचे प्रत्येकी दोन अशी व्यक्ती आहेत. नावातील या साम्यामुळे बरेचदा गोंधळही उडतो. निवडणुकीत एकाच वार्डात सारख्या नावाचे दोन साळवे उभे झाले की नेमका ‘तो’ साळवे कोण याबाबत मतदारही संभ्रमात पडतात. असा प्रकार निवडणूकीप्रसंगी येथे घडल्याचे जाणकार सांगतात. या गावात साळवे कुटूंबाची संख्या खूप मोठी असल्याने बामणीला ‘साळवेंची बामणी’ असेही म्हटले जाते. माजी आमदार, सामाजिक कार्यकर्ते तथा विचारवंत अ‍ॅड. एकनाथराव साळवे यांचे हे जन्मगाव! सध्या त्यांचे वास्तव्य याच गावात आहे. आज बामणी (दुधोली) येथे स्थायिक होऊन असलेले सारे साळवे कुटूंब हे मूळचे वर्धा नदीच्या अगदी काठावर रेल्वे पुलाजवळील दुधोली या गावचे होत. नदीला दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे दुधोली गाव पुराने वेढला जाऊन घर-जनावरांची हानी होत असे. त्यामुळे शासनाने हे गाव बल्लारपूर-कोठारी मार्गावरील दुधोली या गावालगत त्याला लागूनच पुनर्वसित केले. बामणीचे त्यानंतर बामणी-दुधोली असे नाव पडले. दुधोलीतील सर्व साळवे येथे येऊन वसल्याने साळवे कुटूंबियांची संख्या या गावात सर्वाधिक आहे.बामणीचे शैक्षणिक-औद्योगिक महत्त्वसुमारे साडेचार हजार लोकसंख्या असलेल्या या गावाला शैक्षणिक व औद्योगिक दृष्ट्याही महत्त्व आहे. येथे बालाजी विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, जव्हेरी कन्या महाविद्यालय, बी.एड. कॉलेज, मोंटफोर्ट हायर सेकंडरी स्कूल, बल्लारपूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलाजी (बीआयटी), पंचायत समितीचे शिक्षण विभागाचे बीआरसी केंद्र, बामणी प्रोटीन्स, खर्डा फॅक्टरी, आॅईल मिल असे उद्योग येथे आहेत.