शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

नरभक्षक वाघ आणखी किती बळी घेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 23:06 IST

तालुक्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रात मागील पाच महिन्यांपासून वाघाची दहशत कायम आहे. पाच महिन्यांत दोन महिला व दोन पुरुषांचा बळी गेला. एक इसम गंभीर जखमी झाला आहे. पण, वन विभागाने या वाघाचा अद्याप बंदोबस्त केला नाही. त्यामुळे नरभक्षक वाघ आणखी किती व्यक्तींचा बळी घेणार, असा प्रश्न गावकरी विचारत आहेत.

ठळक मुद्देनागरिकांचा सवाल : मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना करा

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : तालुक्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रात मागील पाच महिन्यांपासून वाघाची दहशत कायम आहे. पाच महिन्यांत दोन महिला व दोन पुरुषांचा बळी गेला. एक इसम गंभीर जखमी झाला आहे. पण, वन विभागाने या वाघाचा अद्याप बंदोबस्त केला नाही. त्यामुळे नरभक्षक वाघ आणखी किती व्यक्तींचा बळी घेणार, असा प्रश्न गावकरी विचारत आहेत.तयागोंदी शेतावर काम करीत असताना सिंदेवाही येथील कमला निकोडे, मुरमाडी येथील गिता पेंदाम, मुकुंदा भेनडारे रा. किन्ही, महादेव गेडाम रा. मुरमाडी व लाडबोरी येथील वनीता चौके यांच्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. तर किन्ही येथील पुजाजी भेंडारे गंभीर जखमी केले. तेव्हापासून परिसरात वाघाची दहशत कायम आहे. दहशतीमुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात जाणे बंद केले होते. परंतु हंगाम सुरू असल्याने दहशतीतच कामे सुरू केली आहेत. तालुक्यातील बरीच गावे व शिवार जंगलाला लागून आहे. त्यामुळे जंगलाशी शेतकºयांचा जवळचा संबंध आहेत. जंगलातील वाघ व बिबट जंगल सोडून गावाशेजारी का येतो, हा संशोधनाचा विषय आहे. पूर्वी जंगल फार दाट स्वरूपाचे होते. जंगलात कुकडरांजी व झिलबुलीची झाडे मोठ्या प्रमाणात होती. १५ वर्षांपूर्वी निस्तार हक्काअंतर्गत लाकूड तोडण्याची परवानगी होती. त्यामुळे कुकडरांजीची झाडे तोडण्यात आली. या झाडांमध्ये वाघ व बिबटाचा अधिवास होता. टेकडीवर तर वाघाचे नैसर्गिक निवासस्थान राहायचे. पूर्वी जंगलतोड नसल्यामुळे जंगलात वन्यप्राणी मुक्तपणे संचार करीत होती. वाघाला नैसर्गिक खाद्य मिळत होते. त्यामुळे वाघ गावाशेजारी फिरकत नव्हता. आता जंगलातील रानडुक्कर, हरिण, चितळ, सांबर, ससे आणि अन्य तृणभक्षी वन्यप्राणी दिसेनासे झाले आहेत. वन्य प्राण्यांची अवैध शिकार होत असल्यामुळे तृणभक्षक प्राणी कमी झाले. मांसभक्षक प्राणी गावाच्या दिशेने येवून मानवावर हल्ला करीत आहेत. याशिवाय जळावू बीट व इमारती लाकडाच्या नावाखाली वन विभाग व वन विकास महामंडळाकडून शेकडो हेक्टर जमिनीवरील झाडांची कटाई केली जात आहे. त्यामुळे वाघ व बिबटाची नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत.ग्रामीण भागातील वनाला लागून असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे वन्यप्राण्यांकडून नुकसान होत आहे. तर वाघ व बिबट यांना नैसर्गिक खाद्य मिळत नसल्यामुळे गावाजवळ येवून मानवांवर हल्ले करुन ठार करीत आहे. गावाजवळ येवून गाय, म्हैस, शेळी व बकरे यांचे लचके तोडत आहेत. परिसरातील जंगलात वणवा लागल्यामुळे वन्यप्राणी व तृणभक्षक प्राण्यांची वाताहात होत आहे. त्यांचा अधिवास संपत आहे. त्यामुळे मानव व वन्यजीव संघर्षाच्या घटना तालुक्यात वाढल्याचे दिसून येत आहे. इंधनाची गरज भागविण्यासाठी काही नागरिक अवैध वृक्षतोड करीत आहेत. हा प्रकारही योग्य नाही. मात्र, वन विभागाने यावर तोडगा काढण्याची गरज आहे.जंगलावरील निर्भरता कमी करण्यासाठी हव्या योजनावनग्रामातील महिलांना सरपण आणावे लागते. उन्हाळ्यात तेंदूपाने गोळा करण्याकरिता जंगलात जावे लागते. दरम्यान, वाघाला मानव दृष्टीस पडल्यास किंवा त्याला काही स्पर्श झाल्यास हल्ला करतो. दरवर्षी सिंदेवाही तालुक्यात पाच ते दहा व्यक्तींचा वाघाच्या हल्ल्यात बळी जात आहे. वन्यप्राणी व जंगलाचे संगोपन करणे ही काळाची गरज असली तरी वाघाचे हल्ले कसे बंद होतील, याचाही विचार वन विभागाने केला पाहिजे. पण, वनाचे संरक्षण करण्याचे काम या क्षेत्रात होत नाही, असा नागरिकांचा आरोप आहे. वनाच्या हद्दीवर संरक्षक भिंत अथवा तारेचे कुंपण लावावे. तसेच नागरिकांची जंगलावरील निर्भरता कमी करावी, अशी मागणी केली जात आहे.