शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

अपूर्ण रस्त्यांवर टोलवसुली कशी काय? निर्णयाविरोधात वाहतूकदारांत तीव्र नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 19:08 IST

Chandrapur : कोरपना व वनसडी परिसरात टोलनाका उभारल्यामुळे ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे हा टोल स्थानिकांच्या पाठीवरचा अन्याय असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : राजुरा-कोरपना-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील कामे अद्याप पूर्ण झालेली नसतानाही, देवघाट टोलनाक्यावर टोलवसुली सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे वाहतूकदार, शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे निवेदन देत, टोलवसुली तात्काळ स्थगित करण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.

कोरपना हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे बाजारपेठ, शाळा, प्रशासकीय कार्यालये आहेत. यासाठी शेतकरी व नागरिकांना नियमित ये-जा करावी लागते. परंतु सध्या सुरू झालेल्या टोलवसुलीमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या बियाणे, खते, औजारे ने-आण करताना टोल भरण्याचा भार सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात टोल सुरू झाल्याने सामान्य नागरिकांची आर्थिक चणचण वाढली आहे. शासनाने या टोल नाक्याबाबत चौकशी करून वस्तुस्थिती जाणून घ्यावी व त्यानंतरच कर आकारणी सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

उडाणपुलांची रंगरंगोटी व सौंदर्गीकरण रखडले

उडाणपुलांची रंगरंगोटी व सौंदर्गीकरण पूर्ण झाले नाही. रस्त्यावर प्रवासात अनेक अडथळे येत असूनही टोल भरावा लागत आहे, ही बाब अन्यायकारक ठरत असल्याचा आरोप आबीद अली यांनी केला आहे.

टोल स्थानिकांवर लादल्याचा आरोप

कोरपना व वनसडी परिसरात टोलनाका उभारल्यामुळे ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे हा टोल स्थानिकांच्या पाठीवरचा अन्याय असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. दरम्यान वणी, अंतरगाव, वनोजा तसेच तेलंगणा सीमावर्ती मार्गाची स्थितीदेखील अत्यंत दयनीय आहे. खराब रस्ते, अपूर्ण पूल आणि डांबरीकरण न झाल्याने या मार्गावर प्रवास करणे अत्यंत अवघड झाले आहे. अशा स्थितीत टोलवसुली करणे हे वाहतूकदारांच्या आणि प्रवाशांच्या आर्थिक व मानसिक छळासारखे असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहे.

अपूर्ण कामांची यादी; पण टोल सुरू

महामार्गावरील अनेक मूलभूत कामे अद्याप प्रलंबित असूनही, टोलवसुली सुरू करण्यात आली आहे. गडचांदूर उडाणपूल व धामणगाव नाला पूल अपूर्ण, साईडिंग रस्त्यांची कामे अपूर्ण आहे. प्रवासी निवारे, सुरक्षा कठडे, गावफलकांचे अभाव किंवा चुकलेली माहिती असलेला आहे. त्यामुळे दुरुस्ती मागणी करण्यात आली आहे. 

टॅग्स :NHAIभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणhighwayमहामार्ग