शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अपूर्ण रस्त्यांवर टोलवसुली कशी काय? निर्णयाविरोधात वाहतूकदारांत तीव्र नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 19:08 IST

Chandrapur : कोरपना व वनसडी परिसरात टोलनाका उभारल्यामुळे ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे हा टोल स्थानिकांच्या पाठीवरचा अन्याय असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : राजुरा-कोरपना-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील कामे अद्याप पूर्ण झालेली नसतानाही, देवघाट टोलनाक्यावर टोलवसुली सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे वाहतूकदार, शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे निवेदन देत, टोलवसुली तात्काळ स्थगित करण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.

कोरपना हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे बाजारपेठ, शाळा, प्रशासकीय कार्यालये आहेत. यासाठी शेतकरी व नागरिकांना नियमित ये-जा करावी लागते. परंतु सध्या सुरू झालेल्या टोलवसुलीमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या बियाणे, खते, औजारे ने-आण करताना टोल भरण्याचा भार सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात टोल सुरू झाल्याने सामान्य नागरिकांची आर्थिक चणचण वाढली आहे. शासनाने या टोल नाक्याबाबत चौकशी करून वस्तुस्थिती जाणून घ्यावी व त्यानंतरच कर आकारणी सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

उडाणपुलांची रंगरंगोटी व सौंदर्गीकरण रखडले

उडाणपुलांची रंगरंगोटी व सौंदर्गीकरण पूर्ण झाले नाही. रस्त्यावर प्रवासात अनेक अडथळे येत असूनही टोल भरावा लागत आहे, ही बाब अन्यायकारक ठरत असल्याचा आरोप आबीद अली यांनी केला आहे.

टोल स्थानिकांवर लादल्याचा आरोप

कोरपना व वनसडी परिसरात टोलनाका उभारल्यामुळे ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे हा टोल स्थानिकांच्या पाठीवरचा अन्याय असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. दरम्यान वणी, अंतरगाव, वनोजा तसेच तेलंगणा सीमावर्ती मार्गाची स्थितीदेखील अत्यंत दयनीय आहे. खराब रस्ते, अपूर्ण पूल आणि डांबरीकरण न झाल्याने या मार्गावर प्रवास करणे अत्यंत अवघड झाले आहे. अशा स्थितीत टोलवसुली करणे हे वाहतूकदारांच्या आणि प्रवाशांच्या आर्थिक व मानसिक छळासारखे असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहे.

अपूर्ण कामांची यादी; पण टोल सुरू

महामार्गावरील अनेक मूलभूत कामे अद्याप प्रलंबित असूनही, टोलवसुली सुरू करण्यात आली आहे. गडचांदूर उडाणपूल व धामणगाव नाला पूल अपूर्ण, साईडिंग रस्त्यांची कामे अपूर्ण आहे. प्रवासी निवारे, सुरक्षा कठडे, गावफलकांचे अभाव किंवा चुकलेली माहिती असलेला आहे. त्यामुळे दुरुस्ती मागणी करण्यात आली आहे. 

टॅग्स :NHAIभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणhighwayमहामार्ग