शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

अपूर्ण रस्त्यांवर टोलवसुली कशी काय? निर्णयाविरोधात वाहतूकदारांत तीव्र नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 19:08 IST

Chandrapur : कोरपना व वनसडी परिसरात टोलनाका उभारल्यामुळे ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे हा टोल स्थानिकांच्या पाठीवरचा अन्याय असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : राजुरा-कोरपना-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील कामे अद्याप पूर्ण झालेली नसतानाही, देवघाट टोलनाक्यावर टोलवसुली सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे वाहतूकदार, शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे निवेदन देत, टोलवसुली तात्काळ स्थगित करण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.

कोरपना हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे बाजारपेठ, शाळा, प्रशासकीय कार्यालये आहेत. यासाठी शेतकरी व नागरिकांना नियमित ये-जा करावी लागते. परंतु सध्या सुरू झालेल्या टोलवसुलीमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या बियाणे, खते, औजारे ने-आण करताना टोल भरण्याचा भार सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात टोल सुरू झाल्याने सामान्य नागरिकांची आर्थिक चणचण वाढली आहे. शासनाने या टोल नाक्याबाबत चौकशी करून वस्तुस्थिती जाणून घ्यावी व त्यानंतरच कर आकारणी सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

उडाणपुलांची रंगरंगोटी व सौंदर्गीकरण रखडले

उडाणपुलांची रंगरंगोटी व सौंदर्गीकरण पूर्ण झाले नाही. रस्त्यावर प्रवासात अनेक अडथळे येत असूनही टोल भरावा लागत आहे, ही बाब अन्यायकारक ठरत असल्याचा आरोप आबीद अली यांनी केला आहे.

टोल स्थानिकांवर लादल्याचा आरोप

कोरपना व वनसडी परिसरात टोलनाका उभारल्यामुळे ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे हा टोल स्थानिकांच्या पाठीवरचा अन्याय असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. दरम्यान वणी, अंतरगाव, वनोजा तसेच तेलंगणा सीमावर्ती मार्गाची स्थितीदेखील अत्यंत दयनीय आहे. खराब रस्ते, अपूर्ण पूल आणि डांबरीकरण न झाल्याने या मार्गावर प्रवास करणे अत्यंत अवघड झाले आहे. अशा स्थितीत टोलवसुली करणे हे वाहतूकदारांच्या आणि प्रवाशांच्या आर्थिक व मानसिक छळासारखे असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहे.

अपूर्ण कामांची यादी; पण टोल सुरू

महामार्गावरील अनेक मूलभूत कामे अद्याप प्रलंबित असूनही, टोलवसुली सुरू करण्यात आली आहे. गडचांदूर उडाणपूल व धामणगाव नाला पूल अपूर्ण, साईडिंग रस्त्यांची कामे अपूर्ण आहे. प्रवासी निवारे, सुरक्षा कठडे, गावफलकांचे अभाव किंवा चुकलेली माहिती असलेला आहे. त्यामुळे दुरुस्ती मागणी करण्यात आली आहे. 

टॅग्स :NHAIभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणhighwayमहामार्ग