शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वाघांच्या शिकारीचे आंतरराष्ट्रीय जाळे आणि अवयवांचा बेकायदेशीर व्यापार चालतो कसा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 11:20 IST

Chandrapur : राजुरा न्यायालयात सादर एक हजार पानांचे आरोपपत्र, २९ आरोपींपैकी १३ जणांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वाघांच्या शिकारप्रकरणी चंद्रपूरवनविभागाकडून मंगळवारी (दि. २५) तब्बल एक हजार पानांचे आरोपपत्र राजुरा प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर दाखल करण्यात आला. वाघांच्या शिकारीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि अवयवांचा बेकायदेशीर व्यापार कसा चालतो, याबाबत धक्कादायक बाबी या अहवालात नमूद असल्याची माहिती सूत्राने दिली. या प्रकरणात आतापर्यंत २९ जणांची आरोपी म्हणून ओळख पटवण्यात आली. त्यापैकी १३ जणांना अटक झाली आहे.

राजुरा तालुक्यातून जानेवारी महिन्यात वनविभागाने बहेलिया टोळीचा मोरक्या अजित याला आधी अटक केली होती. वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेल्या बहेलिया व बावरिया टोळ्यांनी विदर्भातील चंद्रपूरसह मध्य भारतात सुमारे ७० वाघांची शिकार केल्याची माहिती आरोपपत्रात नमूद केल्याची माहिती आहे. वनविभागाच्या विशेष तपास पथकाने पाच राज्यांतील घटनांचा तपास करून शिकारी टोळीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन शोधून काढले. या प्रकरणात पूर्वोत्तर राज्यातील मिझोराम व मेघालय राज्यांतून आरोपींना अटक केली. एकूण २९ आरोपींपैकी १३ जणांना अटक झाली. अटकेतील आरोपींना दंडाधिकारी कोठडीत ठेवण्यात आले. शिकार प्रकरणाचा तपास करण्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (नियोजन व व्यवस्थापन) विवेक खांडेकर, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, ताडोबाचे क्षेत्रसंचालक प्रभुनाथ शुक्ला, उपवनसंरक्षक पियुषा जगताप यांच्या मार्गदर्शनात विशेष पथक तयार करण्यात आले होते.

व्हाया मिझोराम, मेघालय, हरयाणा...दोन महिन्यांतील तपासातून एक हजार पानांचे आरोपपत्र तयार झाले. या आरोपपत्रात आंतरराष्ट्रीय सिंडीकेटमध्ये २९ आरोपींची नावे आहेत. परंतु ईशान्येकडील तीन आरोपींसह फक्त १३ जणांना अटक करण्यात आली. शिकार प्रकरणाशी संबंधित चंद्रपूरपासून मिझोराम, मेघालय, हरयाणा ते श्रीलंकापर्यंतचे नेटवर्क कसे तयार झाले, यासंदर्भातही धक्कादायक माहिती आरोपत्रात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पाच राज्यांतील पथकांनी केला तपासमहाराष्ट्राचा वनविभाग, मध्य प्रदेश, आसाम, मिझोराम व मेघालयातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांनीही तपासासाठी विशेष कामगिरी केली. तीन राज्यांतील अधिकाऱ्यांशी समन्वयाची जबाबदारी उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, तपास अधिकारी पवनकुमार जोंग व चिंतनकुमार या अधिकाऱ्यांकडे होती.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरforest departmentवनविभाग