शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

डेंग्यूचे रुग्ण असतानाही चंद्रपूर स्वच्छ कसे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 22:51 IST

शहरातील डेंग्यूचे वाढते प्रमाण ही गंभीर बाब असून हे प्रशासनासमोर एक प्रकारचे आव्हान आहे. चंद्रपुरात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. याचा अर्थ शहराची साफसफाई व पाण्याचा निचरा योग्य पध्दतीने होत नाही, असे फटकारत डेंग्यूच्या निर्मूलनासाठी महानगराची स्वच्छता व पाण्याचा निचरा, याकडे विशेष लक्ष देवून यंत्रणेमार्फत ही कामे युध्दपातळीवर हाती घ्या, अशा शब्दात केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी महानगर प्रशासनाला खडसावले.

ठळक मुद्देस्वच्छता व पाण्याच्या निचऱ्याकडे लक्ष द्या : हंसराज अहीर यांनी अधिकाऱ्यांना खडसावले

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील डेंग्यूचे वाढते प्रमाण ही गंभीर बाब असून हे प्रशासनासमोर एक प्रकारचे आव्हान आहे. चंद्रपुरात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. याचा अर्थ शहराची साफसफाई व पाण्याचा निचरा योग्य पध्दतीने होत नाही, असे फटकारत डेंग्यूच्या निर्मूलनासाठी महानगराची स्वच्छता व पाण्याचा निचरा, याकडे विशेष लक्ष देवून यंत्रणेमार्फत ही कामे युध्दपातळीवर हाती घ्या, अशा शब्दात केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी महानगर प्रशासनाला खडसावले.डेंग्यूच्या वाढत्या रूग्णसंख्येसंदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. महानगरपालिकेतर्फे २५३ संशयित डेंग्यू रूग्णांचे नमुने तपासण्यात आले. त्यामध्ये ४३ नमुने पॉझिटीव्ह आढळून आले तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५५० संशयित डेंग्यू रूग्णांच्या रक्त चाचण्या घेण्यात आल्या. त्यापैकी १२० रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले. आजच्या स्थितीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकही रूग्ण भरती नाही, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. मोरे यांनी दिली.तरीही चंद्रपूर शहरामध्ये एवढे डेंग्यू रूग्ण असणे ही चांगली बाब नसून याचा अर्थ शहराची साफसफाई व पाण्याचा निचरा योग्य पध्दतीने होत नाही, हे उपस्थित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर मनपा आयुक्त संजय काकडे सांगितले की शहरातील झोपडपट्टी भागात जास्त डेंग्यू रूग्ण आढळले असून या भागाच्या स्वच्छतेवर अधिक भर देण्यात येत आहे.चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अ‍ॅपॅडेमिक परिस्थितीमध्ये शहरातील लालपेठ वेकोलि कॉलरी भाग येथील क्षेत्रिय रूग्णालयामध्ये रूग्ण भरती करता येतील काय, याची शक्यता पडताळावी व वेकोलिच्या अधिकाऱ्यांशी अधिष्ठाता व महानगपालिकेचे आयुक्त यांनी संपर्क साधून याबाबत बोलणे करावे, असे सूचविले. याकरिता वेकोलिचे क्षेत्रीय महाप्रबंधक आभास सिंह यांना या बैठकीत पाचारण करण्यात आले.खासगी डॉक्टरांनी डेंग्यू रुग्णाबाबत कळवावेडेंग्यू हा डासांमुळे होणारा आजार विषाणूजन्य व नोटीफायेबल असल्याने त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संशयित डेंग्यू रुग्ण आढळल्यास महानगरपालिका हद्दीतील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी व रुग्णालयांनी त्याची माहिती महानगरपालिकेस कळविणे अनिवार्य आहे, असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. याबाबत मनपा आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांद्वारे खासगी रुग्णालयांना वेळोवेळी प्रत्यक्ष भेटी देऊन, त्यांच्या बैठकी आयोजित करून याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. असे असताना शहरातील अनेक रुग्णालये व डॉक्टरांकडून मनपाला यासंबंधी कळविले जात नाही. तसेच खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी व रुग्णालयांकडून ‘कार्ड टेस्ट / आरडीटी’ (रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट) सारख्या प्राथमिक चाचणी करून डेंग्यु आजारांचे रुग्ण म्हणून निदान करीत असल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. वास्तविक कार्ड टेस्टद्वारे रुग्णाची तपासणी केली असता तो डेंग्यू रुग्ण आहे हे खात्रीने सांगता येत नाही. त्यासाठी एलायझा टेस्ट करणे गरजेचे आहे. कार्ड टेस्ट ही निश्चित डेंग्यूचे निदान करत नसल्याने एलायझा चाचणीव्दारे खासगी वैद्यकीय व्यवसायिकांनी डेंग्यू आजाराचे निदान करुन घेणे आवश्यक आहे, असे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.