शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूचे रुग्ण असतानाही चंद्रपूर स्वच्छ कसे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 22:51 IST

शहरातील डेंग्यूचे वाढते प्रमाण ही गंभीर बाब असून हे प्रशासनासमोर एक प्रकारचे आव्हान आहे. चंद्रपुरात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. याचा अर्थ शहराची साफसफाई व पाण्याचा निचरा योग्य पध्दतीने होत नाही, असे फटकारत डेंग्यूच्या निर्मूलनासाठी महानगराची स्वच्छता व पाण्याचा निचरा, याकडे विशेष लक्ष देवून यंत्रणेमार्फत ही कामे युध्दपातळीवर हाती घ्या, अशा शब्दात केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी महानगर प्रशासनाला खडसावले.

ठळक मुद्देस्वच्छता व पाण्याच्या निचऱ्याकडे लक्ष द्या : हंसराज अहीर यांनी अधिकाऱ्यांना खडसावले

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील डेंग्यूचे वाढते प्रमाण ही गंभीर बाब असून हे प्रशासनासमोर एक प्रकारचे आव्हान आहे. चंद्रपुरात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. याचा अर्थ शहराची साफसफाई व पाण्याचा निचरा योग्य पध्दतीने होत नाही, असे फटकारत डेंग्यूच्या निर्मूलनासाठी महानगराची स्वच्छता व पाण्याचा निचरा, याकडे विशेष लक्ष देवून यंत्रणेमार्फत ही कामे युध्दपातळीवर हाती घ्या, अशा शब्दात केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी महानगर प्रशासनाला खडसावले.डेंग्यूच्या वाढत्या रूग्णसंख्येसंदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. महानगरपालिकेतर्फे २५३ संशयित डेंग्यू रूग्णांचे नमुने तपासण्यात आले. त्यामध्ये ४३ नमुने पॉझिटीव्ह आढळून आले तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५५० संशयित डेंग्यू रूग्णांच्या रक्त चाचण्या घेण्यात आल्या. त्यापैकी १२० रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले. आजच्या स्थितीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकही रूग्ण भरती नाही, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. मोरे यांनी दिली.तरीही चंद्रपूर शहरामध्ये एवढे डेंग्यू रूग्ण असणे ही चांगली बाब नसून याचा अर्थ शहराची साफसफाई व पाण्याचा निचरा योग्य पध्दतीने होत नाही, हे उपस्थित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर मनपा आयुक्त संजय काकडे सांगितले की शहरातील झोपडपट्टी भागात जास्त डेंग्यू रूग्ण आढळले असून या भागाच्या स्वच्छतेवर अधिक भर देण्यात येत आहे.चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अ‍ॅपॅडेमिक परिस्थितीमध्ये शहरातील लालपेठ वेकोलि कॉलरी भाग येथील क्षेत्रिय रूग्णालयामध्ये रूग्ण भरती करता येतील काय, याची शक्यता पडताळावी व वेकोलिच्या अधिकाऱ्यांशी अधिष्ठाता व महानगपालिकेचे आयुक्त यांनी संपर्क साधून याबाबत बोलणे करावे, असे सूचविले. याकरिता वेकोलिचे क्षेत्रीय महाप्रबंधक आभास सिंह यांना या बैठकीत पाचारण करण्यात आले.खासगी डॉक्टरांनी डेंग्यू रुग्णाबाबत कळवावेडेंग्यू हा डासांमुळे होणारा आजार विषाणूजन्य व नोटीफायेबल असल्याने त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संशयित डेंग्यू रुग्ण आढळल्यास महानगरपालिका हद्दीतील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी व रुग्णालयांनी त्याची माहिती महानगरपालिकेस कळविणे अनिवार्य आहे, असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. याबाबत मनपा आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांद्वारे खासगी रुग्णालयांना वेळोवेळी प्रत्यक्ष भेटी देऊन, त्यांच्या बैठकी आयोजित करून याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. असे असताना शहरातील अनेक रुग्णालये व डॉक्टरांकडून मनपाला यासंबंधी कळविले जात नाही. तसेच खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी व रुग्णालयांकडून ‘कार्ड टेस्ट / आरडीटी’ (रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट) सारख्या प्राथमिक चाचणी करून डेंग्यु आजारांचे रुग्ण म्हणून निदान करीत असल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. वास्तविक कार्ड टेस्टद्वारे रुग्णाची तपासणी केली असता तो डेंग्यू रुग्ण आहे हे खात्रीने सांगता येत नाही. त्यासाठी एलायझा टेस्ट करणे गरजेचे आहे. कार्ड टेस्ट ही निश्चित डेंग्यूचे निदान करत नसल्याने एलायझा चाचणीव्दारे खासगी वैद्यकीय व्यवसायिकांनी डेंग्यू आजाराचे निदान करुन घेणे आवश्यक आहे, असे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.