शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

खरीपाचा भार उचलणार तरी कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:01 IST

शेतकऱ्यांना कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळाचे संकट नित्याचेच आहे. या संकटातून सावरताना अवकाळी पावसाचा तडाखाही सहन करावा लागत आहे. आता तर कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे खरीप तसेच रब्बी हंगामातील पीक कसे विकावे, हा प्रश्न त्यांना पडला आहे. सर्व संकट विसरून शेतकरी पेरणीपूर्व हंगामाची कामे करीत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात बघायला मिळत आहे.

ठळक मुद्देशेतमालाची विक्री झालीच नाही : शेतकऱ्यांना पीक कर्ज भरणेही झाले कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: कोरोनामुळे नागरिक विविध संकटाचा सामना करीत आहेत. त्यातच शेतकरी तर सातत्याच्या विविध संकटांच्या मालिकेने त्रस्त झाला आहे. त्यामुळे पेरणीपूर्व मशागत करुनही आर्थिक टंचाईमुळे खरीप हंगामाची पेरणी कशी करायची, असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांना पडला आहे.शेतकऱ्यांना कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळाचे संकट नित्याचेच आहे. या संकटातून सावरताना अवकाळी पावसाचा तडाखाही सहन करावा लागत आहे. आता तर कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे खरीप तसेच रब्बी हंगामातील पीक कसे विकावे, हा प्रश्न त्यांना पडला आहे. सर्व संकट विसरून शेतकरी पेरणीपूर्व हंगामाची कामे करीत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात बघायला मिळत आहे. परंतु त्याचवेळी त्यांना आर्थिक चिंताही सतावत आहे. खरीप पेरणीसाठी लागणारा खर्च कसा उभारायचा या चिंतेत सध्या जिल्ह्यातील शेतकरी आहे. जिल्ह्यात पाहिजे तशा सिंचनाच्या सुविधा नसल्यामुळे शेतकरी निसर्गाच्या पावसावर अवलंबून आहे.कधी अल्प पाऊस, अतिवृष्टी, गारपीट आदींचा सामना करताना शेतकरी मेटाकुटीला आला आहे. लॉकडाऊनमुळे पिकांची विक्री करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या. त्यात पुन्हा अवकाळी, गारपीटचा मारा सहन करावा लागल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. आता खरिपाची पेरणी कशी करायची, असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडला आहे.कृषी संचालकांची उधारी वसूल झालीच नाहीजिल्ह्यातील अनेक कृषी केंद्रसंचालकांची मागील वर्र्षाची उधारी आली नसल्याने कृषी केंद्र संचालक बी-बियाणे, खते व औषधी कंपनीला वेळेवर पैसे देऊ शकले नाही. त्यामुळे मिळणारी सवलतही त्यांना गमवावी लागली. परिणामी कृषी केंद्र संचालकांचा यावर्षीचा व्यवसायही अडचणीत सापडला आहे. कृषी केंद्रांकडून खते, बियाणे व औषधीची कंपनीकडे नोंदणी केली जात आहे. मात्र मोजकाच माल नोंदविला जात आहे. विशेष म्हणजे, काही जण चोर बिटी विक्रीचा प्रयत्न करीत आहे. चार ते पाच दिवसापूर्वी मूल-खेडी मार्गावर कृषी विभागाने एक ट्रक जप्त करून मोठा बीटी साठा जप्त केला. असा साठा विक्री झाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.आर्थिक फटकालॉकडाऊनचा हा काळ शेतकऱ्यांसाठी आर्थिक संकटात लोटणारा आहे. अस्मानी संकटाने शेतकरी वैतागला आहे. कोरडा व ओला दुष्काळ, गारपीट अशा संकटाना शेतकरी सामोरे जात आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे शेतमाल विक्रीचा प्रश्न कठीण झाला आहे. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे.

तालुक्यातील शेतकºयांना प्राधान्यसोयाबीन बियाने विकताना प्रथम तालुक्यातील शेतकºयांना प्राधान्य द्या, जे बियाने शिल्लक राहत असेल तर इतर तालुक्यातील शेतकºयांना द्यावे अशा सूचना वरोरा कृषी विभागाने कृषी केंद्र संचालकांना दिल्या आहेत.कृषीकेंद्र संचालक अडचणीतकोरोनामुळे अनेक व्यवसाय व उद्योगांवर परिणाम झाला आहे. असाच परिणाम कृषी केंद्रावरही पडला आहे. पावसाळा अगदी महिन्यावर आला असतानाही जिल्ह्यातील काही भागात कपाशी बियाणे अद्यापही पोहोचले नाही. तसेच गेल्यावर्षीची उधारीही बाकी असल्याने ती वसूल होणार की, नाही, याची चिंता संचालकांना सतावत आहे. शेतकरी हा शासनाचे धोरण व नैसर्गिक आपत्तीमुळे नेहमीच आर्थिक संकटात सापडत आहे. परंतु यावर्षी देशात घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकºयांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. पिकवलेल्या माल संचारबंदीमुळे, मजुरांअभावी शेतातच खराब होत आहे.बी-बियाणांचा प्रश्नयावर्षी शेतकºयांकडे पैसा शिल्लक नसल्याने येणाऱ्या खरीप हंगामाची व्यवस्था कशी करावी, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कृषी केंद्र चालकांची मागील वर्र्षाची उधारी अद्यापही काही शेतकरी देऊन शकले नाही. आता या खरीपाकरिता बी-बियाणे कुठून आणावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कृषी केंद्रांकडून यावर्षी शेतकऱ्यांना उधारीवर बी-बियाणे, खते व औषधी मिळण्याची शक्यता तशी कमीच आहे.

सोयाबीन बियानाचा तुटवडा होणार ?मागील वर्षी सोयाबीन पीक हाती येत असताना अवकाळी पावसाने झोडपले. परिणामी सोयाबीनला काळे डाग पडले होते. त्यामुळे बियाने तयार करताना अडचणी निर्माण झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे यावर्षी सोयाबीन बियानाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरी