शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

महिन्याच्या दीड हजार रुपयांमध्ये दिव्यांगांनी कसे जगावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 16:28 IST

औषधोपचाराचाही खर्च भागेना ! : महागाईच्या काळात दिव्यांगांचे मानधन अत्यल्प

राजेश बारसगडेलोकमत न्यूज नेटवर्कसावरगाव : महाराष्ट्र शासन व केंद्र शासनातर्फे राज्यातील दिव्यांगांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दरमहा दीड हजार रुपये मानधन दिले जाते. मात्र, महागाईने कळस गाठलेल्या या काळात हे मानधन अत्यल्प असल्याने या मानधनात वाढ करून महिन्याकाठी सहा हजार रुपये देण्यात यावे, अशी मागणी नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) येथील प्रगती दिव्यांग मंच व परिसर संघटनेने केली आहे.

महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग व्यक्तींना राज्य व केंद्र शासनाकडून संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दरमहा दीड हजार रुपये अर्थसाहाय्य दिले जात आहे. मात्र, समस्त दिव्यांगांना मिळणारा हा लाभ अत्यल्प स्वरूपाचा आहे. देशात सर्वत्र महागाईने कळस घातलेल्या या काळात तो पुरेसा नाही. अलीकडे शासनाने प्रत्येक वस्तूवर जीएसटी लागू केल्याने आज प्रत्येक साध्या साध्या वस्तूंचे भाव कुठल्या कुठे वाढलेले आहेत. त्यामुळे सर्वसाधारण मनुष्याचे जगणेसुद्धा कठीण झाले आहे.

मग पूर्वीच शारीरिक व्यंग असलेल्या दिव्यांगांनी जगावे तरी कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय आरोग्य, औषधोपचार व उदरनिर्वाहासाठी केवळ एक हजार पाचशे रुपये अर्थसाहाय्य म्हणजे ही दिव्यांगांची केलेली थट्टाच नाही काय? त्यामुळे दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या दीड हजार रुपये या मानधनात शासनाने तातडीने वाढ करून किमान सहा हजार रुपये प्रतिमाह अर्थसाहाय्य द्यावे, अशी समस्त दिव्यांग व्यक्तीं व प्रगती दिव्यांग मंच व परिसर संघटना तळोधी (बा.) ची मागणी आहे.

कधी कधी मानधनही वेळेवर मिळत नाहीसद्यःस्थितीत प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपयांचे मिळणारे हे मानधन कधी कधी वेळेवर मिळत नाही. कधी तर अनेक महिन्यांपर्यंत वाट पाहावी लागते. त्यामुळे दिव्यांग व वृद्ध दिव्यांग व्यक्तींना नियमितच्या औषध उपचारापासून व इतर गरजांपासून वंचित राहण्याची वेळ येते. दरम्यान, वृद्ध दिव्यांगांना पैशाअभावी उपचार न झाल्याने मृत्युमुखी पडल्याच्या बाबीही समोर आल्या आहेत. त्यामुळे या तुटपुंज्या अर्थसाहाय्यात वाढ करणे अत्यंत गरजेचे आहे. आणि मानधन वेळेवर मिळणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. इतर राज्यात दिव्यांग व्यक्तींना दरमहा ६ हजार रुपये मानधन मिळते. मग महाराष्ट्रातच का दिले जात नाही, असा समस्त दिव्यांगांचा सामूहिक प्रश्न आहे. याबाबत शासनाने गंभीर विचार करायला हवा.

"मीसुद्धा एक दिव्यांग असून माझ्यासारखे असे अनेक दिव्यांग आहेत. आणि दिव्यांगांना शासनाच्या या मानधनाशिवाय दुसरे कुठलेही उत्पन्नाचे साधन नाही. ही परिस्थिती जवळपास ९५ टक्के दिव्यांगांची आहे. आणि दीड हजार रुपयांत महिनाभर जगणे फार कठीण आहे. म्हणून शासनाने आतातरी आम्हा दिव्यांगांचा विचार करावा व शीघ्र मानधनात वाढ करावी."- तुलोपचंद उ. गेडाम, अध्यक्ष, प्रगती दिव्यांग मंच व परिसर संघटना, तळोधी (बा.). 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर