शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

महिन्याच्या दीड हजार रुपयांमध्ये दिव्यांगांनी कसे जगावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 16:28 IST

औषधोपचाराचाही खर्च भागेना ! : महागाईच्या काळात दिव्यांगांचे मानधन अत्यल्प

राजेश बारसगडेलोकमत न्यूज नेटवर्कसावरगाव : महाराष्ट्र शासन व केंद्र शासनातर्फे राज्यातील दिव्यांगांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दरमहा दीड हजार रुपये मानधन दिले जाते. मात्र, महागाईने कळस गाठलेल्या या काळात हे मानधन अत्यल्प असल्याने या मानधनात वाढ करून महिन्याकाठी सहा हजार रुपये देण्यात यावे, अशी मागणी नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) येथील प्रगती दिव्यांग मंच व परिसर संघटनेने केली आहे.

महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग व्यक्तींना राज्य व केंद्र शासनाकडून संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दरमहा दीड हजार रुपये अर्थसाहाय्य दिले जात आहे. मात्र, समस्त दिव्यांगांना मिळणारा हा लाभ अत्यल्प स्वरूपाचा आहे. देशात सर्वत्र महागाईने कळस घातलेल्या या काळात तो पुरेसा नाही. अलीकडे शासनाने प्रत्येक वस्तूवर जीएसटी लागू केल्याने आज प्रत्येक साध्या साध्या वस्तूंचे भाव कुठल्या कुठे वाढलेले आहेत. त्यामुळे सर्वसाधारण मनुष्याचे जगणेसुद्धा कठीण झाले आहे.

मग पूर्वीच शारीरिक व्यंग असलेल्या दिव्यांगांनी जगावे तरी कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय आरोग्य, औषधोपचार व उदरनिर्वाहासाठी केवळ एक हजार पाचशे रुपये अर्थसाहाय्य म्हणजे ही दिव्यांगांची केलेली थट्टाच नाही काय? त्यामुळे दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या दीड हजार रुपये या मानधनात शासनाने तातडीने वाढ करून किमान सहा हजार रुपये प्रतिमाह अर्थसाहाय्य द्यावे, अशी समस्त दिव्यांग व्यक्तीं व प्रगती दिव्यांग मंच व परिसर संघटना तळोधी (बा.) ची मागणी आहे.

कधी कधी मानधनही वेळेवर मिळत नाहीसद्यःस्थितीत प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपयांचे मिळणारे हे मानधन कधी कधी वेळेवर मिळत नाही. कधी तर अनेक महिन्यांपर्यंत वाट पाहावी लागते. त्यामुळे दिव्यांग व वृद्ध दिव्यांग व्यक्तींना नियमितच्या औषध उपचारापासून व इतर गरजांपासून वंचित राहण्याची वेळ येते. दरम्यान, वृद्ध दिव्यांगांना पैशाअभावी उपचार न झाल्याने मृत्युमुखी पडल्याच्या बाबीही समोर आल्या आहेत. त्यामुळे या तुटपुंज्या अर्थसाहाय्यात वाढ करणे अत्यंत गरजेचे आहे. आणि मानधन वेळेवर मिळणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. इतर राज्यात दिव्यांग व्यक्तींना दरमहा ६ हजार रुपये मानधन मिळते. मग महाराष्ट्रातच का दिले जात नाही, असा समस्त दिव्यांगांचा सामूहिक प्रश्न आहे. याबाबत शासनाने गंभीर विचार करायला हवा.

"मीसुद्धा एक दिव्यांग असून माझ्यासारखे असे अनेक दिव्यांग आहेत. आणि दिव्यांगांना शासनाच्या या मानधनाशिवाय दुसरे कुठलेही उत्पन्नाचे साधन नाही. ही परिस्थिती जवळपास ९५ टक्के दिव्यांगांची आहे. आणि दीड हजार रुपयांत महिनाभर जगणे फार कठीण आहे. म्हणून शासनाने आतातरी आम्हा दिव्यांगांचा विचार करावा व शीघ्र मानधनात वाढ करावी."- तुलोपचंद उ. गेडाम, अध्यक्ष, प्रगती दिव्यांग मंच व परिसर संघटना, तळोधी (बा.). 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर