शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक नळाऐवजी न.प.ने दिले घरोघरी नळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 00:16 IST

बल्लारपुरात सार्वजनिक नळाद्वारे सुमारे १२०० कुटुंबांना पाणी मिळते. मात्र या सार्वजनिक नळांच्या तोट्याच चोरटे चोरून नेत असल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत होता. यावर मात करण्यासाठी बल्लारपूर नगरपालिकेने विविध उपाय योजिले.

ठळक मुद्देपाण्याच्या अपव्यय टाळला : सार्वजनिक नळांच्या तोट्या वारंवार चोरी जात असल्याने पालिका त्रस्त

वसंत खेडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपुरात सार्वजनिक नळाद्वारे सुमारे १२०० कुटुंबांना पाणी मिळते. मात्र या सार्वजनिक नळांच्या तोट्याच चोरटे चोरून नेत असल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत होता. यावर मात करण्यासाठी बल्लारपूर नगरपालिकेने विविध उपाय योजिले. मात्र उपयोग झाला नाही. अखेर सार्वजनिक नळांवर अवलंबून असलेल्या प्रत्येक कुटुंबाच्या घरीत पालिकेने नळ बसविला.बारमाही वाहणाऱ्या वर्धा नदीच्या काठावर बल्लारपूर शहर वसले आहे. या नदीच्या पात्रात बाराही महिने मुबलक पाणी राहात असल्याने पेपरमिलसारखा मोठा उद्योग येथे आला. तसेच बल्लारपूर शहरात एक-दोन वर्षांचा अपवाद वगळता येथे पाण्याची तीव्र टंचाई भासली नाही. भर उन्हाळ्यातही बल्लारपूरवासीयांना गरजेएवढे पाणी मिळत आले आहे. येथे एकीकडे सार्वजनिक व खासगी नळ, बोअरींग या साधनांद्वारे पाण्याची मुबलकता आहे तर दुसरीकडे त्याच पाण्याचा अपव्ययही तेवढ्याच प्रमाणात दिसून येतो आहे. याचे महत्वाचे कारण भुरट्या चोरांकडून सार्वजनिक नळांच्या तोटींची होत असलेली चोरी, हे आहे. चोरीचा हा प्रकार येथे वारंवार होतो. तोटी नसल्यामुळे नळाद्वारे पाणी विनाकारण वाहून जात आहे. तोटीच्या चोरी आळा बसावा याकरिता नगर परिषदेने पाईपाला तोट्यांना वेल्डिंगने जोडले. तरीही उपयोग झाला नाही. तोटीसह पाईपला कापून नेले. बल्लारपूर शहरात एकूण १६९ ठिकाणी सार्वजनिक नळ स्टँड पोस्ट लावले आहेत. पाण्याच्या देयकापोटी नगर परिषदेला, महाराष्टÑ जीवन प्राधीकरणाला महिनाकाठी पाच लाख रूपये द्यावे लागत आहेत. सार्वजनिक नळातून सुमारे १२०० कुटुंब पाणी भरत असतात. या १६९ नळांमधून, त्यांना तोटी नसल्याने किती पाणी विनाकारण वाया जात आहे, याची कल्पना येते. मौल्यवान पाणी वाया जाऊ नये, याकरिता नगर परिषद प्रशासन आणि मजिप्रा यांनी चर्चा करून त्यावर एक उपाय योजला तो असा. सार्वजनिक सर्व नळ बंद करायचे. या नळांवर अवलंबून असलेल्या सर्वच घरांना नळ जोडून पाणी द्यायचे. नवीन नळ कनेक्शनकरिता प्रत्येकाकडून ५४० रूपये डिपाझीट म्हणून घ्यायचे. नळ जोडणीचा सर्व खर्च नगर परिषदेने उचलायचा, असे ठरले आणि तीन महिण्यापासून त्यावर काम सुरू आहे. निर्धारित एकूण १२०० मधून आजवर ८९५ घरी नळ जोडणी होऊन त्यांच्या घरी नळाने पाणीही जाऊ लागले आहे. सर्व १२०० घरी नळ जोडणी पूर्ण होऊन पाणी जाणे सुरू झाल्यानंतर सार्वजनिक नळ बंद केले जाणार आहे. या उपाय योजनानंतर तोटी चोरीचा प्रकार होणार नाही. आज विनााकारण पाणी वाया जात आहे ते बंद होईल.पालिकेला एक कोटीचा खर्चयावर नगर परिषदेचे एक कोटी रूपये खर्च होणार आहे. या योजनेतील नळधारकांना काहीच महिने मोफत पाणी मिळेल. नंतर त्यांच्या वापराप्रमाणे त्यांना पाण्याचे बिल भरावे लागणार आहे. न. प. च्या शहरात ५४ कुपनलिका आहेत. त्या मात्र तशाच ठेवल्या जाणार आहेत. बल्लारपूर येथील जीवन प्राधीकरणाला वर्धा नदीपासून पाणी पुरवठा होत असतो. नदीच्या पात्रात एकूण तीन विहीरी आहेत. त्यातून पाण्याचा उत्सर्ग होत असतो. सद्या पाणी पुरवठा व्यवस्थित सुरू आहे. पाण्याची पातळी घसरल्यास चंद्रपूरजवळील माना कोळसा खाणीतून पाणी घेण्याची तयारी मजिप्राने चालविली आहे. मागील वर्षी शेवटी शेवटी माना कॉलरीचे पाणी घ्यावे लागले होते. एकंदरीत, बल्लारपुरात सध्या पाण्याची टंचाई नाही, तरीही लोकांनी पाण्याचा वापर गरजे एवढाच करावा असे आवाहन नगर परिषद प्रशासन आणि मजिप्राने नागरिकांना केले आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई