शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

गावकरी वन्यप्राण्यांच्या दहशतीत

By admin | Updated: April 29, 2015 01:10 IST

सिंदेवाही तालुक्यातील अतिदुर्गम कारव्हा हे गाव ताडोबा(कोर) आणि बफर झोनच्या विळख्यात अडकले असून वनविभागाच्या जाचक नियमांमध्ये ...

दिलीप मेश्राम/सुनील घाटे नवरगाव-वासेरासिंदेवाही तालुक्यातील अतिदुर्गम कारव्हा हे गाव ताडोबा(कोर) आणि बफर झोनच्या विळख्यात अडकले असून वनविभागाच्या जाचक नियमांमध्ये जीवन जगताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यातच दिवसरात्रं या गावातील नागरिकांना वन्यप्राण्यांच्या दहशतीत जगावे लागत आहे.घराबाहेर पडले की येथील नागरिकांचा थेट संपर्क येतो तो जंगलाशी. घरा शेजारूनच मोठे जंगल आहे. या जंगलात वाघ, बिबट, अस्वल, रानडुक्कर अशा अनेक हिंस्त्र प्राण्यांचा वावर आहे. रात्रीच्यावेळी प्राणी गावात येतात. एवढेच नव्हे तर दिवसाही घराशेजारी या प्राण्यांचे दर्शन होते. काही दिवसांपूर्वी दागो तिमा मानकर, वामन टेकाम, रमेश आदे, भाऊराव गोहणे, राजू गायकवाड, मनोहर शेंडे यांच्यासह गावातील इतर काही जणांच्या जनावरांना वाघाने गावात येऊन ठार मारले. अस्वलसुद्धा गावात येत असल्याने रात्रीला गावात दहशतच असते. रात्रीच्यावेळी शौचाला जायचे झाल्यास जंगलातच जावे लागते. वन्यप्राण्यांच्या दहशतीपोटी काही नागरिकांनी घरामध्ये शौचालये बांधली आहेत. तलावाजवळ ताडोबाचे गेट असून जवळच्या गावातील एखाद्या व्यक्तीला ताडोबामधून कारव्हा येथे ेयायचे असल्यास अधिकारी त्यांना येऊ देत नाहीत. गावकऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी शिवणी रस्त्यावर पुन्हा एक गेट तयार करण्यात आले होते. या गेटवरून सर्व चौकशी करूनच नागरिकांना सोडले जात होते. बाहेर गावावरून परत येण्यासाठी उशिर झाला तर कारव्हा गावातीलच नागरिकांना गावात येण्यासाठी वनविभागाकडून बंदी करण्यात आली होती. मात्र गावकऱ्यांनी एकजुटीने ेशिवणी मार्गावरील गेट बंद करण्यासाठी आंदोलन केले. तोडफोड केली. तेव्हा गावकऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.गावकऱ्यांची जनावरे जंगली प्राण्यांकडून मारली तर नुकसान भरपाईसाठी अर्ज करावा लागतो. परंतु क्षेत्रसहायक १२ किलोमिटर अंतरावरील पळसगावला राहतात. संपूर्ण जंगलाचा व वाहतुकीची साधने नसलेला रस्ता असल्याने अनेकजण नुकसान भरपाईसाठी अर्ज करण्याचे टाळतात. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघ-बिबटांची संख्या भरपूर असल्याने गावकऱ्यांना सतत जीवन जगावे लागत आहे. एक वाघीण तीन पिलांसह या परिसरात सतत वावरत असल्याने आणखीन दहशत निर्माण झालेली आहे. गावकऱ्यांचा नेहमीच जंगलाशी संबंध येतो. वनविभागाची काही कामे रोजगार हमीच्या माध्यमातून चालतात यावरही काही मजूर काम करायला जातात. परंतु त्यांना मजुरीचे पैसे बरोबर मिळत नाही. जंगलात राहत असल्याने, वनविभागाशीच संपर्क येतो. त्यामुळे वन अधिकाऱ्यांच्या दबंगगिरीविरुद्ध ब्र सुद्धा काढायला जमत नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.