शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
3
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
4
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
5
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
6
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
7
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
8
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
9
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
10
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
11
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
12
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
13
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
14
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
15
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
16
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
17
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
18
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
19
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
20
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गावकरी वन्यप्राण्यांच्या दहशतीत

By admin | Updated: April 29, 2015 01:10 IST

सिंदेवाही तालुक्यातील अतिदुर्गम कारव्हा हे गाव ताडोबा(कोर) आणि बफर झोनच्या विळख्यात अडकले असून वनविभागाच्या जाचक नियमांमध्ये ...

दिलीप मेश्राम/सुनील घाटे नवरगाव-वासेरासिंदेवाही तालुक्यातील अतिदुर्गम कारव्हा हे गाव ताडोबा(कोर) आणि बफर झोनच्या विळख्यात अडकले असून वनविभागाच्या जाचक नियमांमध्ये जीवन जगताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यातच दिवसरात्रं या गावातील नागरिकांना वन्यप्राण्यांच्या दहशतीत जगावे लागत आहे.घराबाहेर पडले की येथील नागरिकांचा थेट संपर्क येतो तो जंगलाशी. घरा शेजारूनच मोठे जंगल आहे. या जंगलात वाघ, बिबट, अस्वल, रानडुक्कर अशा अनेक हिंस्त्र प्राण्यांचा वावर आहे. रात्रीच्यावेळी प्राणी गावात येतात. एवढेच नव्हे तर दिवसाही घराशेजारी या प्राण्यांचे दर्शन होते. काही दिवसांपूर्वी दागो तिमा मानकर, वामन टेकाम, रमेश आदे, भाऊराव गोहणे, राजू गायकवाड, मनोहर शेंडे यांच्यासह गावातील इतर काही जणांच्या जनावरांना वाघाने गावात येऊन ठार मारले. अस्वलसुद्धा गावात येत असल्याने रात्रीला गावात दहशतच असते. रात्रीच्यावेळी शौचाला जायचे झाल्यास जंगलातच जावे लागते. वन्यप्राण्यांच्या दहशतीपोटी काही नागरिकांनी घरामध्ये शौचालये बांधली आहेत. तलावाजवळ ताडोबाचे गेट असून जवळच्या गावातील एखाद्या व्यक्तीला ताडोबामधून कारव्हा येथे ेयायचे असल्यास अधिकारी त्यांना येऊ देत नाहीत. गावकऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी शिवणी रस्त्यावर पुन्हा एक गेट तयार करण्यात आले होते. या गेटवरून सर्व चौकशी करूनच नागरिकांना सोडले जात होते. बाहेर गावावरून परत येण्यासाठी उशिर झाला तर कारव्हा गावातीलच नागरिकांना गावात येण्यासाठी वनविभागाकडून बंदी करण्यात आली होती. मात्र गावकऱ्यांनी एकजुटीने ेशिवणी मार्गावरील गेट बंद करण्यासाठी आंदोलन केले. तोडफोड केली. तेव्हा गावकऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.गावकऱ्यांची जनावरे जंगली प्राण्यांकडून मारली तर नुकसान भरपाईसाठी अर्ज करावा लागतो. परंतु क्षेत्रसहायक १२ किलोमिटर अंतरावरील पळसगावला राहतात. संपूर्ण जंगलाचा व वाहतुकीची साधने नसलेला रस्ता असल्याने अनेकजण नुकसान भरपाईसाठी अर्ज करण्याचे टाळतात. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघ-बिबटांची संख्या भरपूर असल्याने गावकऱ्यांना सतत जीवन जगावे लागत आहे. एक वाघीण तीन पिलांसह या परिसरात सतत वावरत असल्याने आणखीन दहशत निर्माण झालेली आहे. गावकऱ्यांचा नेहमीच जंगलाशी संबंध येतो. वनविभागाची काही कामे रोजगार हमीच्या माध्यमातून चालतात यावरही काही मजूर काम करायला जातात. परंतु त्यांना मजुरीचे पैसे बरोबर मिळत नाही. जंगलात राहत असल्याने, वनविभागाशीच संपर्क येतो. त्यामुळे वन अधिकाऱ्यांच्या दबंगगिरीविरुद्ध ब्र सुद्धा काढायला जमत नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.