शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
4
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
5
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
6
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
7
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
8
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
9
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
10
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
11
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
12
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
13
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
14
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
15
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
16
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
17
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
18
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
19
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
20
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
Daily Top 2Weekly Top 5

मानधन योजना शेतकऱ्यांना फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 00:22 IST

बल्लारपूर तालुका कृषी अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाच्या वतीने नांदगाव (पोडे) येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणात शेतकरी मानधन योजनेसंदर्भात नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

ठळक मुद्देगोविंदा पोडे : नांदगाव (पोडे) येथे नोंदणी शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : भारतातील ७० टक्के ग्रामीण अर्थव्यवस्था कृषी व्यवसायांवर अवलंबून आहे. लाखोंच्या पोशिंद्याचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकरी मानधन योजना सुरु केली. केंद्र व राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या भवितव्याची चिंता आहे. यातूनच शेतकरी मानधन योजना कार्यान्वित करण्यात आली असून योजना शेतकºयांना फायदेशिर असल्याचे प्रतिपादन बल्लारपूर पंचायत समितीचे सभापती गोविंदा पोडे यांनी बुधवारी नांदगाव (पोडे) येथे केले.बल्लारपूर तालुका कृषी अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाच्या वतीने नांदगाव (पोडे) येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणात शेतकरी मानधन योजनेसंदर्भात नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रमोद देठे होते तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार जयंत पोहनकर, तालुका कृषी अधिकारी प्रशांत कसराळे, माजी उपसभापती अनेकश्वर मेश्राम, कृषी मंडळ अधिकारी बी. एस. सलामे, कृषी विस्तार अधिकारी मारोती वरभे, तलाठी शंकुतला कोडापे, कृषी सहाय्यक श्रीकांत ठवरे, उमाकांत बोधे उपस्थित होते. आपले सरकार सेतू केंद्रामार्फत प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेत नोंदणीधारक शेतकºयांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. प्रास्ताविक प्रशांत कसराळे, सरपंचालन श्रीकांत ठवरे तर आभार उमाकांत बोधे यांनी मानले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.अशी आहे शेतकरी योजनाशेतकºयांना दिलासा देण्यासाठी प्रधानमंत्री शेतकरी योजना सुरु झाली आहे. दोन हेक्टरपेक्षा कमी जमीनधारक शेतकºयाला लाभ घेता येते. १८ ते ४० वयोगटातील शेतकऱ्यांनी वयाच्या ६० वर्षापर्यंत दरमहा ५५ ते २०० रुपये जमा करण्याची अट आहे. ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर अल्पभूधारक शेतकºयांना प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये निवृत्ती वेतन म्हणून मिळणार आहे. यासाठी आधार कॉर्ड, बँक ते पासबुक व शेतीचा आठ अ खाते उतारा आवश्यक असून आपले सरकार सेतू केंद्रामार्फत नोंदणी करावी लागणार आहे. लाभार्थीच्या मृत्यूनंतर देखील कुटुंब निवृत्तीवेतन मिळणार आहे.शेतकरी मानधन योजनेत १८ वर्षाच्या शेतकऱ्यांने ५५ रुपये महिन्याला जमा केल्यास वर्षाला ६६० रुपये पडते. यानुसार ४२ वर्षाचे २७ हजार ७२० रुपये भरणा करणार ६० वर्षापर्यंत ६० वर्षानंतर वर्षाला ३६ हजार रुपये लाभार्थ्यांना मिळतील. त्याच प्रमाणे ४० वर्षाच्या, लाभार्थ्यांने दरमहा २०० रुपये भरणा केल्यास २० वर्षापर्यंत ४८ हजार रुपये भरावे लागती. ६० वर्ष झाल्यावर वार्षिक ३६ हजार रुपये मिळणार आहेत. यामध्ये लाभार्थ्यांना मृत्यूनंतर वारसाना निवृत्ती वेतन देण्याची तरतूद आहे.- प्रशांत कसराळे, तालुका कृषी अधिकारी, बल्लारपूर

टॅग्स :Socialसामाजिक