शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

होम क्वारंटाईन व्यक्ती फिरत आहेत रस्त्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 06:00 IST

कोरोना व्हायरसने सर्वत्र पाय पसरले आहे. देश तथा राज्य या आजाराने ग्रस्त असल्याने सर्वांना धडकी भरली आहे. बाहेर राज्यात व इतर जिल्ह्यात नोकरीकरिता व शिक्षणाकरिता गेलेले युवक स्वगृही परतले. परंतु येथे येताच त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आणि त्यांना होम कारेंटाईन करण्यात आले. त्यांच्या हातावर शिक्का मारून पुढील १४ दिवस घरीच राहण्याचा सल्ला दिला.

ठळक मुद्देहोम क्वारंटाईन व्यक्ती फिरत आहेत रस्त्यांवर

लोकमत न्यूज नेटवर्कआवाळपूर : देशभरात कोरोना व्हायरसने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. त्याच धर्तीवर संपूर्ण भारत देशात संचारबंदी लाग आहे. परराज्यातून, इतर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तीस घरी राहण्याकरिता होम कारेंटाईन करून त्यांच्या हातावर शिक्का मारण्यात आला आहे. त्यांना पुढील १४ दिवस घरी राहण्याची सक्त आदेश दिले आहेत. मात्र आवाळपूर, नांदाफाटा येथील असे व्यक्ती सर्रास रस्त्यावर व इतरत्र फिरताना दिसत आहेत.कोरोना व्हायरसने सर्वत्र पाय पसरले आहे. देश तथा राज्य या आजाराने ग्रस्त असल्याने सर्वांना धडकी भरली आहे. बाहेर राज्यात व इतर जिल्ह्यात नोकरीकरिता व शिक्षणाकरिता गेलेले युवक स्वगृही परतले.परंतु येथे येताच त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आणि त्यांना होम कारेंटाईन करण्यात आले. त्यांच्या हातावर शिक्का मारून पुढील १४ दिवस घरीच राहण्याचा सल्ला दिला.परंतु ही तरुण मंडळी कसलीही भीती न बाळगता सर्रासपणे समाजात वावरत आहेत. एवढेच नाही तर त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला असता ते हुज्जत घालत असल्याचे समोर येत आहे.आवाळपुरात ४० तर नांदाफाटा येथे १०५ युवक बाहेर जिल्ह्यातून व राज्यातून आलेले आहेत, हे विशेष. आपल्या घरी न राहता कुठेही दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आहे.होम कारेंटाईन असलेल्या व्यक्तींनी शासनाचा आदेशाचे पालन करून घरीच राहावे. काही व्यक्ती रस्त्यावर फिरताना दिसून येत आहे. आम्हाला कडक पावले उचलून सक्ती करण्यास भाग पाडू देऊ नका.-ग्रामविकास अधिकारीगेडाम, ग्रामपंचायत नांदा

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस