शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

घरपोच आहारात दांडी

By admin | Updated: September 10, 2014 23:29 IST

शासन कुपोषणमुक्त देश घडविण्यासाठी कोट्यवधीचा खर्च करीत आहे. मात्र ग्रामीण भागासह शहरी भागातही कुपोषणाचे प्रमाण काही कमी झाले नाही. याला कारणही तसेच आहे. शासनाद्वारे देण्यात येणारा पोषण आहार

कुपोषण कायमच : महिनाभरातील ८ हजार ६६ क्विंटल आहार जातो कुठे ?रवी जवळे - चंद्रपूरशासन कुपोषणमुक्त देश घडविण्यासाठी कोट्यवधीचा खर्च करीत आहे. मात्र ग्रामीण भागासह शहरी भागातही कुपोषणाचे प्रमाण काही कमी झाले नाही. याला कारणही तसेच आहे. शासनाद्वारे देण्यात येणारा पोषण आहार लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नाही. प्रत्येक बालकाला, गरोदर व स्तनदा मातेला दररोज १२० ग्रॅम ते १४० ग्रॅम आहार घरपोच देण्याचा शासकीय नियम आहे. हा आहार दर महिन्याला शासनाकडून पुरविलाही जातो. मात्र अनेक गरोदर, स्तनदा मातांना व बालकांना घरपोच हा आहार मिळतच नसल्यामुळे महिनाभरातील ८ हजार ६६ क्विंटल आहार जातो कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.चंद्रपूर जिल्ह्यात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची संख्या मोठी आहे. ग्रामीण भागात, तळागाळातील दुर्गम भागात हातावर आणून पानावर खात जीवन कंठत आहेत. अशावेळी आपल्या बालकांना पोषण आहार देताना त्यांना कठीण जाते. परिणामी कुपोषणाचा आलेख कधीच कमी होत नाही. त्यामुळे शासनाने कुपोषणमुक्त देश घडविण्यासाठी प्राथमिक शाळा व अंगणवाडीमधील बालकांना, याशिवाय ० ते ३ वर्ष वयोगटातील बालकांना, गरोदर मातांना आणि स्तनदा मातांना मोफत पोषण आहार देण्याचा उपक्रम सुरू केला. यावर शासन दररोज कोट्यवधीचा खर्च करते. उल्लेखनीय असे की ० ते ३ वर्ष वयोगटातील बालकांना व गरोदर आणि स्तनदा मातांना हा आहार घरपोच देणे बंधनकारक आहे. जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण विभागाला या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या माध्यमातून त्या त्या परिसरात सर्वेक्षण करून ० ते ३ वर्ष वयोगटातील बालके, गरोदर माता, स्तनदा माता यांची यादी तयार केली जाते. दर महिन्याला ही यादी अपडेट केली जाते. त्यानंतर अंगणवाडी सेविका व मदतनीसच्याच माध्यमातून हा आहार लाभार्थ्यांना घरपोच पोहचवावा लागतो. विशेष म्हणजे, कोणत्या लाभार्थ्याला कोणता आहार किती द्यायचा याचेही शासकीय संकेत आहेत. ० ते ३ वर्ष वयोगटातील बालकांना सत्तू १३० ग्रॅम, शिरा १२० ग्रॅम व उपमा १२० ग्रॅम असा आहार दररोज द्यावा लागतो. गरोदर व स्तनदा मातांना सुकडी १४० ग्रॅम, उपमा १४० ग्रॅम व शिरा १४० ग्रॅम दररोज द्यावा लागतो. महिन्यातील २५ दिवस हा आहार दिला जातो. यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या कंत्राटी कंपनीकडून महिनाभरात लाभार्थ्यांच्या निकषानुसार ८ हजार ६६ क्विंटल आहार जिल्हा परिषदेकडे पुरविलाही जातो. मात्र शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील अनेक लाभार्थ्यांना हा आहार घरपोच मिळत नाही.