शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

शिस्तबद्ध मूक मोर्चाने घडविला इतिहास

By admin | Updated: October 20, 2016 00:44 IST

कोपर्डी येथील बलात्कार व हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी द्या, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल करा, ..

ऐक्य आणि नियोजनाचे दर्शन : चंद्रपुरात दिवसभर मोर्चाचीच चर्चाचंद्रपूर : कोपर्डी येथील बलात्कार व हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी द्या, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल करा, स्वामीनाथन आयोग तत्काळ लागू करा यासह एकूण २१ मागण्यांच्या पूर्ततेसाठी मराठा कुणबी क्रांती मुक मोर्चा बुधवारी चंद्रपुरात धडकला. हजारोंच्या संख्येत समाजबांधव या मोर्चात सहभागी झाले होते. म्हाडा कॉलनीपासून चांदा क्लब ग्राऊंडपर्यंत नऊ किलोमीटरचे अंतर कापून चालत आलेला हा मोर्चा बघण्यासाठी नागरिकांचीही गर्दी उसळली होती. महाराष्ट्रभर निघालेल्या मुक मोर्चाची शिस्त चंद्रपुरातही अबाधित असल्याचे दिसून आले. मुक मोर्चाच्या आयोजनासाठी मागील एक महिन्यापासून चंद्रपुरात हालचाली आणि नियोजन सुरू होते. अखेर आज बुधवारी निघालेला मोर्चाच्या यशस्वीतेने आयोजकांच्या परिश्रमाची फलश्रृती झाली. मोर्चात मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित राहतील, हे लक्षात घेऊन शहराबाहेर म्हाडा कॉलनीतील मोकळ्या मैदानावरून या मोार्चाला सुरूवात झाली. सकाळपासूनच मोर्चेकरी विविध वाहनांनी म्हाडा कॉलनी परिसरात गोळा होण्यास सुरूवात झाली. मोर्चात सहभागी होणाऱ्या मराठा-कुणबी बांधवांसाठी पुरेशी व नियोजनबद्ध बैठक व्यवस्था करण्यात आली होती.उपस्थितांना माईकवरून सातत्याने श्स्तिीचे पालन करण्यासाठी व गोंधळ टाळण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात येत होत्या. महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दुपारी १२.१५ वाजता मोर्चा म्हाडा कॉलनीतून निघाला. अग्रभागी शाळकरी विद्यार्थीनी, त्यानंतर महाविद्यालयीन विद्यार्थिनी, महिला, शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, समाजातील पुरुष मंडळी, डॉक्टर, वकील व नेतेमंडळी असा क्रम ठरविण्यात आला होता. मराठा कुणबी क्रांती मुक मोर्चा सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास येथील चांदा क्लब ग्राऊंडवर पोहचला. त्यावेळी मोर्चात सहभागी युवतींनी मंचावरून मनोगत व्यक्त केले. शिवरायाच्या काळात स्त्रियांकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यांचे हात कलम केले जायचे. आता त्याच शिवरायाच्या भूमीत बलत्कारी मोकळे कसे ? देशाचे पोट भरणारा शेतकरी याच भूमीत भुकेला कसा, मराठा हा बहुजन समाजाचा घटक असतानाही तो आरक्षणाच्या बाहेर कसा, अशा विविध प्रश्नांची सरबत्तीच मोर्चेकरी युवतींनी आपल्या मनोगतातून शासनाला केली.दुपारी निघालेला मोर्चा २.३० वाजताच्या सुमारास जटपुरा गेटजवळ पोहचला. त्यानंतर जयंत टॉकीज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, गांधी चौक, गिरणार चौक, जटपुरा गेट, प्रियदर्शिनी चौक येथून निघून येथील चांदा क्लब ग्राऊंडवर समारोपासाठी एकवटला. एकाच वेळी सर्व मोर्चेकरी या पटांगणात एकत्रित आल्याने मोर्चाचे व्यापक स्वरुप दृष्टीपथास येत होते. अतिशय शिस्तबध्द पध्दतीने मोर्चेकरी चांदा क्लबच्या दरवाजातून आत येत होते. या ठिकाणी सर्व मोर्चेकरी एकत्रित आल्यानंतर जिजाऊ वंदना घेण्यात आली. हा मोर्चा नेतृत्वहिन असल्यामुळे कुणाही नेत्यांचे चांदा क्लब ग्राऊंडवर भाषण झाले नाही. मात्र या दरम्यान, मोर्चात सहभागी काही तरुणींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रणाली कृपल म्हणाली, कोपर्डीतील घटना अत्यंत घृणास्पद व लांच्छनास्पद आहे. त्यामुळे या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करते. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत असला तरी अशा घटना आजही आपल्या भूमीत घडत आहेत. शिवरायांच्या काळात स्त्रियांकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यांचे हात कलम केले जात होते. मात्र त्याच भूमीत आता बलत्कारी मोकळे फिरताहेत, हे दुर्दैवाची बाब आहे. अ‍ॅट्रासिटी कायद्याचा दुरूपयोग होत आहे, हे खरे आहे. त्यामुळे कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कायद्यात सुधारणा केली पाहिजे. मराठा हा बहुजन समाजाचाच घटक आहे. त्यामुळे त्यालाही आरक्षण मिळाले पाहिजे, असेही ती आपल्या मनोगतात म्हणाली. कोमल उदार म्हणाली, सध्या शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगच तारू शकतो. त्यामुळे शासनाने स्वामीनाथन आयोग तत्काळ लागू करणे आवश्यक आहे. यशस्वी कडवे म्हणाली, उद्योगांसाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहे. मात्र आता उद्योगच बंद पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अवस्था तेल गेले अन् तूपही गेले, अशी झाली आहे. शिष्टमंडळ म्हणून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या पाचही मुली परत आल्यानंतर राष्ट्रगित गाऊन मोर्चाचा समारोप करण्यात आला. विशेष म्हणजे, नऊ किलोमीटरचा दीर्घ प्रवास करून चांदा क्लब ग्राऊंडवर जमा झालेल्या मोर्चेकऱ्यांचा उत्साह समारोपापर्यंत कायम होता. मोर्चादरम्यान स्वयंसेवक पाणीपाऊच, रस्यावरील कचरा मनपाने ठेवलेल्या कंटेनरमध्ये टाकत होते. (लोकमत न्यूज नेटवर्क) शिष्टमंडळात पाच मुलीजिजाऊ वंदनेनंतर मोर्चेकरांचे शिष्टमंडळ या नात्याने पाच मुलींना जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी पाठविण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार या पाच निवडक मुलींची निवड करण्यात आली. यापैकी गौरी ठोंबरे हिने सर्वप्रथम व्यासपिठावर येऊन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाला पाठविण्यात येणाऱ्या निवेदनाचे वाचन केले. त्यानंतर पाचही मुली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाल्या.जिल्ह्याबाहेरील ग्रामीणांचा सहभागमोर्चात चंद्रपूरसह यवतमाळ, गडचिरोली व वर्धा जिल्ह्यातील ग्रामीणांचाही सहभाग दिसून आला तर काही मोर्चेकरी बाहेर जिल्ह्यातून रेल्वेनेही आले असल्याची चर्चा मोर्चादरम्यान होती.शेतीची कामे ठेवली बंदमोर्चात सहभागी व्हायचे असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आज शेतीची कामे बंद ठेवली. तर काहींनी आपली गुरे घरीच बांधून चंद्रपूरची वाट धरली. शेतीच्या कामाचा हंगाम असतानाही शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी आज मोर्चात आवर्जुन हजेरी लावली होती.बाजारपेठेत शुकशुकाट लाखोंचा फटकाबुधवारी सकल मराठा-कुणबी समाजाच्या वतीने मुक मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती. मोर्चासाठी पोलीस विभागाने शहरातील मुख्य रस्ते वाहनविरहित घोषित केले होते. दिवसभर एकाही वाहनाला जाऊ दिले जात नसल्याने शहरातील बाजारपेठेत शुकशुकाट पसरला होता. चंद्रपूरची बाजारपेठ ही प्रसिद्ध आहे. जिल्हाबाहेरील लोक खरेदीसाठी येतात. मात्र ऐन दिवाळीच्या तोंडावर व्यापाऱ्यांना लाखोंचा फटका सहन करावा लागला.