शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
6
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
7
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
8
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
9
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
10
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
11
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
12
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
13
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
14
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
15
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
16
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
17
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
18
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
19
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
20
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ

खड्ड्यांमुळे पहाडावरील रस्ते ठरताहेत मृत्युमार्ग

By admin | Updated: November 23, 2014 23:17 IST

जिवती-गडचांदूर तसेच गावखेड्यातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालविणे धोकादायक ठरत असून भरधाव वेगाने धावणारी काळीपिवळी आणि लालमातीच्या टिपरमुळे अपघाताचे

शंकर चव्हाण - जिवतीजिवती-गडचांदूर तसेच गावखेड्यातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालविणे धोकादायक ठरत असून भरधाव वेगाने धावणारी काळीपिवळी आणि लालमातीच्या टिपरमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. असे असतानाही रस्त्याची दुरुस्ती करण्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने पहाडावरील रस्ते मृत्यूचा मार्ग ठरत आहे.गाव खेड्यांचा विकास करण्यासाठी रस्त्यांना प्रथम प्राधान्य दिल्या जात आहे. शासनस्तरावरुन कोट्यावधी रुपये रस्त्याच्या कामासाठी खर्च केले जातात. तरीही पहाडावरील रस्त्याची अवस्था दयनीय आहे. जिवती ते गडचांदूर, जिवती-परमडोली, पाटण-जिवती, मराईपाटण, भारी, शंकरपठार, कोलांडी, सोरेकासा, धनकदेवी, कुंभेझरी, लेंडीगुडा, अंतापूर, नारायणगुडा, पून्नागुडा, पालडोह आदी गावातील रस्ते खराब झाले आहेत. रस्त्याची दुरुस्ती केली जाते. मात्र तेही मलमपट्टीसारखेच काही दिवसानंतर रस्ते जैसे थे होतात, अशी गंभीर स्थिती आहे. गडचांदूर-जिवती-माणिकगड मार्गे हा २० किमीचा प्रवास आहे. सर्वाधिक कर्मचारी व नागरिक जवळचा प्रवास म्हणून याच मार्गाने ये-जा करतात. दिवसभर वर्दळ असलेल्या वळणदार रस्त्यावरील खड्डे आणि भरधाव वेगाने चालणाऱ्या लालमातीच्या वाहनामुळे प्रवास धोकादायक बनले आहेत. रस्ते वळणदार असल्याने रात्रीच्या वेळेस अपघात घडत आहे. जिल्हा परिषद सदस्या सुजाता भगत यांनी धोकादायक ठरत असलेल्या वळणदार रस्त्यावर संरक्षण तट भिंतीचे काम करण्यास शासनास भाग पाडले. मात्र उर्वरीत कामे जैसे थे आहेत. याच रस्त्यावर हेमाडपंथी विष्णुचे मंदिर आहे व पुरातन किल्ला सुद्धा असल्याने या ठिकाणी शाळेच्या सहली, विष्णु मंदिराच्या दर्शनासाठी विविध जिल्ह्यातून भावीक मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र येथील रस्त्याची दयनीय अवस्था विकासाला अडसर ठरू लागली आहे. रस्ते हे प्रगतीचे पहिले पाऊल मानले जाते आणि त्यावर मोठ्या प्रमाणात खर्च होत असतानाही रस्ते धोकादायक ठरत आहेत. पायवाटेने किती दिवस जायचे?खडकीहून अन्य गावाला जाण्यासाठी पायवाटेचा आधार घ्यावा लागते. साधा खडीकरण केलेला रस्ता नाही त्यामुळे वाहने तर सोडाच शिक्षका व्यतिरिक्त कुठले कर्मचारी गावात जात नाही. देश स्वातंत्र्यातून मुक्त झाला असला तरी जंगल मुक्त अजुनही झालेला नाहीत. अजून किती दिवस हा संघर्ष करावा लागणार अशी व्यथा खडकी, रायपूर ग्रामपंचायत मधील खडकी या आदिवासी कोलामांनी ‘लोकमत’समोर मांडली आहे.अत्यंत हलाकीचे जीवन जगणाऱ्या कोलामांनी आपली व्यथा निवेदनाच्या माध्यमातून मांडली. मात्र दखल कोणी घेतली नाही. रस्त्याअभावी ना विकास ना बाजारपेठ, तहसील, पंचायत समिती पोलीस ठाणे तर नागरिकांना माहितच नाही. आजार झाल्यास अडचणींना तोंड द्यावे लागते. खडकी या गावात रस्ता नसल्याने दवाखाण्यात लवकर पोहचता न आल्याने आजपर्यंत या गावातील १५ जणांना जीव गमवावा ुलागल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. अजून किती दिवस आम्हाला खडतर प्रवास करावा लागणार असा सवालही गावातील कोलाम बांधवानी केला आहे. प्रशासन आता तरी दखल घेऊल का असा प्रश्न परिसरातील नागरिकांनी केला आहे.