शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हायवेमुळे नागभीड-ब्रह्मपुरी जवळ; पण खाणाखुणा नामशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 00:31 IST

उमरेड-आरमोरी या नॅशनल हायवे अंतर्गत नागभीड-ब्रह्मपुरी हा मार्ग आता जवळपास पूर्ण झाला आहे. या हायवेमुळे नागभीड-ब्रह्मपुरी अधिकच जवळ आले. या मार्गावरील प्रवासही सुखकर झाला असला तरी सदर मार्गावर असलेल्या ओळखीच्या खुणा नामशेष झाल्या आहेत.

ठळक मुद्दे‘एनएच ३५३’ ची कमाल; नव्या रस्त्याने सौदर्यांत भर

घनश्याम नवघडे ।नागभीड : उमरेड-आरमोरी या नॅशनल हायवे अंतर्गत नागभीड-ब्रह्मपुरी हा मार्ग आता जवळपास पूर्ण झाला आहे. या हायवेमुळे नागभीड-ब्रह्मपुरी अधिकच जवळ आले. या मार्गावरील प्रवासही सुखकर झाला असला तरी सदर मार्गावर असलेल्या ओळखीच्या खुणा नामशेष झाल्या आहेत.नागभीड आणि ब्रह्मपुरी ही दोन शहरे तशी एकमेकांना नवीन नाहीत. पूर्वी ही दोन्ही शहरे एकाच तालुक्याचे अविभाज्य घटक होते. नंतर प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने १ मे १९८१ रोजी स्वतंत्र नागभीड तालुक्याची निर्मिती करण्यात आली. नागभीड स्वतंत्र तालुका झाल्यानंतरही विविध खरेदी, वैद्यकीय सोय आणि शैक्षणिक व अन्य कामांच्या निमित्ताने आजही नागभीडकरांचे ब्रह्मपुरीशी नाते जुळून आहे.या नात्याला वृद्धींगत करण्यासाठी दळणवळणाची साधनेही महत्त्वाची असतात. ती साधने आधीपासूनच उपलब्ध होती. नागभीड-ब्रह्मपुरी हा रेल्वेमार्ग तर इंग्रजकालीन आहे. आणि नागभीड-ब्रह्मपुरी राज्य मार्गही पुरातनच आहे. आता याच राज्यमार्गाचे ‘नॅशनल हायवे’मध्ये रूपांतर झाले असून कामही झपाट्याने सुरू आहे. जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.या नॅशनल हायवेवर नागभीड-ब्रह्मपुरी दरम्यान अनेक गावे आहेत. सुलेझरी, भिकेश्वर, नवेगाव पांडव फाटा, कोर्धा, पांजरेपार, किरमिटी फाटा, मेंढा, अड्याळ फाटा, सायगाटा मंदिर फाटा, खरबी आदी अनेक गावांचा यात उल्लेख करता येईल. पूर्वी राज्यमार्ग होता तेव्हा या मार्गाने बसमधून प्रवास करताना अपेक्षित गावाजवळ येत असल्याच्या अनेक खाणाखुणा डोक्यात तरळून जायच्या. ती ओळखीची झाडे, ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत तटस्थपणे उभे असलेले एखाद्या गावातील मोडकेतोडके छोटेसे बसस्थानक हे सारे आता नामशेष झाले आहेत. ब्रह्मपुरीला उतरायचे आहे म्हटल्यावर खरबीच्या टेकरापासूनच बसमधून प्रवास करणारे प्रवासी उतरण्याची लगबग सुरू करायचे. पण आता या राज्यमार्गाचे नॅशनल हायवेमध्ये रूपांतर झाल्याने रस्त्याचे मोठ्या प्रमाणावर रूंदीकरण झाले आहे.या रूंदीकरणात रस्त्याच्या आजूबाजूला असलेले वृक्ष, ओळखीच्या खाणाखुणा नामशेष झाल्याने या रस्त्यावरील गाव केव्हा येते हे कळतच नाही. बसचा वाहक घंटी वाजवून गाव आल्याचे सांगतो, तेव्हा ते गाव आल्याचे लक्षात येते. तद्वतच दुचाकीने किंवा चारचाकीने ब्रह्मपुरीला जाणाऱ्या किंवा ब्रम्हपुरीकडून नागभीडकडे प्रवास करणाऱ्यांना प्रवाश्यांना हाच अनुभव येत आहे.या महामार्गावर असलेल्या कोर्धा आणि मेंढा या गावातून दुभाजक काढण्यात आल्याने या गावांच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. या दुभाजकांमुळे गावेही प्रशस्त वाटत आहेत. मात्र मागील अनेक वर्षांपासून सदर मार्गावर असलेल्या खुणा नव्या हायवेमुळे नामशेष झाल्या आहेत.हा नँशनल हायवे झाल्याने नागभीड -ब्रम्हपुरी प्रवासाला एक प्रकारचा हुरूपही आला आहे. एरव्ही ब्रह्मपुरीला जाऊन अमूक काम करून ये म्हटल्यावर आढेवेढे घेणारे ब्रह्मपुरीस जायला सहज तयार होताना दिसत आहेत. कारण रस्ताच एवढा प्रशस्त होत आहे की, गाडी सुरू केल्यानंतर ब्रह्मपुरी केव्हा आले याचा पत्ताच प्रवाशांना लागत नाही.

टॅग्स :highwayमहामार्ग