शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

हायवेमुळे नागभीड-ब्रह्मपुरी जवळ; पण खाणाखुणा नामशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 00:31 IST

उमरेड-आरमोरी या नॅशनल हायवे अंतर्गत नागभीड-ब्रह्मपुरी हा मार्ग आता जवळपास पूर्ण झाला आहे. या हायवेमुळे नागभीड-ब्रह्मपुरी अधिकच जवळ आले. या मार्गावरील प्रवासही सुखकर झाला असला तरी सदर मार्गावर असलेल्या ओळखीच्या खुणा नामशेष झाल्या आहेत.

ठळक मुद्दे‘एनएच ३५३’ ची कमाल; नव्या रस्त्याने सौदर्यांत भर

घनश्याम नवघडे ।नागभीड : उमरेड-आरमोरी या नॅशनल हायवे अंतर्गत नागभीड-ब्रह्मपुरी हा मार्ग आता जवळपास पूर्ण झाला आहे. या हायवेमुळे नागभीड-ब्रह्मपुरी अधिकच जवळ आले. या मार्गावरील प्रवासही सुखकर झाला असला तरी सदर मार्गावर असलेल्या ओळखीच्या खुणा नामशेष झाल्या आहेत.नागभीड आणि ब्रह्मपुरी ही दोन शहरे तशी एकमेकांना नवीन नाहीत. पूर्वी ही दोन्ही शहरे एकाच तालुक्याचे अविभाज्य घटक होते. नंतर प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने १ मे १९८१ रोजी स्वतंत्र नागभीड तालुक्याची निर्मिती करण्यात आली. नागभीड स्वतंत्र तालुका झाल्यानंतरही विविध खरेदी, वैद्यकीय सोय आणि शैक्षणिक व अन्य कामांच्या निमित्ताने आजही नागभीडकरांचे ब्रह्मपुरीशी नाते जुळून आहे.या नात्याला वृद्धींगत करण्यासाठी दळणवळणाची साधनेही महत्त्वाची असतात. ती साधने आधीपासूनच उपलब्ध होती. नागभीड-ब्रह्मपुरी हा रेल्वेमार्ग तर इंग्रजकालीन आहे. आणि नागभीड-ब्रह्मपुरी राज्य मार्गही पुरातनच आहे. आता याच राज्यमार्गाचे ‘नॅशनल हायवे’मध्ये रूपांतर झाले असून कामही झपाट्याने सुरू आहे. जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.या नॅशनल हायवेवर नागभीड-ब्रह्मपुरी दरम्यान अनेक गावे आहेत. सुलेझरी, भिकेश्वर, नवेगाव पांडव फाटा, कोर्धा, पांजरेपार, किरमिटी फाटा, मेंढा, अड्याळ फाटा, सायगाटा मंदिर फाटा, खरबी आदी अनेक गावांचा यात उल्लेख करता येईल. पूर्वी राज्यमार्ग होता तेव्हा या मार्गाने बसमधून प्रवास करताना अपेक्षित गावाजवळ येत असल्याच्या अनेक खाणाखुणा डोक्यात तरळून जायच्या. ती ओळखीची झाडे, ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत तटस्थपणे उभे असलेले एखाद्या गावातील मोडकेतोडके छोटेसे बसस्थानक हे सारे आता नामशेष झाले आहेत. ब्रह्मपुरीला उतरायचे आहे म्हटल्यावर खरबीच्या टेकरापासूनच बसमधून प्रवास करणारे प्रवासी उतरण्याची लगबग सुरू करायचे. पण आता या राज्यमार्गाचे नॅशनल हायवेमध्ये रूपांतर झाल्याने रस्त्याचे मोठ्या प्रमाणावर रूंदीकरण झाले आहे.या रूंदीकरणात रस्त्याच्या आजूबाजूला असलेले वृक्ष, ओळखीच्या खाणाखुणा नामशेष झाल्याने या रस्त्यावरील गाव केव्हा येते हे कळतच नाही. बसचा वाहक घंटी वाजवून गाव आल्याचे सांगतो, तेव्हा ते गाव आल्याचे लक्षात येते. तद्वतच दुचाकीने किंवा चारचाकीने ब्रह्मपुरीला जाणाऱ्या किंवा ब्रम्हपुरीकडून नागभीडकडे प्रवास करणाऱ्यांना प्रवाश्यांना हाच अनुभव येत आहे.या महामार्गावर असलेल्या कोर्धा आणि मेंढा या गावातून दुभाजक काढण्यात आल्याने या गावांच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. या दुभाजकांमुळे गावेही प्रशस्त वाटत आहेत. मात्र मागील अनेक वर्षांपासून सदर मार्गावर असलेल्या खुणा नव्या हायवेमुळे नामशेष झाल्या आहेत.हा नँशनल हायवे झाल्याने नागभीड -ब्रम्हपुरी प्रवासाला एक प्रकारचा हुरूपही आला आहे. एरव्ही ब्रह्मपुरीला जाऊन अमूक काम करून ये म्हटल्यावर आढेवेढे घेणारे ब्रह्मपुरीस जायला सहज तयार होताना दिसत आहेत. कारण रस्ताच एवढा प्रशस्त होत आहे की, गाडी सुरू केल्यानंतर ब्रह्मपुरी केव्हा आले याचा पत्ताच प्रवाशांना लागत नाही.

टॅग्स :highwayमहामार्ग