शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

पावसाची मुसळधार व रिपरिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 05:00 IST

बुधवारी दिवसभर पावसाची सकाळपासून रिपरिप सुरू होती. या पावसाने सोयाबीन पिकाला चांगलाच फटका बसला आहे. सोयाबीन कापणीला झाल्यानंतर शेतकऱ्यांनी लगबगीने सोयाबीन पिकांची कापणी करून शेतात वाळण्यासाठी सोयाबीनचे लहान-लहान ढीग करून ठेवले आहे. परंतु अचानक पडलेल्या पावसाने कापणी करून ठेवलेले सोयाबीन पीक भिजल्याने जागेवरच खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देखरीप पिकांना जबर फटका : शेतकरी पुन्हा संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूरसह जिल्ह्यात सर्वत्र बुधवारी सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. पावसाची झड असावी, अशी पावसाची रिपरिप दिवसभर सुरू होती. या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने शेतातील धान पीक अक्षरश: झोपून गेले. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन शेतातच कापून ठेवले होते. तेदेखील पावसात भिजून मोठे नुकसान झाले आहे.चंद्रपुरात बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. प्रारंभी तासभर मुसळधार स्वरुपाचा पाऊस बरसला. त्यानंतर पावसाचा वेग काहिसा कमी झाला.मात्र पावसाची रिपरिप रात्रीपर्यंत सुरूच होती. पावसाळा गेला असे समजून अडगळीत टाकलेल्या छत्र्या, रेनकोट नागरिकांना पुन्हा बाहेर काढावे लागले. चंद्रपूरसह जिल्ह्यातील सर्वच भागात हा परतीचा पाऊस बरसला.कापून ठेवलेले सोयाबीन पावसात भिजलेबुधवारी दिवसभर पावसाची सकाळपासून रिपरिप सुरू होती. या पावसाने सोयाबीन पिकाला चांगलाच फटका बसला आहे. सोयाबीन कापणीला झाल्यानंतर शेतकऱ्यांनी लगबगीने सोयाबीन पिकांची कापणी करून शेतात वाळण्यासाठी सोयाबीनचे लहान-लहान ढीग करून ठेवले आहे. परंतु अचानक पडलेल्या पावसाने कापणी करून ठेवलेले सोयाबीन पीक भिजल्याने जागेवरच खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे. राजुरा तालुक्यात बहुतांश ठिकाणी बुधवारी पाऊस झाल्याने गोवरी, सास्ती, माथरा, चिंचोली, गोयेगाव, अंतरगाव, पोवनी, साखरी, वरोडा, मानोली, बाबापूर, कढोली(बू) परिसरातील खरिपातील सोयाबीन आणि कापूस पिकाला मोठा फटका बसला.सोयाबीन,कापूस पीक उद्ध्वस्तखरीप हंगामातील हाती येणारे सोयाबीन व कापूस पीक अशा अवेळी आलेल्या पावसामुळे शेतकºयांच्या डोळ्यादेखत उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अगदी सोयाबीन काढणीच्या सुरुवातीलाच सोयाबीन पिकांना पावसाचा फटका बसल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहे.धान पीक भुईसपाटसिंदेवाही, मूल, नागभीड, चिमूर, ब्रह्मपुरी, पोंभूर्णा, बल्लारपूर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड करण्यात आली. हे पीक सध्या डोलात असतानाच बुधवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे हे पीक झोपून भुईसपाट झाले. त्यामुळे धानाचा दर्जा खालवण्याचा धोका निर्माण झाला आहे.थंडीची चाहुलआॅक्टोबर महिना सुरू झाला आहे. एरवी ऑक्टोबर महिन्यात गुलाबी थंडी पडू लागते. मात्र यावेळी ऑक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा लोटायला आला तरी वातावरणात गरमी व उकाडा होता. मात्र बुधवारी आलेल्या पावसामुळे अचानक थंडीचीही चाहुल लागली. बुधवारी सायंकाळी थंडे वारे अंगाला झोंबू लागले होते.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती