शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

अंगाची होतेय लाहीलाही, तरीही सिग्नल सुरूच राही! पारा ४४ अंशापार

By परिमल डोहणे | Updated: April 27, 2024 19:43 IST

सद्य:स्थितीत चंद्रपुरात उन्हाचा कहर सुरू आहे. दिवसभर कडक ऊन असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

चंद्रपूर : उन्हाच्या झळांपासून संरक्षण मिळावे, या अनुषंगाने बहुतांश मोठ्या शहरांत दुपारच्या सुमारास सिग्नल बंद ठेवले जातात. मागील काही वर्षांपूर्वी चंद्रपुरातसुद्धा दुपारी सिग्नल बंद केले जायचे. मात्र, यंदा एप्रिल महिना संपण्याच्या मार्गावर असतानासुद्धा २४ तासही सिग्नल सुरूच दिसून येतात. एकीकडे उष्माघाताच्या बचावासाठी प्रशासनच नागरिकांना क्षणभरही उन्हात उभे राहू नका, असा सबुरीचा सल्ला देत आहे, तर दुसरीकडे भर दुपारी ४४ अंश तापमानात वाहनचालकांना सिग्नलवर उभे राहावे लागते. यामुळे केवळ एका मिनिटातच दुचाकीस्वार घामाघूम होऊन कासावीस होत असल्याचे दिसून येत आहे. चंद्रपूर शहराचे तापमान देशात सर्वोच्च पातळीवर असते. त्यामुळे येथे उष्माघाताचा अधिक धोका असल्याने फेब्रुवारी महिन्यापासूनच प्रशासन जनजागृतीची मोहीम राबवत असते.

सद्य:स्थितीत चंद्रपुरात उन्हाचा कहर सुरू आहे. दिवसभर कडक ऊन असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. अशातच अनेक नागरिकांना कामानिमित्त उन्हाच्या झळा सोसत बाहेरचा रस्ता धरावा लागतो. अशा उन्हात सिग्नलवर उभे राहिल्यावर एक मिनिटातच अंगातून घामाच्या धारा बाहेर पडायला सुरुवात होत आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. यावर उपाय म्हणून मागील काही वर्षांपूर्वी भर दुपारी सिग्नल बंद केले जायचे. त्यामुळे वाहनचालक सरळ मार्गक्रमण करू शकत होते. परंतु, चंद्रपुरात ४४ अंश तापमानात सिग्नल सुरूच राहत असल्याने दुचाकीस्वारांना तप्त उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.

अपघाताचा धोका असल्याने सिग्नल सुरूच

सिग्नल जर बंद केले तर वाहतुक विस्कळीत होऊन अपघाताचा धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे यंदा अद्यापतरी सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला नसल्याचे सांगितले. अपघाताचा धोका असतो, ही बाब जरी खरी असली तरी काही कामानिमित्त शहरात यायचे असल्यास जवळपास चार सिग्नल पडतात आणि या प्रत्येक सिग्नलवर प्रतीक्षा करायची वेळ आल्यास उष्माघाताचा धोकाही असू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.बॉक्स

११ ते ५ या वेळेत सिग्नल बंद हवेचंद्रपूर शहरात सकाळी ८ वाजल्यापासूनच सूर्य आग ओकत असल्याचे दिसून येते. त्यामुळे थोडेसे अंतर जरी कापतो म्हटले तर अंगाची लाहीलाही होते. त्यामुळे सकाळी ११ ते ५ या वेळेत सिग्नल बंद ठेवावे, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

सोलापूर, नाशिकमध्ये शक्य, मग चंद्रपुरात का नाही?दुपारच्या सुमारास सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय सोलापूर, नाशिक यासह विविध मोठ्या शहरांत घेण्यात आला असल्याची माहिती आहे. मग हा नियम चंद्रपुरात का नाही, असाही प्रश्न चंद्रपूरकरांना पडला आहे.

टॅग्स :Heat Strokeउष्माघात