शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

अंगाची होतेय लाहीलाही, तरीही सिग्नल सुरूच राही! पारा ४४ अंशापार

By परिमल डोहणे | Updated: April 27, 2024 19:43 IST

सद्य:स्थितीत चंद्रपुरात उन्हाचा कहर सुरू आहे. दिवसभर कडक ऊन असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

चंद्रपूर : उन्हाच्या झळांपासून संरक्षण मिळावे, या अनुषंगाने बहुतांश मोठ्या शहरांत दुपारच्या सुमारास सिग्नल बंद ठेवले जातात. मागील काही वर्षांपूर्वी चंद्रपुरातसुद्धा दुपारी सिग्नल बंद केले जायचे. मात्र, यंदा एप्रिल महिना संपण्याच्या मार्गावर असतानासुद्धा २४ तासही सिग्नल सुरूच दिसून येतात. एकीकडे उष्माघाताच्या बचावासाठी प्रशासनच नागरिकांना क्षणभरही उन्हात उभे राहू नका, असा सबुरीचा सल्ला देत आहे, तर दुसरीकडे भर दुपारी ४४ अंश तापमानात वाहनचालकांना सिग्नलवर उभे राहावे लागते. यामुळे केवळ एका मिनिटातच दुचाकीस्वार घामाघूम होऊन कासावीस होत असल्याचे दिसून येत आहे. चंद्रपूर शहराचे तापमान देशात सर्वोच्च पातळीवर असते. त्यामुळे येथे उष्माघाताचा अधिक धोका असल्याने फेब्रुवारी महिन्यापासूनच प्रशासन जनजागृतीची मोहीम राबवत असते.

सद्य:स्थितीत चंद्रपुरात उन्हाचा कहर सुरू आहे. दिवसभर कडक ऊन असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. अशातच अनेक नागरिकांना कामानिमित्त उन्हाच्या झळा सोसत बाहेरचा रस्ता धरावा लागतो. अशा उन्हात सिग्नलवर उभे राहिल्यावर एक मिनिटातच अंगातून घामाच्या धारा बाहेर पडायला सुरुवात होत आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. यावर उपाय म्हणून मागील काही वर्षांपूर्वी भर दुपारी सिग्नल बंद केले जायचे. त्यामुळे वाहनचालक सरळ मार्गक्रमण करू शकत होते. परंतु, चंद्रपुरात ४४ अंश तापमानात सिग्नल सुरूच राहत असल्याने दुचाकीस्वारांना तप्त उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत.

अपघाताचा धोका असल्याने सिग्नल सुरूच

सिग्नल जर बंद केले तर वाहतुक विस्कळीत होऊन अपघाताचा धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे यंदा अद्यापतरी सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला नसल्याचे सांगितले. अपघाताचा धोका असतो, ही बाब जरी खरी असली तरी काही कामानिमित्त शहरात यायचे असल्यास जवळपास चार सिग्नल पडतात आणि या प्रत्येक सिग्नलवर प्रतीक्षा करायची वेळ आल्यास उष्माघाताचा धोकाही असू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.बॉक्स

११ ते ५ या वेळेत सिग्नल बंद हवेचंद्रपूर शहरात सकाळी ८ वाजल्यापासूनच सूर्य आग ओकत असल्याचे दिसून येते. त्यामुळे थोडेसे अंतर जरी कापतो म्हटले तर अंगाची लाहीलाही होते. त्यामुळे सकाळी ११ ते ५ या वेळेत सिग्नल बंद ठेवावे, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

सोलापूर, नाशिकमध्ये शक्य, मग चंद्रपुरात का नाही?दुपारच्या सुमारास सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय सोलापूर, नाशिक यासह विविध मोठ्या शहरांत घेण्यात आला असल्याची माहिती आहे. मग हा नियम चंद्रपुरात का नाही, असाही प्रश्न चंद्रपूरकरांना पडला आहे.

टॅग्स :Heat Strokeउष्माघात