शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

तंबाखुमुक्त जीवन जगल्यास आरोग्य सुदृढ राहील

By admin | Updated: October 8, 2014 23:24 IST

भारतात प्रत्येक १६ सेकंदाला एक मुल पहिल्यांदा तंबाखुचे सेवन करते, तर दर दिवशी हा आकडा ५ हजार ५०० मुलांपर्यंत पोहोचतो. भारतात १४.६ टक्के कुमारवयीन मुले तंबाखूच्या अधिन गेलेली आहेत.

तळोधी (बा) : भारतात प्रत्येक १६ सेकंदाला एक मुल पहिल्यांदा तंबाखुचे सेवन करते, तर दर दिवशी हा आकडा ५ हजार ५०० मुलांपर्यंत पोहोचतो. भारतात १४.६ टक्के कुमारवयीन मुले तंबाखूच्या अधिन गेलेली आहेत. यात मुलांचे प्रमाण १९ टक्के तर मुलींचे ८.३ टक्के आहे. भविष्यात या मुलांना हृदयविकार, फुफ्फुस आणि श्वासोच्छवासासंदर्भातील आजारस कॅन्सर, वंध्यत्व आणि इतर आजारांना सामोरे जावे लागण्याचा धोका असल्याचे मत सलाम बॉम्बेच्या सर्व्हेक्षणातून उघड झाले आहे.मुलांनी स्वत:च्या आरोग्य, शिक्षण आणि उपजिविकेची निवड करावी, हे सलाम मुंबई फाऊंडेशनचे ध्येय असून २००२ सालापासून ही संस्था मुलांसोबत काम करीत आहे. जी मुले वयाच्या १८ वर्षापर्यंत तंबाखूपासून दूर राहतात, ती आपल्या भावी आयुष्यातही तंबाखू सेवन करण्याची शक्यता कमी असते. याच निकर्षावरून तंबाखूमुक्त शाळेची संकल्पना पुढे आली आहे. सी.बी.एल.सी. बोगेच्या तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था निकर्षानुसार शिक्षकांनी आपल्या शाळा तंबाखूमुक्त बनविल्या तर प्रत्येक मुलामध्ये तंबाखूविरोधी मानसिकता निर्माण होईल, ते भविष्यात आरोग्यसंपन्न जीवन जगतील. मुलांचे सामाजिक, नैतिक आणि आर्थिक उन्नती होण्यासाठीही तंबाखूमुक्त शाळा उपक्रम हातभार लावेल अशी यामागील भावना आहे.बऱ्याच शिक्षकांनी तंबाखू विषयांशी संबंधीत निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पथनाट्य, विज्ञान प्रदर्शन अशा विविध उपक्रमातून सदर समस्येला लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला आहे. मुलांना तंबाखूच्या दुष्परिणामांची आणि तंबाखू सेवन सोडण्याच्या प्रक्रियेची माहिती देण्यात आणि सुदृढ, सक्षम निरोगी भारत बनविण्यासाठी शिक्षक एक आशेचा किरण आहे. त्यासाठी शिक्षकांकडून या उपक्रमाअंतर्गत प्रयत्नही केले जात आहेत. (वार्ताहर)